शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कोल्हापूर-मिरज मार्गावर डिसेंबरमध्ये धावणार विद्युत रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:04 IST

कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे सुरू करावी, असे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून (सीआरएस) पाहणी झाल्यानंतर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी विद्युत रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. येत्या २० दिवसांत संबंधित समिती ही पाहणी करणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा आयुक्त समिती करणार पाहणीमालवाहतूक स्वस्त होणार, प्रवासी वाहतुकीचा वेग वाढणार

संतोष मिठारीकोल्हापूर : कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे सुरू करावी, असे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून (सीआरएस) पाहणी झाल्यानंतर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी विद्युत रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. येत्या २० दिवसांत संबंधित समिती ही पाहणी करणार आहे.कोल्हापूर ते मिरज या ५० किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी लागला आहे. या मार्गावरून दि. २५ आॅक्टोबरला विद्युत रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ४० मिनिटांत रेल्वे इंजिन कोल्हापूरहून मिरजमध्ये पोहोचले. त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आढळून आली नाही. या मार्गाची रेल्वेची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून पाहणी होणार आहे.

या समितीने हा मार्ग सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर या मार्गावरून प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे धावणार आहेत. येत्या २० दिवसांत या समितीकडून पाहणी झाल्यानंतर साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर ते मिरजदरम्यान विद्युत रेल्वे धावतील.

त्यात तिरूपती, कोयना, अहमदाबाद, धनबाद, दिल्ली, गोंदिया, बंगलोर, बिदर, नागपूर, सोलापूर या लांब पल्ल्याच्या आणि कोल्हापूर-मिरज या मार्गावरील रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. विद्युत रेल्वे सुरू झाल्याने मालवाहतूक स्वस्त होईल. प्रवासी वाहतुकीचा वेग वाढणार असून प्रदूषणही कमी होणार आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर आणि कोल्हापूर, सांगली, मिरज मार्गांवर लोकल सुरू होणार आहेत.निमशिरगावमध्ये होणार प्लॅटफॉर्मनिमशिरगाव येथील स्थानकातून सध्या रेल्वेत चढ-उतार करणे प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. विद्युत रेल्वे सुरू झाल्यास हा त्रास अधिक वाढणार आहे. ते लक्षात घेऊन रेल्वे विभागाने निमशिरगाव स्थानकात प्लॅटफॉर्म करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

विद्युत रेल्वे इंजिनची चाचणी यशस्वी झाली. एसएनटी गिअर हे अद्ययावत केले जातील. ‘सीआरएस’ समितीने पाहणी करून प्रमाणपत्र दिल्यानंतर साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केल्या जाणार आहेत. कोल्हापूर ते पुणे मार्गाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे ध्येय आहे.-जे. पी. मिश्रा, विद्युतीकरण वरिष्ठ प्रबंधक, पुणे विभाग-----------------------------विद्युत रेल्वेची कोल्हापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. विद्युतीकरणामुळे नव्या रेल्वे सुरू होणार आहेत. आता कोल्हापूर-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती

 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूर