शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

Kolhapur Politics: नव्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दुखणं मात्र जुनचं, नेत्यांच्या भूमिकेने पक्ष वाढ खुंटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:49 IST

अस्तित्त्वासाठी झुंज

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तरी नेत्यांची मानसिकता बदलत नसल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांचा उद्रेक पाहावयास मिळू लागला आहे. आपापल्या मतदारसंघापुरते राजकारण, वेळ पडल्यास दुसऱ्या मतदारसंघात मित्रत्त्वाचे नाते जोपासणे हे धोरणच आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळावर आल्याने या पक्षाची वाढ खुंटली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीची नव्याने स्थापना झाली तरी पदाधिकाऱ्यांचे हे दुखणे मात्र जुनेच आहे.राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राज्यातील वजनदार नेत्यांच्या ताकदीवर उभा राहिलेला पक्ष, असेच म्हटले जाते. त्याला कारणेही तशीच असून, प्रत्येक जिल्ह्यातील साखर कारखानदार व सहकारातील बड्या नेत्यांना घेऊन पवार यांनी १९९९ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पंधरा वर्षे पक्ष सत्तेत राहिला. त्या सत्तेच्या ताकदीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष मजबुतीने उभा राहणे अपेक्षित होते.पण, प्रत्येक जिल्ह्यात या नेतेमंडळींनी सत्तेच्या ताकदीचा वापर आपल्या मतदारसंघापुरताच मर्यादित ठेवल्याने पक्ष मजबुतीने वाढलाच नाही. त्यामुळे चार जिल्ह्यांपुरता राष्ट्रवादी काँग्रेस असे हिणवले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांनी नवीन राष्ट्रवादीची स्थापना केली. एकसंध असताना अडचणीत असलेल्या पक्षाला फुटीनंतर आता कार्यकर्त्यांचा शोध घ्यावा लागत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात तर एकसंध राष्ट्रवादी असताना आमदार, खासदारांचा आलेख खाली आला. आपल्या मतदारसंघापुरतेच बघायचे, हे नेत्यांचे धाेरणच पक्षाला मारक ठरले. फुटीनंतरही तोच कित्ता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने गिरवला, ‘कागल’, ‘चंदगड’, ‘इचलकरंजी’ या विधानसभेच्या तीन जागा लढवल्या, हे मतदारसंघ सोडून पक्षाचे नेते इतर मतदारसंघात लक्ष देत नाहीत, असा थेट आरोप माजी आमदार राजीव आवळे यांनी केला.आवळे यांच्या आरोपात तथ्य आहे, एकसंध राष्ट्रवादी असतानाही ‘कागल’, ‘चंदगड’, ‘राधानगरी’ सोडले, तर इतर सात मतदारसंघात नेत्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे या ठिकाणी पक्ष अस्तित्वशून्य बनले. फुटीनंतरही दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फारसा बदल झाला नाही, हे वास्तव आहे.

सत्तेशिवाय पक्ष टिकूच शकत नाहीराष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, यामध्ये २०१४ ते २०१९ आणि २०२२ ते २०२३ हा सहा वर्षाचा कार्यकाळ सोडला तर अखंडपणे पक्ष सत्तेत आहे. पक्षच नव्हे, काही नेतेच सत्तेत राहिले आहेत. एकूण वाटचाल पाहिली तर सत्तेशिवाय पक्ष टिकूच शकत नाही, असेच चित्र राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात आहे.

राजीव आवळे यांची खदखद योग्य आहे, एकसंध राष्ट्रवादी असताना या चुका झाल्याने पक्ष वाढीवर मर्यादा आल्या. मात्र, आता तसे होणार नाही. प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका आमची आहे. - आर. के. पोवार (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)