शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

आठ महिने उलटले तरी पीएच.डी फेलोशिपचा प्रश्न रखडलेलाच; सारथी, बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 12:09 IST

तीन हजार ४७३ विद्यार्थ्यांवर अन्याय

कोल्हापूर : गेल्या आठ महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रातून सारथी, बार्टी व महाज्योतीचा संशोधक विद्यार्थ्यांनी सरसकट फेलोशिप मिळावी म्हणून बेमुदत साखळी उपोषण, लक्षणीय आंदोलन व मोर्चे काढले. मात्र, राज्य सरकारने यावर कोणताच निर्णय न घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांमध्ये सरकारविरोधात असंतोष उफाळला आहे. पक्षाच्या अध्यक्षांना गाड्या घेण्यासाठी २५ लाख रुपये आहेत. मात्र, संशोधन करू इच्छिणाऱ्यांना पाच वर्षांसाठी २५ लाख देऊ शकत नाही, या शब्दांत विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.सरकारने ३० ऑक्टोबरचा जीआर काढत समान धोरणाच्या नावाखाली सारथी, बार्टी व महाज्योती संस्थेचा स्वायत्त दर्जा, अधिकार काढून घेतले. त्यातून संशोधक विद्यार्थ्यांच्या २०२३ बॅचच्या पीएच. डी. फेलोशिपच्या प्रत्येक संस्थेसाठी २०० जागा केल्या. सारथीकडून याआधी केवळ मुलाखत घेऊन सरसकट फेलोशिप देण्यात आली होती; पण २०२३ मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन अधिछात्रवृत्ती अर्थात सीएसएमआरएफ - २०२३च्या जाहिरातीत कोणताही परीक्षा व जागेचा उल्लेख नसताना नंतर वारंवार संस्थेकडून नियमांमध्ये बदल करत २०० जागा व सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.जागा कमी झाल्याने अनेकांना ही फेलोशिप मिळणार नसल्याने विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरसकट टप्पेवारीने सर्वांना फेलोशिप दिली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही.

३ हजार ४७३ विद्यार्थ्यांवर अन्यायअर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेलोशिपवर कोणतेही भाष्य न करता फक्त चारही संस्थांमध्ये समान धोरण राबवीत असल्याचे सांगितले. यामुळे तिन्ही संस्थांमधील ३ हजार ४७३ या संशोधक पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना फिलोशिप न मिळाल्यामुळे पीएच. डी.चे शिक्षण बंद करावे लागणार असल्याचे सारथी कृती समिती अध्यक्ष संभाजी खोत, बाबूराव माने, राहुल निकम व सौरभ पवार यांनी सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात संशोधन क्षेत्रासाठी सारथीसाठी कोणतीही भरीव आर्थिक तरतूद केली नाही. अजित पवार यांनी पक्षातील अध्यक्षांना जशा मोठ्या मनाने २५ लाखांच्या गाड्या वाटप केल्या, त्याच मोठ्या मनाने महाराष्ट्रातील सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना सरकारी तिजोरीतून पाच वर्षांच्या संशोधन कार्यासाठी २५ लाखांची फेलोशिप देऊन न्याय मिळवून द्यावा. - संभाजी खोत, अध्यक्ष, सारथी कृती समिती, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधनStudentविद्यार्थी