शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

अलमट्टीवरुन कोल्हापूर, सांगलीत धास्ती; दिल्लीतील बैठक स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:19 IST

महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेकडे लक्ष

कोल्हापूर : कृष्णा कालवा योजनेंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार सध्या आक्रमक दिसत आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराची धास्ती वाढणार आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी दिल्लीत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांतील मंत्र्यांची बैठक मंगळवारी होणार होती; पण अचानक बैठक रद्द झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित परिसरात चिंतेचे ढग दाटून आले आहेत.धरणाची सध्याची उंची ५१९.६ मीटर उंच असून, १२३ टीएमसी पाणी क्षमता आहे. त्याची उंची वाढवून ५२४.२६ करण्यासाठी कर्नाटक सरकारने मान्यता दिली आहे. एक वर्षापासून कर्नाटक शासन केंद्रीय पातळीवरही पाठपुरावा करीत आहे. धरणाची उंची वाढवल्याने पाणी साठवून कर्नाटकातील दोन लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. परिसरातील पिण्याच्या प्रश्न निकालात निघणार आहे. म्हणूनच कर्नाटक सरकार उंची वाढवण्यावर ठाम आहे; पण याचा फटका पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला बसणार आहे. धरणातील पाणी साठ्याचा फुगवटा वाढल्याने या दोन जिल्ह्यातील नद्यांतील पाण्याच्या विसर्ग गतीने होणार नाही. पूरस्थितीमध्ये भर पडणार आहे. म्हणून धरणाच्या उंची वाढवण्यास या परिसरातील शेतकऱ्यांचा, रहिवाशांचा विरोध आहे; पण विरोध न जुमानता कर्नाटक सरकार उंची वाढवण्यासाठी आवश्यक असलेली १ लाख ३३ हजार ८६७ एकर जमीन संपादनाची प्रक्रिया गतीने करीत आहे.

‘आंध्र’, ‘तेलंगणा’ला दुष्काळाची भीतीअलमट्टी धरणाची उंची वाढल्याने पावसाळ्यात पाण्याचा फुगवटा वाढून काेल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराची भीती आहे. याउलट पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी न मिळाल्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांना दुष्काळाचे भय निर्माण झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकDamधरण