शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

सरकारकडून शेतकऱ्यांचे वाटोळे - : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 1:59 AM

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या

ठळक मुद्देजयसिंगपूर येथे शेतकरी मेळावा, १ जुलैला महावितरणवर मोर्चा

जयसिंगपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणार आहे. माझा पराभव झाला म्हणून कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. मी चळवळीतील लढणारा कार्यकर्ता आहे.

भविष्यात शेतकºयांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागणार असून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही चळवळ टिकली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व ताकदीने संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले.

येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी माजी खासदार शेट्टी बोलत होते.वाढीव वीज बिल व वीज जोडणी या मागणीसाठी येत्या १ जुलै रोजी कृषी दिनी कोल्हापूर महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रारंभी स्वागत आदिनाथ हेमगिरे यांनी केले.

यावेळी वाशिम जिल्ह्यातून ५४० किलोमीटर पायी प्रवास करून आलेल्या अ‍ॅड. भागवत नरवाडे यांच्यासह मनोज शिरभाऊ व विशाल मोरे यांचा सत्कार करण्यात आला.शेट्टी पुढे म्हणाले, राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती आहे. जनावरांना चारा व शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाणी प्रश्नावर सरकार बोलत नाही. निर्ढावलेल्या सरकारी धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सरकार पाण्याचे राजकारण करीत आहे. त्याची बारामतीपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाºया काळात गावागावांतील संघटन मजबूत करून पाण्यासाठी तीव्र लढा उभा करावा लागणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रा. जालिंदर पाटील, सयाजी मोरे, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, आण्णासाहेब चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास सावकार मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, सचिन शिंदे, सुरेश कांबळे, राम शिंदे, महावीर अक्कोळे, डॉ. श्रीवर्धन पाटील, सागर संभूशेटे, सागर चिपरगे, शैलेश चौगुले, वसंतराव पाटील, पद्माराणी पाटील, मिलिंद साखरपे, विठ्ठल मोरे, सुभाष शेट्टी यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.एफआरपी थकविणारे भाजपचेच कारखानेमी साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसतो, असा आरोप केला जात आहे. राज्यात भाजपच्याच साखर कारखान्यांनी एफआरपी थकविलेली आहे. राज्यात एकूण १४५६ कोटी रुपयांची एफआरपी आजअखेर थकीत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा विचार केल्यास पंधरा कारखान्यांचे २४४ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी दहा साखर कारखाने शिवेसना व भाजप कार्यकर्त्यांची आहेत. त्यांच्याकडून १८९ कोटी रुपये एफआरपी थकविलेली आहे. मग यांची मांडी गेली कुठे ! सत्तेला चिकटावे तसे काही कारखानदार भाजपच्या गळाला लागले आहेत, असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी