शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

वांगी १२०, टोमॅटो १००, भेंडी ८०, बटाटा ५० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:40 IST

लॉकडाऊन सोमवारपासून कडक होणार असल्याने लोकांची सलग दुसऱ्या दिवशी रविवारी भाजीपाला, धान्य खरेदीसाठी मंडईमध्ये गर्दी उसळली. आवक तेवढीच व प्रत्येकाने जास्त भाजीपाला खरेदी केल्याने त्याचे दरही गगनाला भिडले. वांगी व श्रावण घेवडा १२० रुपये, टोमॅटो १००, भेंडी ८० रुपये तर बटाटा ५० रुपये किलोने विक्री झाली. लोकांनीही कोणतेही कुरकुर न करता मिळेल ती भाजी खरेदी केली. सोशल डिस्टन्सिंग, कोरोनापासून संरक्षण या गोष्टी गर्दीत वाहून गेल्या.

ठळक मुद्देवांगी १२०, टोमॅटो १००, भेंडी ८०, बटाटा ५० रुपये किलोलॉकडाऊन होणार असल्याने भाजीपाला कडाडला : दुपारीच झाली सगळी विक्री

कोल्हापूर : लॉकडाऊन सोमवारपासून कडक होणार असल्याने लोकांची सलग दुसऱ्या दिवशी रविवारी भाजीपाला, धान्य खरेदीसाठी मंडईमध्ये गर्दी उसळली. आवक तेवढीच व प्रत्येकाने जास्त भाजीपाला खरेदी केल्याने त्याचे दरही गगनाला भिडले. वांगी व श्रावण घेवडा १२० रुपये, टोमॅटो १००, भेंडी ८० रुपये तर बटाटा ५० रुपये किलोने विक्री झाली. लोकांनीही कोणतेही कुरकुर न करता मिळेल ती भाजी खरेदी केली. सोशल डिस्टन्सिंग, कोरोनापासून संरक्षण या गोष्टी गर्दीत वाहून गेल्या.प्रत्येक रविवारी आठवड्याची भाजी खरेदी करणारा मोठा वर्ग आहे. रविवारी सकाळी लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, ऋणमुक्तेश्वर परिसर, शिंगोशी मार्केट, पाडळकर मार्केट येथे लोक भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या संख्येने जातात. लॉकडाऊन एक आठवड्याचाच आहे परंतु केवळ भीतीपोटी लोक खरेदीसाठी जास्त संख्येने बाहेर पडले. शनिवारी बहुतांशी लोकांनी कडधान्ये व इतर आवश्यक धान्याची खरेदी केली व रविवारी भाजीपाला खरेदी केला.

सकाळी कपिलतीर्थ मंडईत तर उभा राहायला जागा नाही असे चित्र दिसत होते. शिल्लक राहिली तर त्या भाजीपाल्याचे उद्या काय करायचे म्हणून व्यापाऱ्यांनी नेहमी लागते तेवढीच भाजी खरेदी केली होती. आणि लोकांनी मात्र नेहमी लागते त्याहून जास्त भाजी खरेदी केली. त्यामुळेच दर गगनाला भिडले. टोमॅटो यंदा वर्षभर फारसा कधी २५ रुपये किलोच्या पुढे गेला नव्हता. लालभडक टोमॅटो अनेक दिवस १० रुपये किलोनेच मिळत होते.

या रविवारी मात्र त्यांने शंभरी ओलांडली. तेवढे पैसे देऊनही बाजारात टोमॅटो मिळत नव्हता. श्रावण घेवड्याची आवक कमी होती त्यामुळे तो घेण्यासाठी तर लोकांच्या उड्या पडल्या. इतर भाजीपाल्याचीही स्थिती अशीच होती. मेथीची पेंडी ३० रुपयांवर गेली होती. हिरव्या मिरच्याही ८० रुपयांनी किलो अशा होत्या. ढबू मिरचीचा दरही १२० रुपयांवर गेला होता. पावसाळा सुरु झाल्यापासून दहा रुपयांना दहा लिंबू मिळत होते परंतू त्याचाही दर दहा रुपयांना ५ असा झाला होता.

एका कुटुंबासाठी आठवड्याचा भाजीपाला व अन्नधान्य, फळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला हजार रुपये पुरले नाहीत. मागणी जास्त असल्याने चार पैसे कमी करतोस असेही कुणी विचारत नव्हते. उलट व्यापारी जो दर सांगेल त्या दरांने लोकांनी भाजीपाला खरेदी केली. दुपारनंतर बहुतांशी व्यापाऱ्यांकडील माल संपला होता.उपवासाच्या वस्तूंना मागणीश्रावणही  सोमवारपासूनच सुरु होत आहे. त्यामुळे उपवासाला लागणारी वरी तांदूळ, शाबू ,राजिगरा लाडू, शाबूच्या पापड्या असल्या पदार्थांचीही लोकांनी खरेदी केली.लॉकडाऊनच्या काळात घरी बसून खायला काहीतरी हवे म्हणून लोकांनी चिरमुरे, फुटाणे, खारी शेंगदाणे, लाह्या, विविध प्रकारचे पोहे खरेदीचा सपाटाच लावला. त्यामुळे अशा दुकानांसमोरही लोकांनी गर्दी केल्याचे दिसत होते.पावसाने उसंतशनिवारी व रविवारी दिवसभर पावसाने चांगलीच उसंत दिली. त्यामुळे लोकांना हवी तशी खरेदी करता आली. दिवसभर पाच-सहा पिशव्यांचे ओझे घेवून घरी परतणारे लोक शहरांत दिसत होते.फळांना मागणीश्रावणात विविध उपवास असल्याने केळी,पपई, पेरू, तोतापुरी आंबे यांचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर