शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

‘मविआ’च्या काळात एकही मोर्चा नाही, भाजप आल्यानंतरच कसे घडते; धनंजय महाडिक यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 12:45 IST

महापालिकेची ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार

इचलकरंजी : राज्यातील आघाडी सरकार हे स्थगिती देणारे सरकार होते, तर आता गतिमान सरकार आहे. महाविकास आघाडीच्या काळात एकही मोर्चा निघाला नाही. तसेच कोणी आत्महत्या करण्याचा इशारा दिला नाही. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतरच ते कसे घडते? असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. शहरातील भारतीय जनता पक्ष कार्यालयाने सेवा केंद्र म्हणून नावलौकिक मिळवावा तसेच केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.येथील भाजप कार्यालय नूतनीकरण उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर होते. यावेळी खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार महाडिक म्हणाले, केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र, त्याची माहिती जनतेला नाही. ही माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. कोरोनामुळे अनेक देश डबघाईला आले असताना भारत देशाने अकराव्या स्थानावरून पाचवे स्थान प्राप्त केले. खासदार माने म्हणाले, भाजप हे शिस्तीचे विद्यापीठ आहे, तर शिवसेना मुक्त विद्यापीठ आहे. शिस्तीला महत्त्वाचे स्थान आहे. पडत्या काळात पक्षासोबत जे राहिले, ते सच्चे कार्यकर्ते आहेत. सध्या राज्यात त्रिशंकू सरकार आहे. ते तिप्पट वेगाने आणि गतीने पुढे जात आहे.हाळवणकर म्हणाले, शहरात चांगली बूथरचना भाजपने उभी केली आहे. हे कार्यालय सेवेचे मंदिर बनणार आहे. सुरुवातीला शाहू पुतळा ते भाजप कार्यालय अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महाडिक यांनी कार्यालयाचे उद्घाटन आणि भारत मातेच्या प्रतिमेचे अनावरण केले. शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी स्वागत केले. कार्यक्रमास राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहाजी भोसले, अशोक स्वामी, अलका स्वामी, मिश्रीलाल जाजू, भाऊसाहेब आवळे, रिषभ जैन, ॲड. भरत जोशी, दीपक पाटील, अमृत भोसले यांच्यासह माजी नगरसेवक, बूथप्रमुख, शक्तीप्रमुख उपस्थित होते.

भाजप-शिवसेनेचा महापौरमहापालिकेची ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पहिले नगरसेवक होण्याची संधी अनेकांना मिळणार आहे. तसेच भाजप-शिवसेना युतीचा पहिला महापौर इचलकरंजी महापालिकेत होईल, असा विश्वास हाळवणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक