शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
3
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
4
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
5
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
6
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
7
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
8
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
10
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
11
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
12
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
13
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
14
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
15
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
16
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
17
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
18
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
19
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
20
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांना मायेची ऊब देणारे द्रौपदीतार्इंचे घर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 23:56 IST

मिरजेत उभारले सामाजिक कार्य : अठरा मुलांचा विवाह केला; नातेवाईक बनून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार

सचिन लाड --- सांगली --द्रौपदी जयवंत पिसाळ...मिरजेतील स्टेशन रस्त्यावर प्रताप कॉलनीत राहणारी एक साधी महिला...त्या दीड वर्षाच्या असताना आईचे छत्र हरपले. त्यांचा आजीने सांभाळ केला. रस्त्यावर भीक मागून जगल्या. गरीब आणि अनाथांचे दु:खणे काय असते, याचे चटके खाल्ल्याने त्यांचे अनाथ व वाट चुकलेल्या मुलांना आधार देण्याचे गेल्या २० वर्षांपासून कार्य सुरूआहे. १८ अनाथ मुलांचा त्यांनी स्वखर्चाने विवाहही केला. एवढे करून न थांबता बेवारस मृतदेहांच्या नातेवाईक बनून त्यांनी आतापर्यंत २९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. द्रौपदी पिसाळ मूळच्या सोलापूरच्या. लग्न झाल्यानंतर त्या मिरजेच्या झाल्या. मिरज स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर त्या कुटुंबासह राहतात. स्टेशनमधून बाहेर पडलेले सर्व प्रवासी त्यांच्या नजरेस पडतात. यामध्ये वाट चुकलेली, भेदरलेली मुलेही त्यांना दिसतात. मुलांना बोलावून त्या चौकशी करतात. पाच ते दहा वयोगटातील एक-दोन मुले सातत्याने त्यांना दिसतात. या मुलांकडे त्या चौकशी करतात. काहींना मराठी बोलता येत नाही. काही मुले चुकून रेल्वेतून आलेली असतात किंवा घरातील अडचणीमुळे बाहेर पडलेली असतात. काही मुलांना स्वत:चे नाव, गाव, पत्ता सांगता येत नाही, अशा मुलांना मायेचा आधार देण्याचे अनोखे कार्य त्या करतात. त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय त्या करतात. एवढ्यावर न थांबता त्या या मुलांना शिक्षणही देतात. यासाठी त्या पोलिसांची मदत घेतात. पोलिसांनीही द्रौपदीतार्इंच्या कार्याला अनेकदा सलाम केला आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांनी १८ अनाथ व वाट चुकलेल्या मुलांचे पालकत्व स्वीकारले. यामध्ये पाच मुली व १३ मुले होती. सात ते दहा वयोगटातील या मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. शेवटी या मुलांना त्यांनी शिक्षण दिले. त्यांना मोठे केले. एवढ्यावर न थांबता या सर्व मुला-मुलींची त्यांनी मिरजेतच लग्ने लाऊन दिली. सध्या ही १८ मुले सुखाने संसार करीत आहेत. द्रौपदीताईंच्या कार्याचे अनेकजण कौतुक करतात. रस्त्यावर एखादे मूल बेवारस दिसले तर, त्या लोकांना फोन करून माहिती देतात. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार! द्रौपदी पिसाळ या मिरजेत कुठेही बेवारस मृतदेह सापडल्याचे समजताच घटनास्थळी जातात. पोलिसांना माहिती देतात. पोलिसांचा पंचनामा झाला की, मृतदेहाची विच्छेदन तपासणी केली जाते. त्यानंतर त्या मृतदेह ताब्यात घेतात. मृत व्यक्ती ज्या जातीचा आहे, त्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करतात. आतापर्यंत त्यांनी २९ मृतेदहांवर नातेवाईक बनून अंत्यसंस्कार केले आहेत. याची नोंदही त्यांनी ठेवली आहे. दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी त्या कधीही मागे-पुढे पाहात नाहीत.