शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा लाख मतदार, एकच महिला उमेदवार -: कोल्हापुरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 01:09 IST

राजकीय पक्षांकडूनही महिलांची मते मिळावीत यासाठी त्यांचे स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत तर महिलांना साड्या वाटपाचा पॅटर्न बराच गाजला होता. या निवडणुकीतही महिला मतदारांना खूश करण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत; परंतु त्यांना उमेदवार म्हणून स्वीकारायला अजून कोल्हापूर तयार नाही.

ठळक मुद्देउजव्या-डाव्यांसह सगळेच पक्ष उमेदवारी देण्यात मागे; नेतृत्व विकासासाठी पाठबळाची गरज

विश्वास पाटील ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी १५ लाखांहून अधिक महिला मतदार असूनही या निवडणुकीत फक्त इचलकरंजी मतदारसंघातून एकच महिला अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहे. उजव्या-डाव्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यास हात आखडता घेतल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीचे बदललेले स्वरूप पाहता सामान्य कुटुंबातील महिला निवडणुकीचा विचारही करू शकत नाहीत, असे चित्र आहे.

कोल्हापूरची ओळख राज्यात ‘पुरोगामी जिल्हा’ अशी आहे. कोल्हापूर संस्थानाचीच स्थापना ताराराणी छत्रपतींनी केली आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रांत विविध स्तरांवर या जिल्ह्यातील महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा लावला आहे; परंतु तरीही विधानसभेसारख्या लोकशाहीच्या मंदिरात मात्र महिलांना फारच कमी संधी मिळाली आहे. संजीवनी गायकवाड असोत की संध्यादेवी कुपेकर; त्यांच्या पतींचे निधन झाल्यावर सहानुभूती म्हणून त्या-त्या पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांचे स्वत:चे कर्तृत्व म्हणून ही संधी त्यांना मिळालेली नाही. मागच्या सभागृहात कोल्हापुरातून किमान एक तरी महिला आमदार होत्या. या निवडणुकीत ही जागाही कमी झाली. चंदगड मतदारसंघातून डॉ. नंदिनी बाभूळकर या सक्षम उमेदवार होत्या; परंतु राजकीय पक्षांच्या वाटमारीत त्यांना संधी मिळाली नाही. आता सर्वच उमेदवारांच्या कुटुंबातील महिला प्रचारात आघाडीवर आहेत.राजकीय पक्षांकडूनही महिलांची मते मिळावीत यासाठी त्यांचे स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत तर महिलांना साड्या वाटपाचा पॅटर्न बराच गाजला होता. या निवडणुकीतही महिला मतदारांना खूश करण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत; परंतु त्यांना उमेदवार म्हणून स्वीकारायला अजून कोल्हापूर तयार नाही.या आहेत एकमेव उमेदवारस्वत:चा स्लिपर तयार करण्याचा उद्योग असलेल्या शकुंतला ऊर्फ दिव्या सचिन मगदूम या अपक्ष म्हणून इचलकरंजी मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. गेली अनेक वर्षे त्या सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. रणरागिणी क्रांती सेनेच्या माध्यमातून त्या महिला सबलीकरणाचे काम करतात. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत बचत गटाच्या चळवळीतही त्या काम करतात. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. महिलांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी निवडणूक लढवीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.आतापर्यंत कुणी लढवली विधानसभा२००४ : शिरोळ मतदारसंघातून काँग्रेसकडून रजनी मगदूम- ४२५०७ मते२००९ : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अपक्षडॉ. निलांबरी मंडपे - ५०१ मते४२०१४ : राधानगरी मतदारसंघातून अपक्ष विजयमाला देसाई - ६१३ मते२०१४ : हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष सुरेखा कांबळे - ८४४आतापर्यंतच्या महिला आमदार१९५७ : कागल मतदारसंघातून शेकापक्षातर्फे विमलाबाई बागल१९८५ : शिरोळ मतदारसंघातून निवडणुकीत काँग्रेसकडून सरोजिनी खंजिरे ४९१०३ मते घेऊन विजयी झाल्या.२००० : शाहूवाडी मतदारसंघातून पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या संजीवनी गायकवाड या ५५ हजार २०९ मते घेऊन विजयी झाल्या.२०१२ व २०१४ : चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून संध्यादेवी कुपेकर २०१२ पोटनिवडणुकीत आणि गेल्या निवडणुकीत ५१ हजार ५०९ मते घेऊन विजयी झाल्या.कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र (२०१९)एकूण मतदारसंघ : १०रिंगणातील उमेदवार : १०६रिंगणातील महिला उमेदवार : ०१ (इचलकरंजी मतदारसंघ) 

निरीक्षण असे आहे की, द्विपक्षीय पद्धतीमध्ये महिलांना जास्त संधी मिळते. महिला जि.प. अध्यक्ष, महापौर म्हणून चांगले काम करू शकतात, तरी त्यांना विधानसभेसाठी पक्षांकडून तयार केले जात नाही.- प्रा. भारती पाटील, अधिष्ठाता, मानव्यविद्याशास्त्र विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक