शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपांच्या वीज जोडणीेस आॅगस्टपर्यंत सुरक्षा -एन. डी. पाटील : अडीच लाख जोडणीचा मार्ग मोकळा; बिल कमी होण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:23 IST

कोल्हापूर : राज्यातील ४१ लाख शेतीपंपधारकांच्या वीज बिलांची १५ आॅगस्ट २०१८पर्यंत तपासणी होऊन दुरुस्ती होईल. त्यानंतर अचूक बिलाच्या आधारेच नवीन कृषी संजीवनी योजना

कोल्हापूर : राज्यातील ४१ लाख शेतीपंपधारकांच्या वीज बिलांची १५ आॅगस्ट २०१८पर्यंत तपासणी होऊन दुरुस्ती होईल. त्यानंतर अचूक बिलाच्या आधारेच नवीन कृषी संजीवनी योजना राबविण्यात येईल. तोपर्यंत शेतीपंपधारकांची जोडणी (कनेक्शन) तोडली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती महाराष्टÑ राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्षप्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडीच लाख शेतीपंपधारकांना जोडण्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.यावेळी प्रा. पाटील म्हणाले, शेतीपंपधारकांच्या मागण्यांसाठी फेडरेशनतर्फे २७ मार्चला मुंबईत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.यामध्ये राज्यातील ४१ लाख कृषिपंपधारक वीज ग्राहकांची वीज बिले १५ आॅगस्टपर्यंत तपासून दुरुस्त करण्यात येतील. त्यानंतर अचूक बिलाच्या आधारे नवीन कृषी संजीवनी योजना राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्थांची बिले ही प्रतियुनिट १.१६ रुपये याप्रमाणेच ‘महावितरण’कडून भरून घेतली जाणार आहेत. त्याचबरोबर या सर्व उच्चदाब वीज ग्राहकांच्या बिलांमधील थकबाकी १५ आॅगस्टपर्यंत निकाली काढण्यात येईल. त्यामुळे या उन्हाळ्यासह आॅगस्टपर्यंत कोणत्याही शेतीपंपधारकाची जोडणी वीज बिलाअभावी तोडली जाणार नाही.प्रताप होगाडे म्हणाले, शेतीपंप वीज बिले तपासून दुरुस्त करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी ग्राहकांची बिले जवळपास ५० टक्क्यांनी कमी होतील. यामुळे ‘महावितरण’चा बोगस कारभार समोर येणार आहे. सबसिडीच्या माध्यमातून शेतकरी ग्राहकांचे सर्व पैसे सरकारने ‘महावितरण’कडे भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणला एकही पैसा देणे लागत नाही. १५ टक्के गळती असल्याचे सरकारला मान्य करावे लागेल. यामुळे जवळपास साडेनऊ हजार कोटींचा महसूल हा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बाहेर गेला आहे, ते समोर येईल.ते पुढे म्हणाले, सरकारचे सबसिडीच्या माध्यमातून महावितरणला दुप्पट पैसे गेले आहेत. गेल्या वर्षभरात चार हजार ८०० कोटींची सबसिडी सरकारने भरली असून, त्यातून जवळपास २४०० कोटीरुपये कमी होतील. या कमीझालेल्या पैशांतून शेतकºयांचे पैसे भरणे शक्य होईल.यावेळी बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील-किणीकर, आर. जी. तांबे, भगवान काटे, आर. के. पाटील, आदी उपस्थित होते.गेल्या चार ते पाच वर्षांपासून महावितरणकडे पैसे भरूनही शेतीपंपांच्या प्रलंबित असलेल्या जोडण्या देण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अडीच लाख शेतीपंपांच्या जोडण्या आता मिळणार आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील १० हजार, तर सांगलीतील २५ हजार जणांचा समावेश आहे, असे होगाडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी