शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: कागलचा सीमा तपासणी नाका शेतकऱ्यांनी पाडला बंद, पावती केल्याविना वाहने सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:59 IST

कागल : येथील महामार्गावरील एकात्मिक सीमा तपासणी नाक्यासाठी शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी नाका चालविणाऱ्या कंपनीच्या विरोधात आक्रमक होत दीड ...

कागल : येथील महामार्गावरील एकात्मिक सीमा तपासणी नाक्यासाठी शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी नाका चालविणाऱ्या कंपनीच्या विरोधात आक्रमक होत दीड तास नाका बंद पाडला. शेतकऱ्यांच्या मागण्याबद्दल कंपनीने दिलेली आश्वासने पाळली नसल्याच्या कारणावरून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तपासणी नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.कागलचे पोलीस निरीक्षक अजय लोहार यांनी हस्तक्षेप करीत व्यवस्थापन व शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात संजय गोनुगडे, महेश घाटगे, योगेश गाताडे आदी सहभागी झाले होते. व्यवस्थापनातर्फे श्रीरॉय आणि निलेश भोसले यांनी चर्चेत सहभाग घेतला. आंदोलकांनी श्री रॉय यांना धारेवर धरल्याने काही काळ तणावही निर्माण झाला होता. बराच वेळ नाक्यावर वाहने उभी करावी लागल्याने चालकांचाही संयम सुटला होता. त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर कोणतीही पावती केल्याविना ही वाहने सोडण्यात येत होती.

शेतकऱ्यांच्या मागण्या कंपनीने नाका सुरू करण्यापूर्वी येथे ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे मान्य केले होते. मात्र फक्त तिघांना नोकरी दिली आहे. अजून बारा जणांना नोकरी देणे बाकी आहे. काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजूनही देण्यात आलेली नाही. या ठिकाणी असणारे दुकान गाळेही शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले आहे. पण कंपनीमुळेच हा विषय आता न्यायप्रविष्ट झाला आहे. उर्वरित शेतामध्ये जाण्यासाठी वाटेचाही प्रश्न सोडविण्यात आलेला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलtollplazaटोलनाकाFarmerशेतकरी