शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महापुरातील कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट; झूम प्रकल्पात फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:46 IST

कोल्हापूर : महापुरामुळे शहरात निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी कमी करण्यासह या कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट ...

ठळक मुद्देमहापुरातील कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट; झूम प्रकल्पात फवारणीमहापालिका, आर्किटेक्ट असोसिएशनकडून बायोसॅनिटेशनची प्रक्रिया

कोल्हापूर : महापुरामुळे शहरात निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी कमी करण्यासह या कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याचे काम महानगरपालिका, असोसिएशन आॅफ अर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूर यांच्याद्वारे गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यात बायोसॅनिटेशन आणि बायोकल्चर यांची फवारणी झूम प्रकल्पात येणाऱ्या नव्या कचऱ्यावर केली जात आहे.पुराच्या पाण्यामुळे निर्माण झालेला कचरा मोठ्या प्रमाणात झूम प्रकल्पामध्ये येत आहे. साधारणत: रोज एक टन कचरा या प्रकल्पामध्ये टाकण्यात येत आहे. त्यात कापसाच्या गाद्या, धान्य, कपडे, कागदी बॉक्स, फर्निचर, आदींचा समावेश आहे.

हा कचरा कुजणे सुरू झाले आहे. त्यातून लिंचेट बाहेर पडत असल्याने या कचऱ्यांच्या दुर्गंधीची तीव्रता अधिक आहे. ही दुर्गंधी कमी करणे तातडीने गरजेचे होते. फॉगिंग मशीन, अन्य रसायने यांच्या वापरावर मर्यादा होत्या; त्यामुळे या कचऱ्यांची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका आणि असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सने पाऊल टाकले आहे. बायोसॅनिटेशन आणि बायोकल्चर यांची फवारणी अग्निशमन दलाच्या चार टँकरद्वारे या कचऱ्यांवर केली जात आहे; त्यामुळे कचऱ्यांची दुर्गंधी कमी होण्यास मदत होत आहे.

कम्पोस्ट खतामध्ये रूपांतरबायोसॅनिटेशन आणि कल्चर यांच्या फवारणीमुळे महापुरातील कचऱ्याची दुर्गंधी साधारणत: ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. या फवारणीमुळे संंबंधित कचऱ्यातील विषारी वायू शोषले जाते आणि आॅक्सिजन हवेत सोडला जातो. या कचऱ्यांचे विघटन होऊन दोन महिन्यांत त्याचे कम्पोस्ट खत तयार होते. पर्यावरणपूरक पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

झूम प्रकल्पातील कचऱ्यावर गुरुवारपासून फवारणी करण्यात येत आहे. महापालिका, आर्किटेक्ट असोसिएशनतर्फे काम सुरू आहे; त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मदत झाली असल्याचे असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी सांगितले.

महापुरामुळे निर्माण झालेला कचरा झूम प्रकल्प येण्याचे कमी होईपर्यंत संबंधित फवारणी केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील नाल्यांच्या स्वच्छतेसाठी या प्रक्रियेचा उपयोग केला जाणार असल्याचे कोराणे यांनी सांगितले.

लिंचेट बाहेर पडून दुर्गंधीमहापुराच्या पाण्यातील सर्व कचरा भिजलेला आहे. शिवाय तो कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; त्यामुळे त्यातून लिंचेट बाहेर पडून दुर्गंधी सुटलेली आहे; त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. ते टाळण्यासाठी संबंधित फवारणी करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर