शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वांगी १२०, टोमॅटो १००, भेंडी ८०, बटाटा ५० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:40 IST

लॉकडाऊन सोमवारपासून कडक होणार असल्याने लोकांची सलग दुसऱ्या दिवशी रविवारी भाजीपाला, धान्य खरेदीसाठी मंडईमध्ये गर्दी उसळली. आवक तेवढीच व प्रत्येकाने जास्त भाजीपाला खरेदी केल्याने त्याचे दरही गगनाला भिडले. वांगी व श्रावण घेवडा १२० रुपये, टोमॅटो १००, भेंडी ८० रुपये तर बटाटा ५० रुपये किलोने विक्री झाली. लोकांनीही कोणतेही कुरकुर न करता मिळेल ती भाजी खरेदी केली. सोशल डिस्टन्सिंग, कोरोनापासून संरक्षण या गोष्टी गर्दीत वाहून गेल्या.

ठळक मुद्देवांगी १२०, टोमॅटो १००, भेंडी ८०, बटाटा ५० रुपये किलोलॉकडाऊन होणार असल्याने भाजीपाला कडाडला : दुपारीच झाली सगळी विक्री

कोल्हापूर : लॉकडाऊन सोमवारपासून कडक होणार असल्याने लोकांची सलग दुसऱ्या दिवशी रविवारी भाजीपाला, धान्य खरेदीसाठी मंडईमध्ये गर्दी उसळली. आवक तेवढीच व प्रत्येकाने जास्त भाजीपाला खरेदी केल्याने त्याचे दरही गगनाला भिडले. वांगी व श्रावण घेवडा १२० रुपये, टोमॅटो १००, भेंडी ८० रुपये तर बटाटा ५० रुपये किलोने विक्री झाली. लोकांनीही कोणतेही कुरकुर न करता मिळेल ती भाजी खरेदी केली. सोशल डिस्टन्सिंग, कोरोनापासून संरक्षण या गोष्टी गर्दीत वाहून गेल्या.प्रत्येक रविवारी आठवड्याची भाजी खरेदी करणारा मोठा वर्ग आहे. रविवारी सकाळी लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, ऋणमुक्तेश्वर परिसर, शिंगोशी मार्केट, पाडळकर मार्केट येथे लोक भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या संख्येने जातात. लॉकडाऊन एक आठवड्याचाच आहे परंतु केवळ भीतीपोटी लोक खरेदीसाठी जास्त संख्येने बाहेर पडले. शनिवारी बहुतांशी लोकांनी कडधान्ये व इतर आवश्यक धान्याची खरेदी केली व रविवारी भाजीपाला खरेदी केला.

सकाळी कपिलतीर्थ मंडईत तर उभा राहायला जागा नाही असे चित्र दिसत होते. शिल्लक राहिली तर त्या भाजीपाल्याचे उद्या काय करायचे म्हणून व्यापाऱ्यांनी नेहमी लागते तेवढीच भाजी खरेदी केली होती. आणि लोकांनी मात्र नेहमी लागते त्याहून जास्त भाजी खरेदी केली. त्यामुळेच दर गगनाला भिडले. टोमॅटो यंदा वर्षभर फारसा कधी २५ रुपये किलोच्या पुढे गेला नव्हता. लालभडक टोमॅटो अनेक दिवस १० रुपये किलोनेच मिळत होते.

या रविवारी मात्र त्यांने शंभरी ओलांडली. तेवढे पैसे देऊनही बाजारात टोमॅटो मिळत नव्हता. श्रावण घेवड्याची आवक कमी होती त्यामुळे तो घेण्यासाठी तर लोकांच्या उड्या पडल्या. इतर भाजीपाल्याचीही स्थिती अशीच होती. मेथीची पेंडी ३० रुपयांवर गेली होती. हिरव्या मिरच्याही ८० रुपयांनी किलो अशा होत्या. ढबू मिरचीचा दरही १२० रुपयांवर गेला होता. पावसाळा सुरु झाल्यापासून दहा रुपयांना दहा लिंबू मिळत होते परंतू त्याचाही दर दहा रुपयांना ५ असा झाला होता.

एका कुटुंबासाठी आठवड्याचा भाजीपाला व अन्नधान्य, फळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला हजार रुपये पुरले नाहीत. मागणी जास्त असल्याने चार पैसे कमी करतोस असेही कुणी विचारत नव्हते. उलट व्यापारी जो दर सांगेल त्या दरांने लोकांनी भाजीपाला खरेदी केली. दुपारनंतर बहुतांशी व्यापाऱ्यांकडील माल संपला होता.उपवासाच्या वस्तूंना मागणीश्रावणही  सोमवारपासूनच सुरु होत आहे. त्यामुळे उपवासाला लागणारी वरी तांदूळ, शाबू ,राजिगरा लाडू, शाबूच्या पापड्या असल्या पदार्थांचीही लोकांनी खरेदी केली.लॉकडाऊनच्या काळात घरी बसून खायला काहीतरी हवे म्हणून लोकांनी चिरमुरे, फुटाणे, खारी शेंगदाणे, लाह्या, विविध प्रकारचे पोहे खरेदीचा सपाटाच लावला. त्यामुळे अशा दुकानांसमोरही लोकांनी गर्दी केल्याचे दिसत होते.पावसाने उसंतशनिवारी व रविवारी दिवसभर पावसाने चांगलीच उसंत दिली. त्यामुळे लोकांना हवी तशी खरेदी करता आली. दिवसभर पाच-सहा पिशव्यांचे ओझे घेवून घरी परतणारे लोक शहरांत दिसत होते.फळांना मागणीश्रावणात विविध उपवास असल्याने केळी,पपई, पेरू, तोतापुरी आंबे यांचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर