शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

परभणीतील शेतकऱ्यांचे चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:49 IST

परभणी जिल्'तील शेतकºयांना २०१७ च्या हंगामातील सोयाबीन नुकसान देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ सुरू केल्याच्या निषेधार्थ कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर शंभरहून अधिक शेतकºयांनी बुधवारी ठिय्या मारून उपोषण सुरू केले.

ठळक मुद्देसोयाबीनची नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमककृषी मंत्रालयाकडून बैठकीचे आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

कोल्हापूर : परभणी जिल्'तील शेतकºयांना २०१७ च्या हंगामातील सोयाबीन नुकसान देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ सुरू केल्याच्या निषेधार्थ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर शंभरहून अधिक शेतकºयांनी बुधवारी ठिय्या मारून उपोषण सुरू केले. नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत दारातून उठणार नसल्याचा इशारा दिल्यानंतर कृषी विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. याबाबत बुधवारी (दि. १०) बैठक घेण्याचे मंत्रालयातून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर ठिय्या उठविला.

अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी बुधवारी दुपारी एक वाजता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आंदोलनकर्ते व मंत्री पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्याशी चर्चा घडवून आणली. यादव यांनी मंत्री पाटील व कृषी सचिवांशी संपर्क साधला. त्यानंतर आंदोलकांबरोबर बुधवारी बैठक घेण्याचे लेखी आश्वासन कृषी मंत्रालयातून आल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन स्थगित केले. दीपक किपने, उद्धव पोळ, रामकृष्ण रोटे, भीमराव मोगले, अशोक साखरे, बाळासाहेब जमरे, राजेभाऊ राठोड, सोपान जोखर, बंडू आव्हाड, उमाजी घुमरे, बळिराव शिंदे, रामराव गव्हाणे, आदी शेतकरी सहभागी झाले होते.

विलास बाबर म्हणाले, २०१७ च्या खरीप हंगामामध्ये ७० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. महसूल विभागाच्या सर्व्हेक्षणात ४३ टक्के आणेवारी आली असताना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा प्रशासन व कृषी विभागाशी संगनमत करून परभणी, जिंतूर, पूर्णा तालुक्यांतील मळणी व कापणीचे प्रयोग करताना शेतकºयांना अंधारात ठेवून चुकीचे उत्पन्न दाखविले. या प्रयोगावर पंच, संबंधित शेतकरी, प्रयोग करणाºया कर्मचाºयांच्या स'ा नाहीत. एकाच हस्ताक्षरात पंचनामे केले असून त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात खाडाखोड केली. पाथरी, सोनपेठ, मानवत, गंगाखेड, पालम तालुक्यातील चौदा मंडळांतील उत्पन्न ३० टक्केदेखील आलेले नाही. येथील शेतकºयांनाही रास्त प्रमाणात नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत शेतकºयांनी उपोषण केले. नागपूर अधिवेशन काळात कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी सचिव विजयकुमार यांच्याशी बैठक झाली. यामध्ये भरपाई देण्याचे आश्वासन दिले; पण त्याची पूर्तता झाली नाही. त्यानंतर ५ सप्टेंबरला पुन्हा शिष्टमंडळाने मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. पुन्हा आश्वासन दिले; पण पदरात काहीच नाही. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी हा निर्णय घेतला. आता पुन्हा बुधवारच्या बैठकीचे आश्वासन दिले आहे; पण नुकसान भरपाई न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशारा बाबर यांनी दिला.पोलिसांचे दातृत्वशेतकरी मंगळवारी सकाळी नऊ वाजता परभणी जिल्'ातील खेड्यापाड्यांतून कोल्हापूरकडे निघाले होते. दुपारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना नाष्टा-पाणी दिले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर