शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:21 IST

चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देअनेक मार्गांवरील वाहतूक बंद : पडझडीने लाखो रुपयांचे नुकसान; सतर्कतेचे प्रशासनाचे आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पंचगंगेचे पाणी राजाराम बंधाऱ्याजवळील इशारा पातळीकडे वेगाने वाढत असून, रात्री उशिरापर्यंत ७५ हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.शाहूवाडीत १४ घरांच्या भिंती कोसळल्यामलकापूर : परिसरातील कडवी नदीला आलेल्या पुरामुळे पेरीड, खोतवाडी बंधारा पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील १४ गावांतील घरांच्या भिंती पडल्या आहेत. ५४ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

कडवी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठची भात, ऊसशेती पाण्याखाली गेली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील गोगवे, करंजोशी येथे वडाची झाडे पडली आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पावसामुळे बांबवडे आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत पडली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर गोगवे, करंजोशी येथे वडाची झाडे पडली आहेत. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. कडवी, शाळी, कासारी, वारणा नद्यांच्या पाण्याची पातळी वाढून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पेरिड, खोतवाडी बंधारे पाण्याखाली गेले आहेत.कृष्णा नदीत मृत माशांचा खचनृसिंहवाडी : पावसाने जोर धरल्याने कृष्णा नदीला पूर येऊन पाणी पात्राबाहेर पडली आहे. गुरुवारी पहाटेपासून नृसिंहवाडी-औरवाड पुलाच्या दोन्ही बाजूस मृत माशांचा खच पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याच पुलावर नेहमी मासे पकडण्यासाठी येणारे मच्छिमार या मृत माशांच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत. मासे कुजलेले असल्याने ते पकडण्याचा प्रयत्न कोणी केला नाही.

मृत माशांत कटार्ना, खिलाफ, वाम, मरळ आदी जातीचे दहा किलो वजनापर्यंतचे मासे तरंगताना दिसत आहेत. हे मासे कशाने मृत झाले हा संशोधनाचा विषय आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणावर नियंत्रण ठेवून असते, हेच या नदीकाठच्या जनतेला समजेनासे झाले आहे.पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीपात्रात पावसाच्या पाण्यासोबत कारखान्याचे दूषित पाणी, औद्योगिक वसाहतीमधून येणारे केमिकलयुक्त पाणी या सर्व घटकाने नदीतील मासे मृत होण्याच्या घटना घडत असतात. मात्र, साध्या कारवाईचे फार्ससुद्धा आजपर्यंत कुठल्या कारखान्यावर झाल्याचे दिसून येत नाही. मोठ्या प्रमाणात मासे कोणत्या कारणाने मेले याचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.पश्चिम पन्हाळ्यात जोर कायम; नद्यांना पूरकळे : संततधार पावसामुळे पश्चिम पन्हाळ्यासह धामणी खोºयातील नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले असून, विभागातील नद्यांवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परखंंदळे-गोठे पुलावर पुराचे पाणी वाढत असल्याने रस्ता बंद केला आहे. त्यामुळे धामणी खोºयातील गोठे, तांदूळवाडी, आकुर्डे, आंबर्डे, आदी गावांचा दळणवळणाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.मुसळधार पावसामुळे कळे-सावर्डे, गोठे-परखंदळे, सुळे-आकुर्डे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. तीन दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. मात्र, भात रोप लावणी, भुईमूग, नाचणी या पिकांना पोषक असाच पाऊस सुरू आहे.संततधार पावसामुळे नद्यांना पूर; घरांची पडझडपन्हाळा : संततधार पावसामुळे कुंभी, धामणी, कासारी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बहुतेक बंधारे पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. नद्यांना पूर आला असून, कासारी नदीवरील करंजफेण, कांटे, पेंडाखळे, बाजारभोगांव, वाळोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण व यवलूज हे आठ, धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे बंधारे पाण्याखाली गेले. माजगाव पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक कसबा ठाणेमार्गे सुरू आहे. कासारी धरणात १.७५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.तुळशीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूरriverनदी