शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: घराच्या डागडुजीसाठी साहित्य आणून ठेवले, नवऱ्यासाठी चहा बनवतानाच अंगावर भिंत कोसळून वृद्धेला मृत्यूने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:25 IST

गडहिंग्लज : पावसात बकरी चारून गारठलेल्या नवऱ्याला चहा बनवताना अंगावर दगड-मातीची भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू ...

गडहिंग्लज : पावसात बकरी चारून गारठलेल्या नवऱ्याला चहा बनवताना अंगावर दगड-मातीची भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जनाबाई संतू पाटील (वय ६५, रा. कडाल) असे तिचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे गडहिंग्लज तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून घराचेही साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे.अधिक माहिती अशी, कडाल येथे संतू बापू पाटील हे वीटा-मातीच्या दोन खोल्यांच्या जुन्या घरात पत्नी जनाबाईसह राहतात. परंतु, महिनाभरातील पावसामुळे घराची पूर्वेकडील भिंत कमकुवत झाली होती. त्यामुळे शेजारील यशवंत पाटील यांच्या घरात तात्पुरते रहायला जाणार होते.आपल्या घराच्या डागडुजीसाठी पत्रे व लोखंडी अँगल इत्यादी साहित्य आणून दारात ठेवले होते. पाऊस वाढल्यामुळे घरातील प्रापंचिक साहित्य पाण्याच्या ढकलगाड्यातून हलवायला सुरुवात केली होती. भांडी-कुंडीसह काही साहित्य अद्याप जुन्या घरातच होते.दरम्यान, सोमवारी बकरी चारायला गेलेले संतू हे सायंकाळी घरी परतले. त्यांच्यासाठी चहा बनविताना पाठीमागची भिंत अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. मातीच्या कच्या विटांच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्यामुळे त्यांच्या दोन्ही पायाला, हातांना, छातींना व डोक्याला गंभीर दुखापत झाली.आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रात्री पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई असा परिवार आहे.

वृद्धापकाळातील आधार हरपलाजनाबाईचे पती संतू हे गिरणी कामगार आहेत. संपामुळे मिल बंद पडल्यामुळे ते मुंबईहून गावी आले. शेतीबरोबरच चार बकरीही त्यांनी पाळल्या होत्या. एकमेकांच्या आधाराने वृद्धापकाळ व्यथित करताना काळाने त्यांचा आधार हिरावून घेतला.

पाय तुटल्याने अत्यवस्थ३ फूट रुंदीची भिंत छतापासून कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे धावून गेलेले पोलिस पाटील, तानाजी पाटील, सयाजी पाटील, शिवाजी पाटील यांनी पत्र्याचा ट्रंक व मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जनाबाईंना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी पाठवले. परंतु, गुडघ्याखालील पाय तुटल्यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन त्या अत्यवस्थ बनल्या होत्या.