शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेती करायची की, सोडून द्यायची..?, तणनाशक, खतांच्या दरात दुपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 13:42 IST

महागाई वाढली की सांगायचे कुणाला, राज्यकर्त्यांना सांगायचे तर ते रशिया-युक्रेनमधील युद्धाकडे बाेट दाखवून रिकामे होतात.

देशात महागाईने कहर केला आहे, त्यातून शेतीही सुटलेली नाही. खते, औषधांच्या किमतीत शेतकरी होरपळून गेला असून, शेती कसायची तर हातात पैसा नाही, साेडायची तर पोराबाळांच्या पाेटात काय घालायचे, असा यक्ष प्रश्न घेऊन शेतकरी शेतीचा गाडा ओढत आहेत. महागाई वाढली की सांगायचे कुणाला, राज्यकर्त्यांना सांगायचे तर ते रशिया-युक्रेनमधील युद्धाकडे बाेट दाखवून रिकामे होतात.युद्ध दाेन परकीय देशांचे, त्याची झळ आपल्या देशातील जनतेला बसू नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखाची; पण तेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडत आहेत, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला शेतकऱ्यांना बांधत आहेत. याचा परिणाम शेतीच्या अर्थकारणावर झाला असून, युद्ध जरी रशिया-युक्रेनमध्ये असले तरी भारतीय शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कृषिप्रधान देशात स्वातंत्र्यानंतर शेती एवढी आर्थिक आरिष्टात कधीच सापडली नव्हती. सरकार एकीकडे उत्पादनवाढीचा आग्रह धरत असताना दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणाऱ्या आनुषंगिक गोष्टीबाबत कमालीची उदासीनता दाखवली जात आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत कीटकनाशक, तणनाशक व खतांच्या दरात झालेल्या वाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेती करायची की सोडून द्यायची, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

आधुनिक शेतीकडे वळत असताना शेतीचा खर्चातही मोठी वाढ झाली आहे. शेतात राबणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने यांत्रिकीकरण आले असले तरी त्यासाठी लागणारा खर्च काही कमी नाही. भांगलण करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने तणनाशकांचा वापर करावा लागत आहे. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत तणनाशकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर खतांनी मोठी झेप घेतली असून, बहुतांशी खतांचे दर १५०० रुपयांच्या पुढे आहेत. याचा एकत्रित परिणाम शेतीच्या अर्थगणितावर झाला आहे.महागडी खते घालून उत्पादन किती घ्यायचे, असा प्रश्न आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीचे खते व तणनाशकांचा वापर करून पिकवलेले पीक काढणीपर्यंत टिकेल का, टिकले तर बाजारात योग्य भावात विकेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्यांकडे नाहीत. या सगळ्या कारणांमुळे शेती आतबट्ट्यात आली आहे.

तणनाशकांच्या दरात झालेली वाढ -

तणनाशक               पूर्वीचे दर    आताचे दरग्लॅफोसेल (१०० ग्रॅम)     ७०            १४०२-४ डी ५८ (१ लिटर)   ३२०          ४२०पॅराप्युले २४ (१ लिटर)    ३२०         ४२०मेट्रीबिझोन (१०० ग्रॅम)    १२०          १८०ॲट्रॉझिऑन (५०० ग्रॅम)   १५०         २२०

खते                   पूर्वीचा दर    आताचा दर प्रति पोते

सुफला -             ११७५         १५००१०:२६:२६         ११८०         १४७०१८:१८:१०         १०२५         ११९०पाेटॅश                १०६०         १७००अमोनियम सल्फेट   ८००           ११००डीएपी               १२००          १३५०एस. एस. पी.        ३००           ४५०

शेतीला इतके वाईट दिवस कधीच आले नव्हते. खते, बियाणे, वीज सगळ्यांची दरवाढ झाली. मात्र, आमच्या पिकांना हमीभाव नाही. आतबट्ट्यातील शेतीकडे नवीन पिढी येणार नाही. - सर्जेराव पाटील (शेतकरी, गडमुडशिंगी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीInflationमहागाई