शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

कोल्हापूरात अकरावीची प्रवेशप्रक्रिया बंद पाडण्याचा प्रयत्न, वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 2:02 PM

अकरावी प्रवेशासाठी प्रवेशपत्राचे शुल्क पूर्वीपेक्षा या वर्षी अनावश्यकपणे दहा रुपयांनी वाढविण्यात आल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व आॅल इंडिया यूथ फेडरेशनने (एआययूएफ) येथील कॉमर्स कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया सोमवारी अर्धा तास बंद पाडली.

ठळक मुद्देकोल्हापूरात अकरावीची प्रवेशप्रक्रिया बंद पाडण्याचा प्रयत्नप्रवेशपत्र मोफत द्या, शुल्क वाढ रद्द करण्याची मागणीआॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचा टाळे ठोकण्याचा इशारा

कोल्हापूर : अकरावी प्रवेशासाठी प्रवेशपत्राचे शुल्क पूर्वीपेक्षा या वर्षी अनावश्यकपणे दहा रुपयांनी वाढविण्यात आल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व आॅल इंडिया यूथ फेडरेशनने (एआययूएफ) येथील कॉमर्स कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया सोमवारी अर्धा तास बंद पाडली.अकरावी प्रवेश प्रक्रियेतील प्रवेशपत्रे मोफत द्यावीत, अशी मागणी फेडरेशनने केली आहे. अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक शासन आणि प्रशासनाने करावी; अन्यथा प्रवेश प्रक्रिया थांबवून उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा या संघटनांनी दिला आहे.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी कॉमर्स कॉलेज येथील प्रवेश प्रक्रिया सुरु होताच समिती सदस्यांसमोर संघटनेच्या मागण्या सादर केल्या. यावेळी ‘एआयवायएफ’चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे आणि जिल्हा सचिव प्रशांत आंंबी यांच्याशी समिती सदस्यांशी वादावादी झाली. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ या वादामुळे प्रवेशप्रक्रिया ठप्प झाली होती.अकरावी प्रवेशासाठी प्रवेशपत्राचे शुल्क पूर्वीपेक्षा या वर्षी अनावश्यकपणे दहा रुपयांनी वाढविण्यात येत आहे. या प्रवेशपत्रातून पूर्वी जमा झालेले सात लाख रुपये प्रशासनाकडे पडून आहेत. या पैशातून एक तर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मोफत द्यावीत; अन्यथा माफक शुल्कात जास्तीत जास्त २० रुपयांमध्ये द्यावीत. प्रवेश प्रक्रिया पारदर्शी व्हावी. त्यातील पैशांचा खेळ थांबवा. दहावीचा निकाल गेल्या काही वर्षांत वाढला आहे. त्या प्रमाणात अनुदानित तुकड्या व जागा तसेच अकरावी आणि बारावीच्या तुकड्या वाढविणे गरजेचे होते; पण शासनाने विनाअनुदानित तुकड्या महाविद्यालयांना देऊन आपली जबाबदारी झटकली आहे.समान गुण असणाऱ्यांना किंवा थोड्या गुणांचे अंतर असणाºयांपैकी काहीजणांना अनुदानित तुकडी, तर काहींना विनाअनुदानित तुकडी मिळते. विनाअनुदानित तुकडीत हजारो रुपये शुल्क आकारून गरिबांना लुटले जात आहे. मागील वर्षापासून जवळपास दीडपट शुल्क वाढविण्याचा घाट घातला जात आहे. ही शुल्कवाढ त्वरित मागे घेऊन विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाने भरावे, अशी मागणी या संघटनांनी केली.अकरावी प्रवेशासाठी प्रवेशपत्राचे शुल्क पूर्वीपेक्षा या वर्षी अनावश्यकपणे दहा रुपयांनी वाढविण्यात आल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व आॅल इंडिया यूथ फेडरेशनने (एआययूएफ) येथील कॉमर्स कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया सोमवारी अर्धा तास बंद पाडली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर