शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकांना सामोरे, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:21 IST

पक्ष संघटन मजबूत करीत असतानाच सामान्य, गोरगरिबांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याची सूचना

कोल्हापूर : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट व त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर झालेला परिणामाचा आढावा घेत आगामी काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांना सामाेरे जायचे आहे. त्यादृष्टीने बांधणी करा, अशी सूचना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी दिल्या असल्याची माहिती काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी दिली.ते म्हणाले, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या समवेत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी यांची मंगळवारी दिल्लीत बैठक झाली. यामध्ये तब्बल साडेतीन तास राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलण्याची संधी दिली. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट होऊन महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. परंतु या दोन्ही पक्षांतराबद्दल सामान्य माणसाच्या मनांत कमालीची चीड आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसची जबाबदारी जास्त वाढली आहे. पक्ष संघटन मजबूत करीत असतानाच सामान्य, गोरगरिबांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याची सूचना राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. आगामी काळात महाविकास आघाडी म्हणूनच सगळ्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे, त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर काम करण्याची सूचनाही त्यांनी दिली. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने महाविकास आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केल्याने आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना ताकद मिळाली आहे. या तिघांनी चांगली मोट बांधली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते हवा निर्माण करू शकतात असा त्यांना विश्वास वाटत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी