शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खात आहे : प्रमोद जठार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 12:33 IST

Pramod Jathar Sindhudurgnews- राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आले आणि जनतेला वाटले की, बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षीत असलेले हिंदुत्ववादी , महिलांचा सन्मान करणारे , रयतेचे सरकार आले . परंतु आता विपरीत घडत असून ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खाऊ लागले आहे. अशी टीका भाजप प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.

ठळक मुद्देठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खात आहे प्रमोद जठार यांची टीका

कणकवली : राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आले आणि जनतेला वाटले की, बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षीत असलेले हिंदुत्ववादी , महिलांचा सन्मान करणारे , रयतेचे सरकार आले . परंतु आता विपरीत घडत असून ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खाऊ लागले आहे. अशी टीका भाजप प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील लोकांना काही तरी चांगले घडेल असे वाटत होते. लोकांना वाटले रांज्याच्या पाटलाचे हात कलम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव लावणारी ही शिवसेना आहे. मात्र, ही तर मुघलांपेक्षा वाईट औरंगीसेना झाली आहे .रयतेच्या काडीलाही हात लावू नका असे सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिवसेनेच्या बाबतीत हवेत विरुन गेली आहे.ठाकरे सरकारातील मंत्र्यांचे कारनामे पाहिले तर मान शरमेने खाली जाते. मुख्यमंत्र्यांनी जनतेला न्याय देण्याच्या वचनानाम्यातील शिवशाहीतील वाघोबाचा पेशवाईतील राघोबा झाला आहे . असे म्हणावेसे वाटते. रामशास्त्री बाणा दाखवून इतिहास घडविण्याची संधी या गब्रु सरकारने गमावली आहे, असेही प्रमोद जठार यांनी या म्हटले आहे. 

 

 

 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्गPramod Jatharप्रमोद जठार