शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

ऊर्जाबचत करणारे ‘फॅन’ही बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:38 AM

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने ‘महावितरण’च्या माध्यमातून ऊर्जाक्षम (एलईडी)‘उजाला’ योजनेची उपकरणे बाजारात आणली असून या योजनेमार्फत पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्बबरोबरच ट्यूब आणि फॅनही बाजारपेठेत आणले आहेत. कमी वॅटमध्ये जादा प्रकाश व विजेची ७० टक्के बचत करण्याचे तंत्र वापरले आहे.गेल्या दीड वर्षात संपूर्ण देशभरात सुमारे २७ कोटी ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने ‘महावितरण’च्या माध्यमातून ऊर्जाक्षम (एलईडी)‘उजाला’ योजनेची उपकरणे बाजारात आणली असून या योजनेमार्फत पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्बबरोबरच ट्यूब आणि फॅनही बाजारपेठेत आणले आहेत. कमी वॅटमध्ये जादा प्रकाश व विजेची ७० टक्के बचत करण्याचे तंत्र वापरले आहे.गेल्या दीड वर्षात संपूर्ण देशभरात सुमारे २७ कोटी ७९ लाख एलईडी बल्बची विक्री झाली आहे, तर महाराष्टÑात २ कोटी १५ लाख ६० हजार एलईडी बल्बची विक्री झाली आहे. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत एकूण २५ लाख ८८ हजार बल्बची विक्री करण्यात आली आहे. विजेची बचत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ईईएसएल (इलेक्ट्रीक इफेक्ट सर्व्हिस लिमिटेड) या कंपनीच्या अंतर्गत ‘महावितरण’च्या माध्यमातून ऊर्जाक्षम विजेची उपकरणे बाजारात आणली आहेत.पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्ब बाजारात आणले, कमी वॅटमध्ये जादा परिसर प्रकाशमय होत असल्याने त्याला ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता सरकारने एलईडी ट्यूब लाईट आणि फॅन बाजारात आणले आहेत. नामांकित कंपन्यांकडून ही उपकरणे निर्मिती करून सरकार ती आपल्या माध्यमातून आणत आहे. शहरासह मोठ-मोठ्या गावांत ‘महावितरण’च्या केंद्रांवर ही उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.आता पूर्वीच्या ७ वॅटऐवजी आता ९ वॅटचे बल्ब बाजारात आणले आहेत. त्याशिवाय पूर्वीच्या पारंपरिक ट्यूबला ४० वॅट वीज खर्चिक पडत होती. ती आता एलईडी ट्यूबला २० वॅट खर्च होते तर फॅनला लागणाºया ८० वॅटऐवजी एलईडी फॅनला ४८ वॅट वीज खर्च होणार आहे. यामुळे वीज बचतीला वाव मिळत आहे. ही उपकरणे सर्व जिल्ह्यात उपलब्ध झाली असून कोल्हापूर जिल्ह्याच्या सहा तालुक्यांत विक्री केंद्रे कार्यरत आहेत.प्रारंभीच्या काळात ७ वॅट बल्बची किंमत १०० रुपये होती; पण आता नव्याने आलेले एलईडी बल्ब ९ वॅटचे असून ३ वर्षे गॅरंटीसह त्याची किंमत अवघी ७० रुपये ठेवली आहे. शासनाच्या एलईडी बल्बच्या ‘उजाला’ योजनेमुळे गेल्या दीड वर्षात देशभरात स्वत:चे जाळे निर्माण केले असून सुमारे २७ कोटी ७९ लाख ७५ हजार ४११ एलईडी बल्बची विक्री केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात वर्षाकाठी सुमारे ३६१०० दशलक्ष युनिट विजेची बचत होत आहे.होणारी बचतकमी वॅटवर जादा प्रकाश देत असल्याने त्यामुळे विजेची बचत होत आहे.वीज निर्मितीसाठी दगडी कोळशावर होणारा १४४४० कोटींचा खर्च वाचला.संपूर्ण देशभरातील ७२२७ मेगावॅटची मागणी कमी झाली आहे.सुमारे ३ कोटी टन कार्बन डायर्नडाय आॅक्साईड वायूंचे उत्सर्जन टळल्याने पर्यावरणाला हातभार लागला आहे.