शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

उत्पादन वाढीने साखर कारखानदारीवर भीतीचे सावट : उपाययोजना आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:54 IST

विश्वास पाटील ।कोल्हापूर : चालू हंगामातील वाढलेले साखर उत्पादन व पुढील हंगामातील बंपर पीक यांचा अंदाज घेता, वाढलेल्या साखर उत्पादनामुळे कारखानदारीसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांतून व्यक्त होऊ लागली आहे. यंदाचा मान्सून चांगला गेला तर उत्पादन चांगले होऊ शकते. पावसाने ओढ दिली तरच उत्पादनात घट होईल.उत्पादन वाढले ...

ठळक मुद्देएफआरपी देणार कशातून ही चिंता

विश्वास पाटील ।कोल्हापूर : चालू हंगामातील वाढलेले साखर उत्पादन व पुढील हंगामातील बंपर पीक यांचा अंदाज घेता, वाढलेल्या साखर उत्पादनामुळे कारखानदारीसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांतून व्यक्त होऊ लागली आहे. यंदाचा मान्सून चांगला गेला तर उत्पादन चांगले होऊ शकते. पावसाने ओढ दिली तरच उत्पादनात घट होईल.

उत्पादन वाढले की बाजारपेठेच्या नियमानुसार साखरेचे दर कोसळतात व त्यामुळे एफआरपी देण्यास अडचणी येतात हे दुष्टचक्र आहे. केंद्र शासनाने उसाला किती पैसे द्यायचे हे कायद्याने ठरवून दिले आहे; परंतु तशी हमी साखरेच्या बाजारातील किमतीची घेतलेली नाही.पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या ‘एफआरपी’मध्ये २०० रुपये वाढ करण्याची शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्याने ‘एफआरपी’ची रक्कम तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.

साखरेला २७०० ते ३००० रुपयांपर्यंतच दर मिळाला तर एफआरपी कशी देणार, अशी भीती आतापासूनच व्यक्त केली जातआहे. एका बाजूला हा रेटावाढत असताना दराची अशाश्वतीमात्र वाढत आहे. वाढलेले साखर उत्पादन त्यास पूरकच ठरणार आहे. म्हणून उपाययोजनांबाबत आतापासूनच केंद्र व राज्यसरकार आणि संबंधित घटकांच्या पातळीवर विचार होण्याची गरज आहे. (उत्तरार्ध)सहकारमंत्र्यांच्या प्रस्तावाचे काय झाले?यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन जास्त झाल्याने बाजारातील घसरणारे दर थांबावेत यासाठी गेल्या महिन्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी एकूण उत्पादनातील २५ टक्के साखर ३२०० रुपयांनी राज्य सरकारच खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होते. मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देऊन त्यानुसार लगेच साखर खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते; परंतु सरकारने २५ टक्के सोडाच, २५०० पोतीही अजून खरेदी केलेली नाहीत अथवा त्याची प्रक्रिया पुढे सरकलेली नाही.राष्ट्रीय सहकारी संघ व ‘इस्मा’ने सुचविलेल्या उपाययोजना१) एफआरपी देण्यासाठी सरकारने २०१४-१५ व १५-१६ च्या हंगामात दिलेल्या कर्जाची आता परतफेड सुरू झाली आहे. त्याची पुनर्रचना करून मुदतवाढ द्यावी.२) निर्यातीला भरीव अनुदान द्यावे.३) सर्व कारखान्यांना निर्यातीचा कोटा द्या व निर्धारित तारीखही.४) हंगामाच्या सुरुवातीलाच कच्ची साखर निर्यात करण्यास प्रोत्साहन आवश्यक.५) सगळ्याच उसाची साखर करण्याऐवजी इथेनॉलसाठी त्याचा वापर झाल्यास उत्पादनावर नियंत्रण शक्यदुहेरी दर आकारणीसाखरेचा घरगुती व औद्योगिक वापरासाठी वेगळा दर निश्चित करण्याची मागणी साखर उद्योग अनेक वर्षांपासून करीत आहे. त्याचा अभ्यास केंद्र शासनाने सुरू केला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या हंगामापासून सुरू झाल्यास कारखानदारीस त्याची नक्कीच मदत होईल.एक आॅक्टोबर २०१८चे संभाव्य चित्रचालू हंगामातील शिल्लक साखर - ७५ लाख टनपुढील हंगामातील उत्पादन - ३१० लाख टनदेशाचा वार्षिक वापर - २५० लाख टनशिल्लक साखर - १३५ लाख टन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने