शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

यड्राव परिसरातील उद्योजक दि्वधा मनस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

घन:श्याम कुंभार यड्राव : येथील परिसरातील सर्व उद्योजकांना कोरोनामुळे होणाऱ्या लॉकडाऊनचा विपरित परिणाम सहन करावा लागत आहे, तर शासकीय ...

घन:श्याम कुंभार

यड्राव : येथील परिसरातील सर्व उद्योजकांना कोरोनामुळे होणाऱ्या लॉकडाऊनचा विपरित परिणाम सहन करावा लागत आहे, तर शासकीय नियमानुसार उद्योग सुरू की बंद ठेवायचा, या दि्वधा मनस्थितीत उद्योजक आहेत. भर उन्हाळ्यात दुसऱ्या लॉकडाऊनची झळ बसणार आहे. या विचित्र परिस्थितीमुळे परिसरातील अर्थचक्र मंदावण्याची भीती निर्माण झाली आहे.

मागील लॉकडाऊननंतर आता कोठे सर्व उद्योगांच्या चाकांनी गती घेतली होती. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात लग्नसराईसह विविध सणांसाठी कापड खरेदी होत असल्याने वस्त्रोद्योगासाठी हा कालावधी फायदेशीर आहे. परंतु या कालावधीतच पुन्हा लॉकडाऊन झाल्याने उद्योग बंद ठेवण्याची सक्ती उद्योजकांवर आली आहे.

येथील इंजिनिअरिंग व्यवसायांमध्ये तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या सुट्ट्या भागांचा पुरवठा पुण्या-मुंबईच्या कंपन्यांना होतो. पुणे येथील इंजिनिअरिंग उद्योग सुरू आहे. परंतु येथे हा उद्योग बंद असल्याने त्यांना पुरेसा पुरवठा होत नाही. त्यांच्याकडून नियमित पुरवठ्यासाठी दबाव येत आहे. परिणामी पुरवठा न झाल्यास गेल्या अनेक वर्षांचा व्यापार संबंध तुटणार असल्याने उद्योग आर्थिक अडचणीत येऊ शकतात.

या परिसरात पार्वती औद्योगिक वसाहतीसह इतर भागात या दोन्ही उद्योगांसह विविध प्रकारचे उद्योग आहेत. यामध्ये बहुतांशी कामगार हे परप्रांतीय व बाहेरील भागातील आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव, त्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, त्याचबरोबर कोरोनामुळे निधन झाल्यावर परस्पर होणारा अंतिम संस्कार यामुळे परप्रांतीय कामगार धास्तावला आहे. तो अशा अडचणीच्या काळात परिवारासोबतच राहण्याच्या मनस्थितीत आहे.

शासकीय नियमानुसार उद्योग सुरू ठेवला आणि कामावर येणाऱ्या कामगारास कोरोनाची बाधा झाली तर त्याचा खर्च कोण करणार, ही मनस्थिती उद्योजकांची आहे. उद्योग बंद ठेवला तर कामगार येथेच राहतील याचीही खात्री नाही. याचबरोबर उद्योग बंद असला तरी, उद्योगासाठीचे कर्जाचे व्याज थांबत नाही. लाईट बिल थांबत नाही. कामगार मागतील त्याप्रमाणे ॲडव्हान्स रक्कम द्यावी लागणार, यासारखे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत.

चौकट : सरकारी नियम उद्योगांनाच का?

शासनाच्या निकषानुसार उद्योगांच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था असावी, लसीकरण सक्तीचे असा नियम दाखवला जातो. परंतु बँक व शासकीय नोकरांना नोकरीच्या ठिकाणी जेवण, राहण्याची व्यवस्था नाही. तरी पण त्यांची नोकरी सुरू आहे. हा नियम फक्त उद्योगांनाच का? सरकारी व बँक नोकरांनाही लावा, असा मेसेज सोशल मीडियातून फिरत आहे.

चौकट: दिवसाला सहा कोटी जीएसटी

इचलकरंजी परिसरातून वस्त्रोद्योगामधून शासनाला प्रतिदिन सहा कोटी रुपये जीएसटीमधून उत्पन्न मिळते. इचलकरंजी परिसरात या उद्योगांमध्ये ३५ हजार कामगार आहेत. प्रत्येक कामगाराची टेस्ट करण्यास प्रयोगशाळांवर मर्यादा येत आहेत. तरी शासनाने नाशिक, पुणे, अहमदनगर ,भिवंडीप्रमाणे येथील वस्त्रोद्योगाला नियमात शिथिलता द्यावी, असे चंद्रकांत पाटील (उद्योजक व सन्मती बँक संचालक) यांनी सांगितले.