शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

समाजातील अनिष्ट रूढी संपवा : जिल्हा न्यायाधीश र. ना. बावनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:47 AM

प्रा. मिलिंद दांडेकर यांनी, ज्या तृतीयपंथींना आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, त्यांच्यासाठी नाईट कॉलेजमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देतृतीयपंथीयांसाठी विधि साक्षरता शिबिर

इचलकरंजी : समाजात प्रवाहित होण्यासाठी तुमच्यात परिवर्तन आवश्यक आहे. ‘पायगुण’ हा शब्द बाजूला करून ‘कर्तृत्व’ हा शब्द अंगीकृत करा. अनिष्ट रूढी संपवून टाका. त्यानंतर समाज नक्कीच तुम्हाला पाठबळ देईल. त्यातून मिळालेल्या कामात विश्वास निर्माण करा. त्यामुळे तुमचे प्रश्न सुटतील, असा विश्वास जिल्हा न्यायाधीश र. ना. बावनकर यांनी तृतीयपंथींना दिला.

तृतीयपंथीयांना समाजात प्रवाहित करून त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आयोजित विधि साक्षरता शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

हातकणंगले तालुका विधि सेवा समिती इचलकरंजी, कन्या महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना व रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. बावनकर म्हणाले, तुम्हाला समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी या समाजातील अनेक संस्था, व्यक्तींनी पुढाकार घेऊन काम दिले आहे. त्या कामात विश्वासार्हता व प्रामाणिकपणा जोपासून संबंधितांना न्याय द्या. मिळालेले काम टिकवून ठेवा, असे आवाहन केले. यावेळी दिवाणी न्यायाधीश ए. पी. कोकरे व सरदिवाणी न्यायाधीश एस. ए. खलाने यांनी सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांसाठी लागू केलेल्या कायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, उद्योगपती मदन कारंडे, डॉ. प्रशांत कांबळे,आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. मिलिंद दांडेकर यांनी, ज्या तृतीयपंथींना आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, त्यांच्यासाठी नाईट कॉलेजमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.

अनेकांनी केली काम देण्याची घोषणाराज्यात सर्वप्रथम वस्त्रोद्योगाने या उपक्रमाला तत्काळ प्रतिसाद देत कायदेविषयक मार्गदर्शनासह तृतीयपंथींना काम मिळवून देण्यासाठी अनेक संस्था, संघटना पुढे आल्या. त्यांनी आपापल्यापरीने कितीजणांना काम देणार, याबाबत घोषणा केली. त्यामुळे नक्कीच सामाजिक बदल घडेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.

मला व्यक्त व्हायचंयदररोज तीच दुकाने, तोच बाजार, तीच टाळी आणि तीच दहाची नोट याचा कंटाळा आला आहे. आम्हालाही सन्मानाने जगायचे आहे. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा समाजात मिसळून राहायचे आहे, असे भावनिक मनोगत प्रिया ऊर्फ प्रशांत सवाईराम यांनी व्यक्त केले, तर नगरपालिकेने तृतीयपंथीयांचा२५ लाख रुपयांचा निधी तांत्रिक बाबी पुढे करत देण्यास टाळाटाळ करण्याऐवजी त्यातून तृतीयपंथीयांना उद्योग, व्यवसाय व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सकीना यांनी केले. ‘मला व्यक्त व्हायचंय’ या टॅगलाईनखाली तृतीयपंथी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय