शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जागरुक कोल्हापूरकरांमुळे ‘जनता कर्फ्यु’ला यश- सतेज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 15:20 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गासंदर्भातील उपाययोजना व जनता कर्फ्युचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

कोल्हापूर : कोरोना संसर्गाबाबत कोल्हापूरकर जागरुक आहेत. त्यामुळे रविवारच्या ‘जनता कर्फ्यु’ला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभर नागरिक घरात थांबल्याने ‘जनता कर्फ्यु’ यशस्वी झाला आहे. त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. हे यश टिकविण्यासाठी त्यांनी रात्री नऊनंतरही बाहेर पडून गर्दी करु नये, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना केले. ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक ठिकाणे व व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याला आज, सोमवारपासून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गासंदर्भातील उपाययोजना व जनता कर्फ्युचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारीस, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘जनता कर्फ्यु’ला  चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या निमित्ताने एक चांगला पायंडा पडला असून रात्री नऊनंतर बाहेर पडून नागरिकांनी त्यावर पाणी फिरवू नये. प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक ठिकाणे व व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आज,सोमवारपासून जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यावा.

‘लॉक डाऊन’ करण्याचा निर्णय हा एका जिल्ह्यापुरता घेणे शक्य नाही. त्यामुळे यासंदर्भात राज्य शासनाकडून जर काही निर्णय घेतला गेला तर त्याची अंमलबजावणी केली जाईल. बॅँकांमधील आरटीजीएस व्यवहार, आॅनलाईन पेमेंट अशी अत्यावश्यक कामे आय.टी. च्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे आयटीपार्क सुुरु ठेवण्याबाबत सरकारकडून सुट देण्यात आली आहे. तसेच त्यांनीही वर्कफ्रॉम ही संकल्पना राबविली आहे. 

५२३ जणांची वैद्यकिय तपासणी

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कोरोना’संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५२३ लोकांनी वैद्यकिय तपासणी केली. त्यातील ४९५ लोक परदेशातून आले असून त्यांना होम कोरोंटाईन होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शनिवारपासून संस्थात्मक कोरोंटाईन सुरु करण्यात आले आहे. यातील एका हॉटेलमध्ये दोघेजण व शासकिय वसतीगृहात सहा जण राहात आहेत.

कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आयोजित बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जनता कर्फ्यु व कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मल्लिनात कलशेट्टी, अमन मित्तल आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील