शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

छत्रपतींच्या विरोधातील प्रवृत्तींविरोधात लढाई: राहुल गांधी, शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 09:33 IST

राहुल गांधी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोटला उभारला आणि काहीच दिवसांत तो कोसळला. ज्यांनी पुतळा उभारला त्यांची नियत चांगली नव्हती. पुतळा पडला, कारण यांची विचारधाराच भ्रष्ट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : संविधान संपवण्याची विचारधारा जुनीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकालासुद्धा त्यावेळी विरोध झाला होता. ज्याविरोधात शिवाजी महाराज यांना लढावे लागले, त्याच प्रवृत्तीविरोधातच काँग्रेसची लढाई आहे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले.

कसबा बावडा (ता. करवीर) येथील भगवा चौकात डॉ. संजय डी. पाटील व आ. सतेज पाटील यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी अनावरण करण्यात आले. खा. शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शानदार समारंभाला काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, हा देश सर्वांचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. हाच संदेश छत्रपती शिवरायांनी जगाला दिला. त्यांच्या विचारांचे सध्याच्या काळातील प्रतीक म्हणजे हे संविधान आहे.  छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज नसते, तर संविधान झाले नसते. सध्या भारतात दोन विचारधारांमध्ये लढाई सुरू आहे. एक विचारधारा ही संविधानाचे रक्षण करते, समानता आणि एकतेचा विचार करते, जी शिवाजी महाराजांची होती, तर दुसरी विचारधारा संविधान संपवायला निघाली आहे.  आ. सतेज पाटील म्हणाले,  कसबा बावडा ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. 

भ्रष्टाचारांमुळेच राजकोटचा पुतळा पडला

राहुल गांधी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोटला उभारला आणि काहीच दिवसांत तो कोसळला. ज्यांनी पुतळा उभारला त्यांची नियत चांगली नव्हती. पुतळ्यानेच संदेश दिला की, पुतळा उभारणार असाल, तर संविधानाचे संरक्षणही तुम्हाला करावे लागेल. पुतळा पडला, कारण यांची विचारधाराच भ्रष्ट आहे.

टेम्पो चालकाच्या कुटुंबासोबत राहुल गांधी यांनी घेतले भोजन

उचगाव (जि. कोल्हापूर) :  लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी उचगाव येथील टेम्पो चालक अजयकुमार सनदे यांच्या घरी अचानक दिलेली भेट कुतूहलाचा विषय ठरली. यावेळी राहुल यांनी स्वत: भाज्या बनवत दलित असलेल्या सनदे कुटुंबीयांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. 

कोल्हापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक उचगावातील छोटेशे कौलारू घर असलेल्या टेम्पो चालक अजयकुमार सनदे यांच्या घरी भेट दिली. सनदे कुटुंबाशी संवाद साधत त्यांनी स्वत: स्वयंपाक घराचा ताबा घेऊन हरभरा आणि कांद्याची भाजी केली. अंजना सनदे यांनी भाकरी केल्या.

त्यानंतर सनदे कुटुंब आणि गांधी यांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी सनदे कुटुंबीयांना संविधानाची प्रतिमा भेट दिली. सुमारे ४० मिनिटानंतर गांधी यांच्या वाहनांचा ताफा उचगावातून बाहेर पडला. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस