शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘स्वाभिमानी’च्या लढ्यातून शेतकऱ्यांच्या पदरात ९७ कोटी, दोन महिने सुरु होता संघर्ष 

By राजाराम लोंढे | Updated: November 25, 2023 12:06 IST

पुढच्या हंगामातही आंदोलनाची धग

राजाराम लोंढेकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सुरू केलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांच्या पदरात तब्बल ९७ कोटी २६ लाख रुपये पडणार आहेत. दोन महिने शेट्टी यांनी रस्त्यावरचा संघर्ष केला. पण, शेवटपर्यंत काहीतरी पदरात पडल्याशिवाय त्यांनी तलवार म्यान केली नाही. मध्यंतरी विविध कारणांमुळे ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला काहीसी मरगळ आली होती. मात्र, यंदा ती झटकली असून, पुढच्या हंगामातही ही धग कायम राहणार हे निश्चित आहे.शेतमालाला दर नसल्याने शेतकरी आर्थिक अरिष्टात आहे. त्यात रासायनिक खते, शेती पंपाच्या वीज दरात केलेली भरमसाठ वाढ आणि शेतमजुरांची वानवा यामुळे दिवसेंदिवस शेती अंगावर येत आहे. अशा परिस्थितीत किमान हमीभाव असलेल्या ऊस पिकाकडे येथील शेतकरी वळला आहे. या पिकातूनही शेतकऱ्यांचा ताळेबंद सुधारला नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने एफआरपी व आरएसपी हे दोन कायदे सुरक्षित असले तरी यंदा साखरेसह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे, तर त्यातील नफाही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन राजू शेट्टी यांनी गेले दोन महिने साखर कारखानदार व राज्य शासनाशी संघर्ष सुरू ठेवला.अखेर, तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १००, तर त्यापेक्षा अधिक दर दिलेल्यांनी ५० रुपये देण्यावर एकमत झाले. येत्या दोन महिन्यात साखर आयुक्तांची परवानगी घेऊन हे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत दिलेले पैसे पाहता, अजून ९७ कोटी २६ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. गेले दोन महिने राजू शेट्टी यांनी केलेल्या संघर्षाचे हे फलित म्हणावे लागेल.

चळवळ टिकली पाहिजे..अंतर्गत वादामुळे शेतकरी संघटनांचे तुुकडे पडल्याने शेतकऱ्यांची ताकद विखुरली गेली. पण, सगळ्यांचा उद्देश एकच आहे, त्यातूनच ‘स्वाभिमानी’ने हे मोठे आंदोलन हातात घेतले. त्याला ‘आंदोलन अंकुश’सह इतर संघटनांनी बळ दिले. जय शिवराय संघटनेने कायदेशीर लढाई करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली.

‘जवाहर’, ‘दत्त’च्या शेतकऱ्यांना २९ कोटीजवाहर व दत्त कारखान्याला मागील हंगामात गाळपास पाठवलेल्या ऊस उत्पादकांना तब्बल २९ कोटी मिळणार आहेत. त्यापाठोपाठ ‘गुरुदत्त’ला ७.०३ कोटी, तर ‘शरद’ला ६.०५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

असे राहिले ‘स्वाभिमानी’चे ऑगस्टपासून आंदोलनाचे टप्पे..

  • साखर आयुक्तांना पत्र
  • प्रत्येक साखर कारखान्याला निवेदन देऊन मागणी
  • प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा
  • साखर कारखान्यांवर ढोल बडाओ आंदोलन
  • ५२२ किलोमीटरची आक्रोश पदयात्रा
  • ऊस परिषद
  • ऊस परिषदेच्या ठिकाणी ऐन दिवाळीत ठिय्या आंदोलन
  • चक्का जाम आंदोलन
  • राष्ट्रीय महामार्ग रोको

कारखानानिहाय अशी द्यावी लागणार रक्कम, कोटीत :आजरा : १.६८भोगावती : २.२९राजाराम : २.०९शाहू : ४.५६दत्त, शिरोळ : ११.४८बिद्री : ४.४०जवाहर : १८.०१हमीदवाडा : २.३०कुंभी : ३.००पंचगंगा (रेणुका शुगर्स) : ४.१३शरद : ६.०५वारणा : ६.७४अथणी (गायकवाड) : ३.७९डी. वाय. पाटील : २.३५दालमिया : ५.०७गुरुदत्त : ७.०३इको केन, चंदगड : १.७३ओलम ग्लोबल, राजगोळी : ३.३१संताजी घोरपडे : ३.४२अथणी (तांबाळे) : १.७२अथर्व (दौलत) : २.०२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना