शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जागरुक कोल्हापूरकरांमुळे ‘जनता कर्फ्यु’ला यश- सतेज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 15:20 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गासंदर्भातील उपाययोजना व जनता कर्फ्युचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

कोल्हापूर : कोरोना संसर्गाबाबत कोल्हापूरकर जागरुक आहेत. त्यामुळे रविवारच्या ‘जनता कर्फ्यु’ला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभर नागरिक घरात थांबल्याने ‘जनता कर्फ्यु’ यशस्वी झाला आहे. त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. हे यश टिकविण्यासाठी त्यांनी रात्री नऊनंतरही बाहेर पडून गर्दी करु नये, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना केले. ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक ठिकाणे व व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याला आज, सोमवारपासून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गासंदर्भातील उपाययोजना व जनता कर्फ्युचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारीस, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘जनता कर्फ्यु’ला  चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या निमित्ताने एक चांगला पायंडा पडला असून रात्री नऊनंतर बाहेर पडून नागरिकांनी त्यावर पाणी फिरवू नये. प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक ठिकाणे व व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आज,सोमवारपासून जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यावा.

‘लॉक डाऊन’ करण्याचा निर्णय हा एका जिल्ह्यापुरता घेणे शक्य नाही. त्यामुळे यासंदर्भात राज्य शासनाकडून जर काही निर्णय घेतला गेला तर त्याची अंमलबजावणी केली जाईल. बॅँकांमधील आरटीजीएस व्यवहार, आॅनलाईन पेमेंट अशी अत्यावश्यक कामे आय.टी. च्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे आयटीपार्क सुुरु ठेवण्याबाबत सरकारकडून सुट देण्यात आली आहे. तसेच त्यांनीही वर्कफ्रॉम ही संकल्पना राबविली आहे. 

५२३ जणांची वैद्यकिय तपासणी

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कोरोना’संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५२३ लोकांनी वैद्यकिय तपासणी केली. त्यातील ४९५ लोक परदेशातून आले असून त्यांना होम कोरोंटाईन होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शनिवारपासून संस्थात्मक कोरोंटाईन सुरु करण्यात आले आहे. यातील एका हॉटेलमध्ये दोघेजण व शासकिय वसतीगृहात सहा जण राहात आहेत.

कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आयोजित बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जनता कर्फ्यु व कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मल्लिनात कलशेट्टी, अमन मित्तल आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील