शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

फुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल सेरेमनी’ने नांगरे-पाटील यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:43 IST

पुरोगामी विचारांची जनता आणि तत्पर, प्रशासकीय कौशल्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मी चांगले काम करू शकलो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छांची शिदोरी मला नवी आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा भावना कोल्हापूर परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे व्यक्त केल्या.

ठळक मुद्देफुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल परेड’ने नांगरे-पाटील यांना निरोप कोल्हापूरची ‘शिदोरी’ नवी आव्हाने पेलण्यास उपयुक्त : विश्वास नांगरे-पाटील यांची भावना

कोल्हापूर : पुरोगामी विचारांची जनता आणि तत्पर, प्रशासकीय कौशल्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मी चांगले काम करू शकलो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छांची शिदोरी मला नवी आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा भावना कोल्हापूर परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे व्यक्त केल्या.जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित नांगरे-पाटील यांची नाशिकला पोलिस आयुक्त झाल्याबध्दल निरोप समारंभ आणि नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस गार्डनमधील या कार्यक्रमास ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘लोकमत’ चे संपादक वसंत भोसले, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक विजय जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महानगरपालिकेचे नूतन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते, तर नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक वारके यांचा सत्कार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते शाल आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. सत्कारानंतर पोलीस दलाने नांगरे-पाटील यांना फुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल सेरेमनी’ने निरोप दिला.नांगरे-पाटील म्हणाले, ‘मी आजपर्यंत कोणत्याही ठिकाणी निरोप स्वीकारलेला नाही. वरिष्ठांकडून आदेश आला की, बॅग घेऊन पुढे निघतो. मात्र, आज कोल्हापुरातून जाताना मन भरून आले आहे. माझे मामा पोलीस दलात होते. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना, मानसिक घुसमट यांची जाणीव आहे. ही वेदनाच संवेदना समजून कोल्हापूर परिक्षेत्रात पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाला बळ देणारे उपक्रम राबविले.‘निर्भया’ पथकाच्या माध्यमातून महिला सुरक्षा, समुपदेशनाचे काम आणि गुन्हेगारी कमी करण्याचे काम करण्यात यशस्वी ठरलो.नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके म्हणाले,‘माझ्या सेवेची सुरुवात येथूनच झाली. त्यामुळे शिवशाहूंच्या कोल्हापुरात पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. नांगरे-पाटील यांनी सुरू केलेले उपक्रम, त्यांचा ‘सोशल पोलिसिंग’चा दृष्टिकोन े पुढे घेऊन जाईन.’कार्यक्रमास रूपाली नांगरे-पाटील, डॉ. सोनाली देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने, आदींसह मान्यवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी आभार मानले.

वडिलांचे स्वप्न साकार..मला कोल्हापुरात पोलीस अधिकारी म्हणून काम केलेले पाहणे हे वडिलांचे स्वप्न होते. विशेष पोलीस महानिरीक्षकपदी रुजू होताना ते माझ्या स्वागतासाठी कार्यालयात आले होते. त्यांचे स्वप्न साकार केल्याचे मला समाधान आहे, असे सांगताना नांगरे-पाटील भावूक झाले. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर