शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याचे काम, धुळीने वाहनचालक जाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 16:35 IST

वारंवार अपघाताचे प्रकार

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : वाघबीळ घाट ते आवळी गावापर्यंत कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता चौपदरीकरणाच्या कामाची घाई सुरू आहे; परंतु रस्त्याच्या कामादरम्यान रस्तासुरक्षेच्या नियम व अटींचे पालन ठेकेदारांकडून होत नसल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या सुरक्षेची हमी नसल्याने वर्दळीच्या रस्त्यावरील वाहनाचा प्रवास राम भरोसे बनला आहे. संबंधित ठेकेदाराला दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण विभागाने रस्ता सुरक्षेत होणाऱ्या हयगयीबाबत नोटीस काढली असतानाही रस्ते सुरक्षेबाबत ठेकेदाराला फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गेल्या वर्षापासून सुरुवात झाली आहे. वाहतुकीच्या वर्दळीमुळे हा मार्ग अपघातासाठी नेहमी चर्चेत असतो. रस्त्याच्या कामामुळे त्यात भर पडली आहे.वाघबीळ घाटा ते बोरिवडेपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. काम सुरू असलेल्या रस्त्याची कड ओळखण्यासाठी किंवा धोका दर्शविण्यासाठी बहुतांश ठिकाणी दुभाजक दिसून येत नाही. काठीचे दुभाजक मातीच्या ढिगात रुतवून त्याला रिबन बांधली आहे. वापरातील रस्ता आणि कामाच्या रस्त्यावर धोकादायक दर्शक लावलेले नाहीत. काही ठिकाणी रस्ता वळविण्याचे दिशादर्शक फलक नसल्याने मुख्य रस्ता आणि कच्चा रस्ता वाहनधारकांच्या लक्षात येत नाही.

आवळी गावच्या फाट्याजवळ खुदाई केलेल्या रस्त्याची माती रस्त्यावर टाकून त्याचे सपाटीकरण केले आहे. यामुळे रस्ताकामाच्या दर्जावर लोकांनी शंका उपस्थित केली आहे. बोरिवडे गावापासून पुढे मुख्य रस्ता वाहतुकीसाठी ठेवून दुतर्फा रस्त्याचे काम सुरू आहे. कच्च्या रस्त्यावर पाणी मारण्यात हयगय होत असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील ओढ्यावर पूल, मोऱ्या बांधकामाच्या ठिकाणी दिशादर्शक, दुभाजक आणि धोका दर्शविणाऱ्या फलकाचा वापर कमी आहे. चौपदरीकरणाच्या रस्ते विकासकामाला घाई सुरू असली तरी वाहतुकीच्या सुरक्षेची ठेकेदारांकडून हमी दिसून येत नसल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.वारंवार अपघाताचे प्रकारआवळी गावाजवळील ओढ्यावर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. कच्च्या रस्त्यावर रविवारी पाणी मारण्याचे काम सुरू होते. दुचाकीवरून कोल्हापुरातील दाम्पत्य एक वर्षाच्या लहान मुलासह कोकरूडला चालले होते. पाण्यामुळे त्यांची दुचाकी घसरली. सुदैवाने यावेळी रहदारीच्या रस्त्यावरील दुर्घटना टळली. वर्दळीच्या रस्त्यावर धुलिकण, गाड्या घसरून होणारे अपघात आणि ठेकेदाराकडून रस्ता सुरक्षेबाबत होणारी हयगय यामुळे रस्त्यावरचा प्रवास वाहनधारकांना जीवघेणा ठरत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग