शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

छत्रपतींच्या विरोधातील प्रवृत्तींविरोधात लढाई: राहुल गांधी, शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 09:33 IST

राहुल गांधी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोटला उभारला आणि काहीच दिवसांत तो कोसळला. ज्यांनी पुतळा उभारला त्यांची नियत चांगली नव्हती. पुतळा पडला, कारण यांची विचारधाराच भ्रष्ट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : संविधान संपवण्याची विचारधारा जुनीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकालासुद्धा त्यावेळी विरोध झाला होता. ज्याविरोधात शिवाजी महाराज यांना लढावे लागले, त्याच प्रवृत्तीविरोधातच काँग्रेसची लढाई आहे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले.

कसबा बावडा (ता. करवीर) येथील भगवा चौकात डॉ. संजय डी. पाटील व आ. सतेज पाटील यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी अनावरण करण्यात आले. खा. शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शानदार समारंभाला काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, हा देश सर्वांचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. हाच संदेश छत्रपती शिवरायांनी जगाला दिला. त्यांच्या विचारांचे सध्याच्या काळातील प्रतीक म्हणजे हे संविधान आहे.  छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज नसते, तर संविधान झाले नसते. सध्या भारतात दोन विचारधारांमध्ये लढाई सुरू आहे. एक विचारधारा ही संविधानाचे रक्षण करते, समानता आणि एकतेचा विचार करते, जी शिवाजी महाराजांची होती, तर दुसरी विचारधारा संविधान संपवायला निघाली आहे.  आ. सतेज पाटील म्हणाले,  कसबा बावडा ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. 

भ्रष्टाचारांमुळेच राजकोटचा पुतळा पडला

राहुल गांधी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोटला उभारला आणि काहीच दिवसांत तो कोसळला. ज्यांनी पुतळा उभारला त्यांची नियत चांगली नव्हती. पुतळ्यानेच संदेश दिला की, पुतळा उभारणार असाल, तर संविधानाचे संरक्षणही तुम्हाला करावे लागेल. पुतळा पडला, कारण यांची विचारधाराच भ्रष्ट आहे.

टेम्पो चालकाच्या कुटुंबासोबत राहुल गांधी यांनी घेतले भोजन

उचगाव (जि. कोल्हापूर) :  लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी उचगाव येथील टेम्पो चालक अजयकुमार सनदे यांच्या घरी अचानक दिलेली भेट कुतूहलाचा विषय ठरली. यावेळी राहुल यांनी स्वत: भाज्या बनवत दलित असलेल्या सनदे कुटुंबीयांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. 

कोल्हापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक उचगावातील छोटेशे कौलारू घर असलेल्या टेम्पो चालक अजयकुमार सनदे यांच्या घरी भेट दिली. सनदे कुटुंबाशी संवाद साधत त्यांनी स्वत: स्वयंपाक घराचा ताबा घेऊन हरभरा आणि कांद्याची भाजी केली. अंजना सनदे यांनी भाकरी केल्या.

त्यानंतर सनदे कुटुंब आणि गांधी यांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी सनदे कुटुंबीयांना संविधानाची प्रतिमा भेट दिली. सुमारे ४० मिनिटानंतर गांधी यांच्या वाहनांचा ताफा उचगावातून बाहेर पडला. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस