शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात दाट धुक्यासह दवाचा वर्षाव, आंबा मोहरासह वेलवर्गीय पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 18:21 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुक्याच्या झालरीसह दव मोठ्या प्रमाणात पडत आहे. पहाटेपासून पसरलेले धुके सकाळी साडेनऊपर्यंत राहत आहे. अशा वातावरणाने आंबा मोहरासह वेलवर्गीय पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात दाट धुक्यासह दवाचा वर्षावआंबा मोहरासह वेलवर्गीय पिकांना फटका आणखी दोन दिवस धुके राहणार

कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुक्याच्या झालरीसह दव मोठ्या प्रमाणात पडत आहे. पहाटेपासून पसरलेले धुके सकाळी साडेनऊपर्यंत राहत आहे. अशा वातावरणाने आंबा मोहरासह वेलवर्गीय पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. यंदा फेबु्रवारीपासूनच तापमान वाढत गेले आणि शेवटच्या आठवड्यात तर पारा चांगलाच वाढला; पण गेले दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून, पहाटेपासून दाट धुक्याची झालर पाहावयास मिळत आहे.दाट धुक्याबरोबर बारीक-बारीक दवाचा वर्षावही झाला. ऐन कडाक्याच्या थंडीत जसे दाट धुके पसरते त्यापेक्षाही अधिक धुके पडत आहे. सोमवारी सकाळी तर अगदी फुटावरील दिसणे अवघड झाले होते. त्यामुळे वाहनांना रस्त्यावरून जाताना कसरत करीतच पुढे जावे लागत होते.

सकाळी साडेनऊपर्यंत धुक्याची झालर बाजूला होत नाही. धुके आणि अंगाला झोंबणारे वाऱ्याचा त्रास नागरिकांना होत असून वयोवृद्धांना तर घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. सोमवारी सकाळी साडेनऊनंतर सूर्यनारायणाने हळूहळू दर्शन दिले, दिवसभर ऊन राहिले; पण उन्हाचा चटका कमी झालेला दिसला.जिल्ह्याच्या तापमानात घसरण झाली असून, रविवारी कमाल तापमान ३२ तर सोमवारी ते ३५ डिग्रीपर्यंत राहिले. आगामी दोन दिवस धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून बुधवारनंतर तापमानात वाढ होत जाईल.

धुक्यासह पडलेल्या थंडीने आंब्यांचा मोहर गळण्याची भीती आहे. मोहर गळती होईल; पण जो मोहर राहील, त्याच्या फलधारणेवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर दोडका, काकडी, कलिंगडे या वेलवर्गीय पिकांसह भाजीपाल्यालाही या वातावरणाचा फटका बसणार आहे.

धुक्यामुळे अपघात वाढलेदाट धुके आणि त्यातील बारीक-बारीक दवामुळे निसरडा झालेला रस्ता म्हणजे अपघाताला निमंत्रणच असते. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले आहेत.

रुग्णसंख्येत वाढकडक उष्म्यानंतर एकदम थंडी पडल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्यावर झाला आहे. रुग्णालयांमध्ये सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ झालेली दिसते.

धुक्यामुळे विद्युत पुरवठा खंडितदाट धुके आणि दवामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. तीन-चार तासांनंतर पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत झाला.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमान