शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

शिक्षणमंत्र्यांनी चर्चेसाठी कोल्हापूरात यावे : शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे स्मरणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 14:29 IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चर्चेसाठी दिलेले आव्हान शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने स्विकारले आहे. समितीने बुधवारी (दि.३०) सायंकाळी साडे पाच वाजता बिंदू चौकात चर्चेसाठी यावे असे आवाहन केले आहे. याबाबतचे स्मरणपत्र मेलद्वारे मंत्री तावडे यांना पाठविण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक अशोक पोवार व रमेश मोरे यांनी शनिवारी दिली आहे.

ठळक मुद्देशिक्षणमंत्र्यांनी बुधवारी चर्चेसाठी कोल्हापूरात यावे शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे स्मरणपत्राद्वारे आवाहन

कोल्हापूर : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चर्चेसाठी दिलेले आव्हान शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने स्विकारले आहे. समितीने बुधवारी (दि.३०) सायंकाळी साडे पाच वाजता बिंदू चौकात चर्चेसाठी यावे असे आवाहन केले आहे. याबाबतचे स्मरणपत्र मेलद्वारे मंत्री तावडे यांना पाठविण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक अशोक पोवार व रमेश मोरे यांनी शनिवारी दिली आहे.पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री तावडे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यभर शिक्षणाच्या कंपनीकरणाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत कोल्हापूरातील लोक चुकीची माहिती देत आहेत. हे लोक डाव्या विचाराचे असून त्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचीही दिशाभूल केली आहे.

शिक्षण वाचवा नागरी कृती समिती व त्यांच्या नेत्यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी बिंदू चौकात यावे असे जाहीर आव्हान मंत्री तावडे यांनी यावेळी दिले होते. यावर समिती व प्रा. एन. डी. पाटील यांनी आव्हान स्विकारत चर्चेसाठी केव्हाही व कोठेही येण्यास तयार असल्याचे सांगून शिक्षण मंत्र्यांनी वेळ व तारीख सांगावी असे मेलद्वारे कळविले होते.

परंतु दहा दिवस झाले तरी मंत्र्यांनी काहीच उत्तर दिलेले नाही. त्यामुळे समितीने पुन्हा मेलद्वारे चर्चेला येण्यासाठी स्मरणपत्र पाठविले आहे. यामध्ये बुधवारी (दि.३०) सायंकाळी ५.३० वाजता चर्चेसाठी बिंदू चौकात येण्याचे आवाहन केले आहे. आम्ही स्वागतास व पाहुणचारास सज्ज असल्याचेही या स्मरणपत्रात म्हंटले आहे. 

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेkolhapurकोल्हापूरEducationशिक्षण