शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मंत्रालयातून बोलतोय; उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर झालाय.. तत्काळ ५० हजार पाठवा; सरपंचांना येताहेत फोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:41 IST

राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार व स्वनिधी म्हणून २५ लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी खर्च म्हणून ५० हजार रुपये माझ्या गुगल पे नंबरवर पाठवा

रमेश सुतारगणेशवाडी (कोल्हापूर) : मी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागामधून सचिव बोलतोय, तुमचं नाव राजीव गांधी उत्कृष्ट सरपंच पुरस्कारांसाठी निवडले असून तुम्हाला शासनाच्यावतीने पुरस्कार व रोख रक्कम २५ लाख रुपये मिळणार आहेत. तुमची फाईल तयार आहे. माझ्या गुगल पे नंबरवर ५० हजार रुपये पाठवा, असे फोन गावोगावच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंचांना येत आहेत. शिरोळ तालुक्यातील अनेक सरपंचांनाही असे फोन आले आहेत.औरवाडचे लोकनियुक्त सरपंच शफी पटेल यांना मोबाईल (क्रमांक ८६९८७८२७१०) वरून फोन आला. हा फोन माने नावाने नोंद आहे. त्यात मी सामान्य प्रशासन विभागामधून बोलतोय शिरोळ तालुक्यातील २६ पैकी तीन गावांतील सरपंचांची नावे राजीव गांधी उत्कृष्ट सरपंच पुरस्कारांसाठी निवडली आहेत. त्यात औरवाडमधून तुमची निवड झाली आहे. तुमचा प्रस्ताव आमच्याकडे अगोदरच्याच सरपंचांनी दिला आहे. तुम्हाला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार व स्वनिधी म्हणून २५ लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी खर्च म्हणून ५० हजार रुपये माझ्या गुगल पे नंबरवर पाठवा, असे सांगण्यात आले. सरपंच पटेल यांनी पुरस्काराबद्दल अधिक चौकशी केल्यावर त्या व्यक्तीने टाळाटाळ केली. त्यामुळे पटेल यांना शंका आली. त्यांनी ग्रामसेवक बी. एन. केदार यांना विचारणा केली असता पुरस्कारासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून कोणत्याही सूचना अथवा पत्र आले नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये माहिती घेतली असता राज्य शासनाकडून असा कोणताही पुरस्कार दिला जात नसल्याचे स्पष्ट झाले. याअगोदरही तालुक्यातील सरपंचांची पुरस्कार देतो म्हणून फसवणूक झाली आहे. मात्र, बदनामीमुळे कोणी सांगण्यास पुढे आलेले नाही.

राज्य शासन पुरस्कारांसाठी कधीही पैशांची मागणी करत नाही. त्यामुळे खात्री केल्याशिवाय अशा फोन कॉलना प्रतिसाद देऊ नका. फसवणुकीपासून सावध रहा. - शंकर कवितके, गटविकास अधिकारी, शिरोळ, जि.कोल्हापूर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीsarpanchसरपंच