शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पंधरा लाख मतदार, एकच महिला उमेदवार -: कोल्हापुरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 01:09 IST

राजकीय पक्षांकडूनही महिलांची मते मिळावीत यासाठी त्यांचे स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत तर महिलांना साड्या वाटपाचा पॅटर्न बराच गाजला होता. या निवडणुकीतही महिला मतदारांना खूश करण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत; परंतु त्यांना उमेदवार म्हणून स्वीकारायला अजून कोल्हापूर तयार नाही.

ठळक मुद्देउजव्या-डाव्यांसह सगळेच पक्ष उमेदवारी देण्यात मागे; नेतृत्व विकासासाठी पाठबळाची गरज

विश्वास पाटील ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी १५ लाखांहून अधिक महिला मतदार असूनही या निवडणुकीत फक्त इचलकरंजी मतदारसंघातून एकच महिला अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहे. उजव्या-डाव्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यास हात आखडता घेतल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीचे बदललेले स्वरूप पाहता सामान्य कुटुंबातील महिला निवडणुकीचा विचारही करू शकत नाहीत, असे चित्र आहे.

कोल्हापूरची ओळख राज्यात ‘पुरोगामी जिल्हा’ अशी आहे. कोल्हापूर संस्थानाचीच स्थापना ताराराणी छत्रपतींनी केली आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रांत विविध स्तरांवर या जिल्ह्यातील महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा लावला आहे; परंतु तरीही विधानसभेसारख्या लोकशाहीच्या मंदिरात मात्र महिलांना फारच कमी संधी मिळाली आहे. संजीवनी गायकवाड असोत की संध्यादेवी कुपेकर; त्यांच्या पतींचे निधन झाल्यावर सहानुभूती म्हणून त्या-त्या पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांचे स्वत:चे कर्तृत्व म्हणून ही संधी त्यांना मिळालेली नाही. मागच्या सभागृहात कोल्हापुरातून किमान एक तरी महिला आमदार होत्या. या निवडणुकीत ही जागाही कमी झाली. चंदगड मतदारसंघातून डॉ. नंदिनी बाभूळकर या सक्षम उमेदवार होत्या; परंतु राजकीय पक्षांच्या वाटमारीत त्यांना संधी मिळाली नाही. आता सर्वच उमेदवारांच्या कुटुंबातील महिला प्रचारात आघाडीवर आहेत.राजकीय पक्षांकडूनही महिलांची मते मिळावीत यासाठी त्यांचे स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत तर महिलांना साड्या वाटपाचा पॅटर्न बराच गाजला होता. या निवडणुकीतही महिला मतदारांना खूश करण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत; परंतु त्यांना उमेदवार म्हणून स्वीकारायला अजून कोल्हापूर तयार नाही.या आहेत एकमेव उमेदवारस्वत:चा स्लिपर तयार करण्याचा उद्योग असलेल्या शकुंतला ऊर्फ दिव्या सचिन मगदूम या अपक्ष म्हणून इचलकरंजी मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. गेली अनेक वर्षे त्या सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. रणरागिणी क्रांती सेनेच्या माध्यमातून त्या महिला सबलीकरणाचे काम करतात. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत बचत गटाच्या चळवळीतही त्या काम करतात. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. महिलांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी निवडणूक लढवीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.आतापर्यंत कुणी लढवली विधानसभा२००४ : शिरोळ मतदारसंघातून काँग्रेसकडून रजनी मगदूम- ४२५०७ मते२००९ : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अपक्षडॉ. निलांबरी मंडपे - ५०१ मते४२०१४ : राधानगरी मतदारसंघातून अपक्ष विजयमाला देसाई - ६१३ मते२०१४ : हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष सुरेखा कांबळे - ८४४आतापर्यंतच्या महिला आमदार१९५७ : कागल मतदारसंघातून शेकापक्षातर्फे विमलाबाई बागल१९८५ : शिरोळ मतदारसंघातून निवडणुकीत काँग्रेसकडून सरोजिनी खंजिरे ४९१०३ मते घेऊन विजयी झाल्या.२००० : शाहूवाडी मतदारसंघातून पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या संजीवनी गायकवाड या ५५ हजार २०९ मते घेऊन विजयी झाल्या.२०१२ व २०१४ : चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून संध्यादेवी कुपेकर २०१२ पोटनिवडणुकीत आणि गेल्या निवडणुकीत ५१ हजार ५०९ मते घेऊन विजयी झाल्या.कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र (२०१९)एकूण मतदारसंघ : १०रिंगणातील उमेदवार : १०६रिंगणातील महिला उमेदवार : ०१ (इचलकरंजी मतदारसंघ) 

निरीक्षण असे आहे की, द्विपक्षीय पद्धतीमध्ये महिलांना जास्त संधी मिळते. महिला जि.प. अध्यक्ष, महापौर म्हणून चांगले काम करू शकतात, तरी त्यांना विधानसभेसाठी पक्षांकडून तयार केले जात नाही.- प्रा. भारती पाटील, अधिष्ठाता, मानव्यविद्याशास्त्र विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक