शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

भाताच्या ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची पसंती : बियाण्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:19 IST

कोल्हापूर : धूळवाफ पेरणीस सुरुवात झाल्याने भाताच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

ठळक मुद्देप्रतिकिलो २० रुपयांचे अनुदान; ७६ हजार टन खत उपलब्ध

कोल्हापूर : धूळवाफ पेरणीस सुरुवात झाल्याने भाताच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. बाजारात विविध वाणांच्या बियाण्यांची रेलचेल दिसत असली तरी यंदा ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसत आहे. विशेषत: भातामध्ये पारंपरिक वाणाला नापसंती दाखवीत ‘संशोधित’, ‘अवनि’, ‘पूनम’, ‘तृप्ती’, आदी सुधारित वाणांची खरेदी करताना दिसत आहेत.

जिल्ह्यात खरीप पेरणीत अन्नधान्याचे १ लाख ४८ हजार हेक्टरवर सर्वाधिक क्षेत्र आहे. अन्नधान्यामध्ये भात व नागलीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. भात बियाण्यांची सहज उपलब्धता पाहता पूर्वी पारंपरिक वाणांचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल होता; पण उत्पादकता व बाजारातील दर पाहता, सुधारित बियाणे वापराकडे शेतकरी वळले आहेत. पारंपरिक बियाण्याची उत्पादकता कमी असल्याने ‘संशोधित’ वाण वापरले जात आहे. यंदा ‘अवनि’, ‘पूनम’, ‘तृप्ती’, ‘शुभांगी’, ‘वायएसआर’ यांचा वापर वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यांद्वारे उत्पादन जास्त मिळतेच; पण ते खाण्यासाठी चांगले असल्याने शेतकरी या वाणांकडे वळला आहे.

‘महाबीज’कडून बियाण्यांची उपलब्धता स्थानिक विक्रेत्याकडे केली आहे. भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, उडदाच्या सर्वच वाणांवर प्रतिकिलो २० रुपये अनुदान दिले जाते. शेतकºयांनी ‘महाबीज’चे बियाणे खरेदी करताना सात-बारा, आधार कार्ड, फोन क्रमांक विक्रेत्यांना दिल्यानंतर अनुदान वजा करून पैसे द्यायचे आहेत. सोयाबीन १४ हजार क्विंटल, भात १८ हजार २७१ क्विंटल, ज्वारी ४१३ क्विंटल, भूईमूग २४०० क्विंटल यांसह इतर अशी ३५ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यांपैकी २२ हजार ९५८ क्विंटल बियाणे ‘महाबीज’कडून उपलब्ध झाले आहे.

यंदा खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. या हंगामासाठी १ लाख ९१ हजार टन रासायनिक खतांची मागणी होती; त्यापैकी १ लाख ४३ हजार टनाला मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी एप्रिल अखेर ७७ हजार टन खते उपलब्ध झाली आहेत.घरच्या बियाण्यांचे प्रमाण घटले : घरचे बियाणे काढण्याच्या आपल्याकडील पद्धतीमुळे उत्पादकतेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे घरच्या बियाण्यांचे प्रमाण कमी होत चालले असून, भात ४३ टक्के, सोयाबीन ३४ टक्के, तुरीसह इतर कडधान्ये ४२ टक्के, तर भुईमूग ३ टक्के घरातील बियाणे वापरले जाते.कृषी विभाग सज्जकृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी पुरेशा बियाणे, खतांची उपलब्धता करून ठेवली आहे.शेतकºयांना सहज बियाणे व खते उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांना सूचना केल्या आहेत. 

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज असून, बियाणे व खतांची पुरेशी उपलब्धता आहे. शेतकºयांनी दर्जेदार बियाण्यांची निवड करावी, उगवण क्षमता तपासूनच घरातील बियाण्यांचा वापर करावा.- चंद्रकांत सूर्यवंशी (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद)वळवाचा पाऊस चांगला झाल्याने धूळवाफ पेरणीसाठी शेतकºयांची धांदल उडाली आहे. यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याने खरिपाची पेरणी थोडी कमी होईल, असा अंदाज असून, पारंपरिकपेक्षा सुधारित बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती आहे.- नितीन जंगम (बियाणे, खत विक्रेते)

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर