शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
3
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
4
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
5
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
7
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
8
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
9
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
10
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
11
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
12
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
13
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
14
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
15
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
16
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
17
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
18
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
19
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
20
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव

Kolhapur Politics: नव्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दुखणं मात्र जुनचं, नेत्यांच्या भूमिकेने पक्ष वाढ खुंटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:49 IST

अस्तित्त्वासाठी झुंज

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तरी नेत्यांची मानसिकता बदलत नसल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांचा उद्रेक पाहावयास मिळू लागला आहे. आपापल्या मतदारसंघापुरते राजकारण, वेळ पडल्यास दुसऱ्या मतदारसंघात मित्रत्त्वाचे नाते जोपासणे हे धोरणच आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळावर आल्याने या पक्षाची वाढ खुंटली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीची नव्याने स्थापना झाली तरी पदाधिकाऱ्यांचे हे दुखणे मात्र जुनेच आहे.राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राज्यातील वजनदार नेत्यांच्या ताकदीवर उभा राहिलेला पक्ष, असेच म्हटले जाते. त्याला कारणेही तशीच असून, प्रत्येक जिल्ह्यातील साखर कारखानदार व सहकारातील बड्या नेत्यांना घेऊन पवार यांनी १९९९ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पंधरा वर्षे पक्ष सत्तेत राहिला. त्या सत्तेच्या ताकदीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष मजबुतीने उभा राहणे अपेक्षित होते.पण, प्रत्येक जिल्ह्यात या नेतेमंडळींनी सत्तेच्या ताकदीचा वापर आपल्या मतदारसंघापुरताच मर्यादित ठेवल्याने पक्ष मजबुतीने वाढलाच नाही. त्यामुळे चार जिल्ह्यांपुरता राष्ट्रवादी काँग्रेस असे हिणवले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांनी नवीन राष्ट्रवादीची स्थापना केली. एकसंध असताना अडचणीत असलेल्या पक्षाला फुटीनंतर आता कार्यकर्त्यांचा शोध घ्यावा लागत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात तर एकसंध राष्ट्रवादी असताना आमदार, खासदारांचा आलेख खाली आला. आपल्या मतदारसंघापुरतेच बघायचे, हे नेत्यांचे धाेरणच पक्षाला मारक ठरले. फुटीनंतरही तोच कित्ता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने गिरवला, ‘कागल’, ‘चंदगड’, ‘इचलकरंजी’ या विधानसभेच्या तीन जागा लढवल्या, हे मतदारसंघ सोडून पक्षाचे नेते इतर मतदारसंघात लक्ष देत नाहीत, असा थेट आरोप माजी आमदार राजीव आवळे यांनी केला.आवळे यांच्या आरोपात तथ्य आहे, एकसंध राष्ट्रवादी असतानाही ‘कागल’, ‘चंदगड’, ‘राधानगरी’ सोडले, तर इतर सात मतदारसंघात नेत्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे या ठिकाणी पक्ष अस्तित्वशून्य बनले. फुटीनंतरही दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फारसा बदल झाला नाही, हे वास्तव आहे.

सत्तेशिवाय पक्ष टिकूच शकत नाहीराष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, यामध्ये २०१४ ते २०१९ आणि २०२२ ते २०२३ हा सहा वर्षाचा कार्यकाळ सोडला तर अखंडपणे पक्ष सत्तेत आहे. पक्षच नव्हे, काही नेतेच सत्तेत राहिले आहेत. एकूण वाटचाल पाहिली तर सत्तेशिवाय पक्ष टिकूच शकत नाही, असेच चित्र राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात आहे.

राजीव आवळे यांची खदखद योग्य आहे, एकसंध राष्ट्रवादी असताना या चुका झाल्याने पक्ष वाढीवर मर्यादा आल्या. मात्र, आता तसे होणार नाही. प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका आमची आहे. - आर. के. पोवार (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)