शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

भाताच्या ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची पसंती : बियाण्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:19 IST

कोल्हापूर : धूळवाफ पेरणीस सुरुवात झाल्याने भाताच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

ठळक मुद्देप्रतिकिलो २० रुपयांचे अनुदान; ७६ हजार टन खत उपलब्ध

कोल्हापूर : धूळवाफ पेरणीस सुरुवात झाल्याने भाताच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. बाजारात विविध वाणांच्या बियाण्यांची रेलचेल दिसत असली तरी यंदा ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसत आहे. विशेषत: भातामध्ये पारंपरिक वाणाला नापसंती दाखवीत ‘संशोधित’, ‘अवनि’, ‘पूनम’, ‘तृप्ती’, आदी सुधारित वाणांची खरेदी करताना दिसत आहेत.

जिल्ह्यात खरीप पेरणीत अन्नधान्याचे १ लाख ४८ हजार हेक्टरवर सर्वाधिक क्षेत्र आहे. अन्नधान्यामध्ये भात व नागलीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. भात बियाण्यांची सहज उपलब्धता पाहता पूर्वी पारंपरिक वाणांचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल होता; पण उत्पादकता व बाजारातील दर पाहता, सुधारित बियाणे वापराकडे शेतकरी वळले आहेत. पारंपरिक बियाण्याची उत्पादकता कमी असल्याने ‘संशोधित’ वाण वापरले जात आहे. यंदा ‘अवनि’, ‘पूनम’, ‘तृप्ती’, ‘शुभांगी’, ‘वायएसआर’ यांचा वापर वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यांद्वारे उत्पादन जास्त मिळतेच; पण ते खाण्यासाठी चांगले असल्याने शेतकरी या वाणांकडे वळला आहे.

‘महाबीज’कडून बियाण्यांची उपलब्धता स्थानिक विक्रेत्याकडे केली आहे. भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, उडदाच्या सर्वच वाणांवर प्रतिकिलो २० रुपये अनुदान दिले जाते. शेतकºयांनी ‘महाबीज’चे बियाणे खरेदी करताना सात-बारा, आधार कार्ड, फोन क्रमांक विक्रेत्यांना दिल्यानंतर अनुदान वजा करून पैसे द्यायचे आहेत. सोयाबीन १४ हजार क्विंटल, भात १८ हजार २७१ क्विंटल, ज्वारी ४१३ क्विंटल, भूईमूग २४०० क्विंटल यांसह इतर अशी ३५ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यांपैकी २२ हजार ९५८ क्विंटल बियाणे ‘महाबीज’कडून उपलब्ध झाले आहे.

यंदा खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. या हंगामासाठी १ लाख ९१ हजार टन रासायनिक खतांची मागणी होती; त्यापैकी १ लाख ४३ हजार टनाला मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी एप्रिल अखेर ७७ हजार टन खते उपलब्ध झाली आहेत.घरच्या बियाण्यांचे प्रमाण घटले : घरचे बियाणे काढण्याच्या आपल्याकडील पद्धतीमुळे उत्पादकतेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे घरच्या बियाण्यांचे प्रमाण कमी होत चालले असून, भात ४३ टक्के, सोयाबीन ३४ टक्के, तुरीसह इतर कडधान्ये ४२ टक्के, तर भुईमूग ३ टक्के घरातील बियाणे वापरले जाते.कृषी विभाग सज्जकृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी पुरेशा बियाणे, खतांची उपलब्धता करून ठेवली आहे.शेतकºयांना सहज बियाणे व खते उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांना सूचना केल्या आहेत. 

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज असून, बियाणे व खतांची पुरेशी उपलब्धता आहे. शेतकºयांनी दर्जेदार बियाण्यांची निवड करावी, उगवण क्षमता तपासूनच घरातील बियाण्यांचा वापर करावा.- चंद्रकांत सूर्यवंशी (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद)वळवाचा पाऊस चांगला झाल्याने धूळवाफ पेरणीसाठी शेतकºयांची धांदल उडाली आहे. यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याने खरिपाची पेरणी थोडी कमी होईल, असा अंदाज असून, पारंपरिकपेक्षा सुधारित बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती आहे.- नितीन जंगम (बियाणे, खत विक्रेते)

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर