शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

कोल्हापूर जिल्ह्यात दाट धुक्यासह दवाचा वर्षाव, आंबा मोहरासह वेलवर्गीय पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 18:21 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुक्याच्या झालरीसह दव मोठ्या प्रमाणात पडत आहे. पहाटेपासून पसरलेले धुके सकाळी साडेनऊपर्यंत राहत आहे. अशा वातावरणाने आंबा मोहरासह वेलवर्गीय पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात दाट धुक्यासह दवाचा वर्षावआंबा मोहरासह वेलवर्गीय पिकांना फटका आणखी दोन दिवस धुके राहणार

कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुक्याच्या झालरीसह दव मोठ्या प्रमाणात पडत आहे. पहाटेपासून पसरलेले धुके सकाळी साडेनऊपर्यंत राहत आहे. अशा वातावरणाने आंबा मोहरासह वेलवर्गीय पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. यंदा फेबु्रवारीपासूनच तापमान वाढत गेले आणि शेवटच्या आठवड्यात तर पारा चांगलाच वाढला; पण गेले दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून, पहाटेपासून दाट धुक्याची झालर पाहावयास मिळत आहे.दाट धुक्याबरोबर बारीक-बारीक दवाचा वर्षावही झाला. ऐन कडाक्याच्या थंडीत जसे दाट धुके पसरते त्यापेक्षाही अधिक धुके पडत आहे. सोमवारी सकाळी तर अगदी फुटावरील दिसणे अवघड झाले होते. त्यामुळे वाहनांना रस्त्यावरून जाताना कसरत करीतच पुढे जावे लागत होते.

सकाळी साडेनऊपर्यंत धुक्याची झालर बाजूला होत नाही. धुके आणि अंगाला झोंबणारे वाऱ्याचा त्रास नागरिकांना होत असून वयोवृद्धांना तर घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. सोमवारी सकाळी साडेनऊनंतर सूर्यनारायणाने हळूहळू दर्शन दिले, दिवसभर ऊन राहिले; पण उन्हाचा चटका कमी झालेला दिसला.जिल्ह्याच्या तापमानात घसरण झाली असून, रविवारी कमाल तापमान ३२ तर सोमवारी ते ३५ डिग्रीपर्यंत राहिले. आगामी दोन दिवस धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून बुधवारनंतर तापमानात वाढ होत जाईल.

धुक्यासह पडलेल्या थंडीने आंब्यांचा मोहर गळण्याची भीती आहे. मोहर गळती होईल; पण जो मोहर राहील, त्याच्या फलधारणेवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर दोडका, काकडी, कलिंगडे या वेलवर्गीय पिकांसह भाजीपाल्यालाही या वातावरणाचा फटका बसणार आहे.

धुक्यामुळे अपघात वाढलेदाट धुके आणि त्यातील बारीक-बारीक दवामुळे निसरडा झालेला रस्ता म्हणजे अपघाताला निमंत्रणच असते. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले आहेत.

रुग्णसंख्येत वाढकडक उष्म्यानंतर एकदम थंडी पडल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्यावर झाला आहे. रुग्णालयांमध्ये सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ झालेली दिसते.

धुक्यामुळे विद्युत पुरवठा खंडितदाट धुके आणि दवामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. तीन-चार तासांनंतर पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत झाला.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमान