शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Budget 2022: शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली, साखर कारखानदारीचा साधा उल्लेखही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 13:07 IST

देशातील दोन नंबरचा उद्योग असलेल्या साखर कारखानदारीचा तरी अर्थमंत्र्यांच्या भाषणात साधा उल्लेखही आलेला नाही.

विश्वास पाटीलकोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची प्रतिक्रिया कृषी क्षेत्रातून व्यक्त झाली आहे. देशातील दोन नंबरचा उद्योग असलेल्या साखर कारखानदारीचा तरी अर्थमंत्र्यांच्या भाषणात साधा उल्लेखही आलेला नाही.वर्षभराच्या आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले; परंतु त्यातील मुख्य मागणी जी हमीभावाची होती, त्याबद्दल अर्थमंत्री या अर्थसंकल्पात काहीच बोललेल्या नाहीत. हे कायदे मागे घेणे केंद्र सरकारला आवडलेले नाही. त्यामुळे त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसले. - कृषी क्षेत्रासाठी तीन घोषणा केल्या, त्यामध्ये किसान ड्रोन योजना. शेतकऱ्यांनी शेतीवर रासायनिक खते व कीटकनाशके फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे सरकारला वाटते. 

- दुसरी घोषणा त्यांनी नैसर्गिक शेतीला बळ देण्याची केली आहे. त्यासाठी ते गंगेच्या खोऱ्यात पाच किलोमीटर खोऱ्यात हा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. परंतु गंमत अशी की एक योजना ड्रोनद्वारे खते द्या म्हणून सांगते व दुसरी नैसर्गिक शेती करा म्हणून. 

- शेतकऱ्यांना डिजिटल करण्याचा सरकारचा मनसुभा आहे. त्याला डिजिटल करणे म्हणजे हे काम करणाऱ्या कंपन्यांना रोजगार मिळवून देण्याचाच प्रकार आहे. त्यातून शेतकऱ्याचा त्रास कमी होईल असा आजपर्यंतचा अनुभव नाही. 

- महाराष्ट्रातील जमीनधारणा विचारात घेता या शेतकऱ्यांना नैसर्गिक किंवा रसायनमुक्त शेती करणे शक्य नाही. त्यासाठीची भांडवल गुंतवणूक करण्याची त्याची क्षमता नाही. आणि सरकार मात्र नैसर्गिक शेती करा म्हणून त्याला पळवत आहे.

साखरेची खरेदी किंमत ३५ करण्याकडे दुर्लक्षसाखरेची किमान खरेदी किंमत ३१ वरून ३५ करावी, अशी देशातील साखर उद्योगाची मागणी होती. यापूर्वी एफआरपी देण्यासाठी घेतलेल्या कर्जांची पुनर्रचना करण्याची मागणी होती; परंतु त्याकडेही केंद्र सरकारने ढुंकून पाहिलेले नाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBudgetअर्थसंकल्प 2022agricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने