शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील शेतकऱ्यांचे चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:49 IST

परभणी जिल्'तील शेतकºयांना २०१७ च्या हंगामातील सोयाबीन नुकसान देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ सुरू केल्याच्या निषेधार्थ कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर शंभरहून अधिक शेतकºयांनी बुधवारी ठिय्या मारून उपोषण सुरू केले.

ठळक मुद्देसोयाबीनची नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमककृषी मंत्रालयाकडून बैठकीचे आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

कोल्हापूर : परभणी जिल्'तील शेतकºयांना २०१७ च्या हंगामातील सोयाबीन नुकसान देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ सुरू केल्याच्या निषेधार्थ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर शंभरहून अधिक शेतकºयांनी बुधवारी ठिय्या मारून उपोषण सुरू केले. नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत दारातून उठणार नसल्याचा इशारा दिल्यानंतर कृषी विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. याबाबत बुधवारी (दि. १०) बैठक घेण्याचे मंत्रालयातून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर ठिय्या उठविला.

अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी बुधवारी दुपारी एक वाजता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आंदोलनकर्ते व मंत्री पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्याशी चर्चा घडवून आणली. यादव यांनी मंत्री पाटील व कृषी सचिवांशी संपर्क साधला. त्यानंतर आंदोलकांबरोबर बुधवारी बैठक घेण्याचे लेखी आश्वासन कृषी मंत्रालयातून आल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन स्थगित केले. दीपक किपने, उद्धव पोळ, रामकृष्ण रोटे, भीमराव मोगले, अशोक साखरे, बाळासाहेब जमरे, राजेभाऊ राठोड, सोपान जोखर, बंडू आव्हाड, उमाजी घुमरे, बळिराव शिंदे, रामराव गव्हाणे, आदी शेतकरी सहभागी झाले होते.

विलास बाबर म्हणाले, २०१७ च्या खरीप हंगामामध्ये ७० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. महसूल विभागाच्या सर्व्हेक्षणात ४३ टक्के आणेवारी आली असताना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा प्रशासन व कृषी विभागाशी संगनमत करून परभणी, जिंतूर, पूर्णा तालुक्यांतील मळणी व कापणीचे प्रयोग करताना शेतकºयांना अंधारात ठेवून चुकीचे उत्पन्न दाखविले. या प्रयोगावर पंच, संबंधित शेतकरी, प्रयोग करणाºया कर्मचाºयांच्या स'ा नाहीत. एकाच हस्ताक्षरात पंचनामे केले असून त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात खाडाखोड केली. पाथरी, सोनपेठ, मानवत, गंगाखेड, पालम तालुक्यातील चौदा मंडळांतील उत्पन्न ३० टक्केदेखील आलेले नाही. येथील शेतकºयांनाही रास्त प्रमाणात नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत शेतकºयांनी उपोषण केले. नागपूर अधिवेशन काळात कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी सचिव विजयकुमार यांच्याशी बैठक झाली. यामध्ये भरपाई देण्याचे आश्वासन दिले; पण त्याची पूर्तता झाली नाही. त्यानंतर ५ सप्टेंबरला पुन्हा शिष्टमंडळाने मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. पुन्हा आश्वासन दिले; पण पदरात काहीच नाही. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी हा निर्णय घेतला. आता पुन्हा बुधवारच्या बैठकीचे आश्वासन दिले आहे; पण नुकसान भरपाई न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशारा बाबर यांनी दिला.पोलिसांचे दातृत्वशेतकरी मंगळवारी सकाळी नऊ वाजता परभणी जिल्'ातील खेड्यापाड्यांतून कोल्हापूरकडे निघाले होते. दुपारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना नाष्टा-पाणी दिले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर