शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

फुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल सेरेमनी’ने नांगरे-पाटील यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:43 IST

पुरोगामी विचारांची जनता आणि तत्पर, प्रशासकीय कौशल्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मी चांगले काम करू शकलो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छांची शिदोरी मला नवी आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा भावना कोल्हापूर परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे व्यक्त केल्या.

ठळक मुद्देफुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल परेड’ने नांगरे-पाटील यांना निरोप कोल्हापूरची ‘शिदोरी’ नवी आव्हाने पेलण्यास उपयुक्त : विश्वास नांगरे-पाटील यांची भावना

कोल्हापूर : पुरोगामी विचारांची जनता आणि तत्पर, प्रशासकीय कौशल्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मी चांगले काम करू शकलो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छांची शिदोरी मला नवी आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा भावना कोल्हापूर परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे व्यक्त केल्या.जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित नांगरे-पाटील यांची नाशिकला पोलिस आयुक्त झाल्याबध्दल निरोप समारंभ आणि नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस गार्डनमधील या कार्यक्रमास ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘लोकमत’ चे संपादक वसंत भोसले, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक विजय जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महानगरपालिकेचे नूतन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते, तर नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक वारके यांचा सत्कार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते शाल आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. सत्कारानंतर पोलीस दलाने नांगरे-पाटील यांना फुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल सेरेमनी’ने निरोप दिला.नांगरे-पाटील म्हणाले, ‘मी आजपर्यंत कोणत्याही ठिकाणी निरोप स्वीकारलेला नाही. वरिष्ठांकडून आदेश आला की, बॅग घेऊन पुढे निघतो. मात्र, आज कोल्हापुरातून जाताना मन भरून आले आहे. माझे मामा पोलीस दलात होते. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना, मानसिक घुसमट यांची जाणीव आहे. ही वेदनाच संवेदना समजून कोल्हापूर परिक्षेत्रात पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाला बळ देणारे उपक्रम राबविले.‘निर्भया’ पथकाच्या माध्यमातून महिला सुरक्षा, समुपदेशनाचे काम आणि गुन्हेगारी कमी करण्याचे काम करण्यात यशस्वी ठरलो.नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके म्हणाले,‘माझ्या सेवेची सुरुवात येथूनच झाली. त्यामुळे शिवशाहूंच्या कोल्हापुरात पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. नांगरे-पाटील यांनी सुरू केलेले उपक्रम, त्यांचा ‘सोशल पोलिसिंग’चा दृष्टिकोन े पुढे घेऊन जाईन.’कार्यक्रमास रूपाली नांगरे-पाटील, डॉ. सोनाली देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने, आदींसह मान्यवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी आभार मानले.

वडिलांचे स्वप्न साकार..मला कोल्हापुरात पोलीस अधिकारी म्हणून काम केलेले पाहणे हे वडिलांचे स्वप्न होते. विशेष पोलीस महानिरीक्षकपदी रुजू होताना ते माझ्या स्वागतासाठी कार्यालयात आले होते. त्यांचे स्वप्न साकार केल्याचे मला समाधान आहे, असे सांगताना नांगरे-पाटील भावूक झाले. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर