शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

भाताच्या ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची पसंती : बियाण्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:19 IST

कोल्हापूर : धूळवाफ पेरणीस सुरुवात झाल्याने भाताच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

ठळक मुद्देप्रतिकिलो २० रुपयांचे अनुदान; ७६ हजार टन खत उपलब्ध

कोल्हापूर : धूळवाफ पेरणीस सुरुवात झाल्याने भाताच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. बाजारात विविध वाणांच्या बियाण्यांची रेलचेल दिसत असली तरी यंदा ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसत आहे. विशेषत: भातामध्ये पारंपरिक वाणाला नापसंती दाखवीत ‘संशोधित’, ‘अवनि’, ‘पूनम’, ‘तृप्ती’, आदी सुधारित वाणांची खरेदी करताना दिसत आहेत.

जिल्ह्यात खरीप पेरणीत अन्नधान्याचे १ लाख ४८ हजार हेक्टरवर सर्वाधिक क्षेत्र आहे. अन्नधान्यामध्ये भात व नागलीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. भात बियाण्यांची सहज उपलब्धता पाहता पूर्वी पारंपरिक वाणांचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल होता; पण उत्पादकता व बाजारातील दर पाहता, सुधारित बियाणे वापराकडे शेतकरी वळले आहेत. पारंपरिक बियाण्याची उत्पादकता कमी असल्याने ‘संशोधित’ वाण वापरले जात आहे. यंदा ‘अवनि’, ‘पूनम’, ‘तृप्ती’, ‘शुभांगी’, ‘वायएसआर’ यांचा वापर वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यांद्वारे उत्पादन जास्त मिळतेच; पण ते खाण्यासाठी चांगले असल्याने शेतकरी या वाणांकडे वळला आहे.

‘महाबीज’कडून बियाण्यांची उपलब्धता स्थानिक विक्रेत्याकडे केली आहे. भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, उडदाच्या सर्वच वाणांवर प्रतिकिलो २० रुपये अनुदान दिले जाते. शेतकºयांनी ‘महाबीज’चे बियाणे खरेदी करताना सात-बारा, आधार कार्ड, फोन क्रमांक विक्रेत्यांना दिल्यानंतर अनुदान वजा करून पैसे द्यायचे आहेत. सोयाबीन १४ हजार क्विंटल, भात १८ हजार २७१ क्विंटल, ज्वारी ४१३ क्विंटल, भूईमूग २४०० क्विंटल यांसह इतर अशी ३५ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यांपैकी २२ हजार ९५८ क्विंटल बियाणे ‘महाबीज’कडून उपलब्ध झाले आहे.

यंदा खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. या हंगामासाठी १ लाख ९१ हजार टन रासायनिक खतांची मागणी होती; त्यापैकी १ लाख ४३ हजार टनाला मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी एप्रिल अखेर ७७ हजार टन खते उपलब्ध झाली आहेत.घरच्या बियाण्यांचे प्रमाण घटले : घरचे बियाणे काढण्याच्या आपल्याकडील पद्धतीमुळे उत्पादकतेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे घरच्या बियाण्यांचे प्रमाण कमी होत चालले असून, भात ४३ टक्के, सोयाबीन ३४ टक्के, तुरीसह इतर कडधान्ये ४२ टक्के, तर भुईमूग ३ टक्के घरातील बियाणे वापरले जाते.कृषी विभाग सज्जकृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी पुरेशा बियाणे, खतांची उपलब्धता करून ठेवली आहे.शेतकºयांना सहज बियाणे व खते उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांना सूचना केल्या आहेत. 

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज असून, बियाणे व खतांची पुरेशी उपलब्धता आहे. शेतकºयांनी दर्जेदार बियाण्यांची निवड करावी, उगवण क्षमता तपासूनच घरातील बियाण्यांचा वापर करावा.- चंद्रकांत सूर्यवंशी (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद)वळवाचा पाऊस चांगला झाल्याने धूळवाफ पेरणीसाठी शेतकºयांची धांदल उडाली आहे. यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याने खरिपाची पेरणी थोडी कमी होईल, असा अंदाज असून, पारंपरिकपेक्षा सुधारित बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती आहे.- नितीन जंगम (बियाणे, खत विक्रेते)

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर