शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

यड्राव परिसरातील उद्योजक दि्वधा मनस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

घन:श्याम कुंभार यड्राव : येथील परिसरातील सर्व उद्योजकांना कोरोनामुळे होणाऱ्या लॉकडाऊनचा विपरित परिणाम सहन करावा लागत आहे, तर शासकीय ...

घन:श्याम कुंभार

यड्राव : येथील परिसरातील सर्व उद्योजकांना कोरोनामुळे होणाऱ्या लॉकडाऊनचा विपरित परिणाम सहन करावा लागत आहे, तर शासकीय नियमानुसार उद्योग सुरू की बंद ठेवायचा, या दि्वधा मनस्थितीत उद्योजक आहेत. भर उन्हाळ्यात दुसऱ्या लॉकडाऊनची झळ बसणार आहे. या विचित्र परिस्थितीमुळे परिसरातील अर्थचक्र मंदावण्याची भीती निर्माण झाली आहे.

मागील लॉकडाऊननंतर आता कोठे सर्व उद्योगांच्या चाकांनी गती घेतली होती. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात लग्नसराईसह विविध सणांसाठी कापड खरेदी होत असल्याने वस्त्रोद्योगासाठी हा कालावधी फायदेशीर आहे. परंतु या कालावधीतच पुन्हा लॉकडाऊन झाल्याने उद्योग बंद ठेवण्याची सक्ती उद्योजकांवर आली आहे.

येथील इंजिनिअरिंग व्यवसायांमध्ये तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या सुट्ट्या भागांचा पुरवठा पुण्या-मुंबईच्या कंपन्यांना होतो. पुणे येथील इंजिनिअरिंग उद्योग सुरू आहे. परंतु येथे हा उद्योग बंद असल्याने त्यांना पुरेसा पुरवठा होत नाही. त्यांच्याकडून नियमित पुरवठ्यासाठी दबाव येत आहे. परिणामी पुरवठा न झाल्यास गेल्या अनेक वर्षांचा व्यापार संबंध तुटणार असल्याने उद्योग आर्थिक अडचणीत येऊ शकतात.

या परिसरात पार्वती औद्योगिक वसाहतीसह इतर भागात या दोन्ही उद्योगांसह विविध प्रकारचे उद्योग आहेत. यामध्ये बहुतांशी कामगार हे परप्रांतीय व बाहेरील भागातील आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव, त्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, त्याचबरोबर कोरोनामुळे निधन झाल्यावर परस्पर होणारा अंतिम संस्कार यामुळे परप्रांतीय कामगार धास्तावला आहे. तो अशा अडचणीच्या काळात परिवारासोबतच राहण्याच्या मनस्थितीत आहे.

शासकीय नियमानुसार उद्योग सुरू ठेवला आणि कामावर येणाऱ्या कामगारास कोरोनाची बाधा झाली तर त्याचा खर्च कोण करणार, ही मनस्थिती उद्योजकांची आहे. उद्योग बंद ठेवला तर कामगार येथेच राहतील याचीही खात्री नाही. याचबरोबर उद्योग बंद असला तरी, उद्योगासाठीचे कर्जाचे व्याज थांबत नाही. लाईट बिल थांबत नाही. कामगार मागतील त्याप्रमाणे ॲडव्हान्स रक्कम द्यावी लागणार, यासारखे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत.

चौकट : सरकारी नियम उद्योगांनाच का?

शासनाच्या निकषानुसार उद्योगांच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था असावी, लसीकरण सक्तीचे असा नियम दाखवला जातो. परंतु बँक व शासकीय नोकरांना नोकरीच्या ठिकाणी जेवण, राहण्याची व्यवस्था नाही. तरी पण त्यांची नोकरी सुरू आहे. हा नियम फक्त उद्योगांनाच का? सरकारी व बँक नोकरांनाही लावा, असा मेसेज सोशल मीडियातून फिरत आहे.

चौकट: दिवसाला सहा कोटी जीएसटी

इचलकरंजी परिसरातून वस्त्रोद्योगामधून शासनाला प्रतिदिन सहा कोटी रुपये जीएसटीमधून उत्पन्न मिळते. इचलकरंजी परिसरात या उद्योगांमध्ये ३५ हजार कामगार आहेत. प्रत्येक कामगाराची टेस्ट करण्यास प्रयोगशाळांवर मर्यादा येत आहेत. तरी शासनाने नाशिक, पुणे, अहमदनगर ,भिवंडीप्रमाणे येथील वस्त्रोद्योगाला नियमात शिथिलता द्यावी, असे चंद्रकांत पाटील (उद्योजक व सन्मती बँक संचालक) यांनी सांगितले.