शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Kolhapur: ‘स्वाभिमानी’च्या लढ्यातून शेतकऱ्यांच्या पदरात ९७ कोटी, दोन महिने सुरु होता संघर्ष 

By राजाराम लोंढे | Updated: November 25, 2023 12:06 IST

पुढच्या हंगामातही आंदोलनाची धग

राजाराम लोंढेकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सुरू केलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांच्या पदरात तब्बल ९७ कोटी २६ लाख रुपये पडणार आहेत. दोन महिने शेट्टी यांनी रस्त्यावरचा संघर्ष केला. पण, शेवटपर्यंत काहीतरी पदरात पडल्याशिवाय त्यांनी तलवार म्यान केली नाही. मध्यंतरी विविध कारणांमुळे ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला काहीसी मरगळ आली होती. मात्र, यंदा ती झटकली असून, पुढच्या हंगामातही ही धग कायम राहणार हे निश्चित आहे.शेतमालाला दर नसल्याने शेतकरी आर्थिक अरिष्टात आहे. त्यात रासायनिक खते, शेती पंपाच्या वीज दरात केलेली भरमसाठ वाढ आणि शेतमजुरांची वानवा यामुळे दिवसेंदिवस शेती अंगावर येत आहे. अशा परिस्थितीत किमान हमीभाव असलेल्या ऊस पिकाकडे येथील शेतकरी वळला आहे. या पिकातूनही शेतकऱ्यांचा ताळेबंद सुधारला नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने एफआरपी व आरएसपी हे दोन कायदे सुरक्षित असले तरी यंदा साखरेसह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे, तर त्यातील नफाही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन राजू शेट्टी यांनी गेले दोन महिने साखर कारखानदार व राज्य शासनाशी संघर्ष सुरू ठेवला.अखेर, तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १००, तर त्यापेक्षा अधिक दर दिलेल्यांनी ५० रुपये देण्यावर एकमत झाले. येत्या दोन महिन्यात साखर आयुक्तांची परवानगी घेऊन हे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत दिलेले पैसे पाहता, अजून ९७ कोटी २६ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. गेले दोन महिने राजू शेट्टी यांनी केलेल्या संघर्षाचे हे फलित म्हणावे लागेल.

चळवळ टिकली पाहिजे..अंतर्गत वादामुळे शेतकरी संघटनांचे तुुकडे पडल्याने शेतकऱ्यांची ताकद विखुरली गेली. पण, सगळ्यांचा उद्देश एकच आहे, त्यातूनच ‘स्वाभिमानी’ने हे मोठे आंदोलन हातात घेतले. त्याला ‘आंदोलन अंकुश’सह इतर संघटनांनी बळ दिले. जय शिवराय संघटनेने कायदेशीर लढाई करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली.

‘जवाहर’, ‘दत्त’च्या शेतकऱ्यांना २९ कोटीजवाहर व दत्त कारखान्याला मागील हंगामात गाळपास पाठवलेल्या ऊस उत्पादकांना तब्बल २९ कोटी मिळणार आहेत. त्यापाठोपाठ ‘गुरुदत्त’ला ७.०३ कोटी, तर ‘शरद’ला ६.०५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

असे राहिले ‘स्वाभिमानी’चे ऑगस्टपासून आंदोलनाचे टप्पे..

  • साखर आयुक्तांना पत्र
  • प्रत्येक साखर कारखान्याला निवेदन देऊन मागणी
  • प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा
  • साखर कारखान्यांवर ढोल बडाओ आंदोलन
  • ५२२ किलोमीटरची आक्रोश पदयात्रा
  • ऊस परिषद
  • ऊस परिषदेच्या ठिकाणी ऐन दिवाळीत ठिय्या आंदोलन
  • चक्का जाम आंदोलन
  • राष्ट्रीय महामार्ग रोको

कारखानानिहाय अशी द्यावी लागणार रक्कम, कोटीत :आजरा : १.६८भोगावती : २.२९राजाराम : २.०९शाहू : ४.५६दत्त, शिरोळ : ११.४८बिद्री : ४.४०जवाहर : १८.०१हमीदवाडा : २.३०कुंभी : ३.००पंचगंगा (रेणुका शुगर्स) : ४.१३शरद : ६.०५वारणा : ६.७४अथणी (गायकवाड) : ३.७९डी. वाय. पाटील : २.३५दालमिया : ५.०७गुरुदत्त : ७.०३इको केन, चंदगड : १.७३ओलम ग्लोबल, राजगोळी : ३.३१संताजी घोरपडे : ३.४२अथणी (तांबाळे) : १.७२अथर्व (दौलत) : २.०२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना