शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: ए.एस.मधील गुंतवणूकदारांची आर्थिक कोंडी, कर्ज काढून केली होती गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 13:27 IST

तक्रारी वाढल्यानंतर कंपनीने दोन महिन्यांपूर्वी काही गुंतवणूकदारांना परतावे जमा केल्याचे मेसेज पाठवले. प्रत्यक्षात मात्र पैसे खात्यावर जमा झालेच नाहीत.

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून ए. एस. ट्रेडर्स कंपनीकडून परतावे बंद असल्यामुळे गुंतवणूकदार आर्थिक कोंडीत सापडले आहेत. जादा परताव्याच्या हव्यासामुळे अनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन ए. एस. मध्ये गुंतवणूक केली. आता वसुलीसाठी बँकांचा तगादा वाढल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल आहेत. परतावा बंद आणि मूळ रक्कमही अडकल्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली आहे.ए.एस. ट्रेडर्स कंपनीकडून कमी कालावधीत जादा परतावा मिळत असल्याने गेल्या दोन वर्षांत हजारो लोकांनी कंपनीत पैसे गुंतवले. अनेकांनी बँकांकडून घर, प्लॉट, वाहने, दागिन्यांवर कर्ज काढून ए.एस.मध्ये पैसे गुंतवले. सुरुवातीचे काही महिने चांगला परतावा मिळाल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी पुन्हा मोठ्या रकमा गुंतवल्या. सप्टेंबर २०२२ पासून ए.एस. ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स कंपनीचे परतावे बंद झाले आहेत. कर्ज काढून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे बँकांचे हप्ते सुरूच आहेत. अनेकांचे हप्ते थकले आहेत. मार्च एंडिंगमुळे बँकांनी वसुलीचा तगादा लावल्यामुळे गुंतवणूकदार आर्थिक कोंडीत सापडले आहेत.पुण्यातील दाम्पत्याचा आत्महत्येचा इशारापुणे जिल्ह्यातील एका गुंतवणूकदाराने पत्नीच्या नावे कंपनीत ५१ लाखांची गुंतवणूक केली. त्यासाठी त्याने सात खासगी बँकांकडून कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना दरमहा एक लाख ३० हजार रुपयांचा हप्ता भरावा लागतो. गेली पाच महिने त्यांनी घरातील दागिने गहाणवट ठेवून बँकांचे हप्ते भागवले. आता त्यांच्याकडे काहीच पैसे शिल्लक नाहीत. गुंतवलेली रक्कम ए.एस. कडून परत मिळत नाही आणि बँकांचा तगादा सुरू असल्यामुळे त्यांनी ए.एस. ट्रेडर्सच्या संचालकांना मेल पाठवून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. कमी-अधिक प्रमाणात असे संकट अनेक गुंतवणूकदारांसमोर आहे.गोव्यातही झाली फसवणूकए. एस. ट्रेडर्सने केलेल्या फसवणुकीची व्याप्ती वाढत असून, गोव्यातील एका गुंतवणूकदाराने गेल्या आठवड्यात शाहूपुरी पोलिस ठाण्यात कंपनीच्या विरोधात तक्रार दिली. त्याशिवाय जिल्ह्यातील गुंतवणूकदारांकडून तक्रारींचा ओघ वाढत असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी सांगितले.

केवळ मेसेज, पैसे नाहीतचपरतावे बंद झाल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर कंपनीने दोन महिन्यांपूर्वी काही गुंतवणूकदारांना परतावे जमा केल्याचे मेसेज पाठवले. प्रत्यक्षात मात्र पैसे खात्यावर जमा झालेच नाहीत. कंपनीतील खात्यावर रक्कम दिसते, पण काढता येत नाही, अशी अवस्था गुंतवणूकदारांची झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी