शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

शेती करायची की, सोडून द्यायची..?, तणनाशक, खतांच्या दरात दुपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 13:42 IST

महागाई वाढली की सांगायचे कुणाला, राज्यकर्त्यांना सांगायचे तर ते रशिया-युक्रेनमधील युद्धाकडे बाेट दाखवून रिकामे होतात.

देशात महागाईने कहर केला आहे, त्यातून शेतीही सुटलेली नाही. खते, औषधांच्या किमतीत शेतकरी होरपळून गेला असून, शेती कसायची तर हातात पैसा नाही, साेडायची तर पोराबाळांच्या पाेटात काय घालायचे, असा यक्ष प्रश्न घेऊन शेतकरी शेतीचा गाडा ओढत आहेत. महागाई वाढली की सांगायचे कुणाला, राज्यकर्त्यांना सांगायचे तर ते रशिया-युक्रेनमधील युद्धाकडे बाेट दाखवून रिकामे होतात.युद्ध दाेन परकीय देशांचे, त्याची झळ आपल्या देशातील जनतेला बसू नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखाची; पण तेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडत आहेत, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला शेतकऱ्यांना बांधत आहेत. याचा परिणाम शेतीच्या अर्थकारणावर झाला असून, युद्ध जरी रशिया-युक्रेनमध्ये असले तरी भारतीय शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कृषिप्रधान देशात स्वातंत्र्यानंतर शेती एवढी आर्थिक आरिष्टात कधीच सापडली नव्हती. सरकार एकीकडे उत्पादनवाढीचा आग्रह धरत असताना दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणाऱ्या आनुषंगिक गोष्टीबाबत कमालीची उदासीनता दाखवली जात आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत कीटकनाशक, तणनाशक व खतांच्या दरात झालेल्या वाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेती करायची की सोडून द्यायची, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

आधुनिक शेतीकडे वळत असताना शेतीचा खर्चातही मोठी वाढ झाली आहे. शेतात राबणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने यांत्रिकीकरण आले असले तरी त्यासाठी लागणारा खर्च काही कमी नाही. भांगलण करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने तणनाशकांचा वापर करावा लागत आहे. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत तणनाशकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर खतांनी मोठी झेप घेतली असून, बहुतांशी खतांचे दर १५०० रुपयांच्या पुढे आहेत. याचा एकत्रित परिणाम शेतीच्या अर्थगणितावर झाला आहे.महागडी खते घालून उत्पादन किती घ्यायचे, असा प्रश्न आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीचे खते व तणनाशकांचा वापर करून पिकवलेले पीक काढणीपर्यंत टिकेल का, टिकले तर बाजारात योग्य भावात विकेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्यांकडे नाहीत. या सगळ्या कारणांमुळे शेती आतबट्ट्यात आली आहे.

तणनाशकांच्या दरात झालेली वाढ -

तणनाशक               पूर्वीचे दर    आताचे दरग्लॅफोसेल (१०० ग्रॅम)     ७०            १४०२-४ डी ५८ (१ लिटर)   ३२०          ४२०पॅराप्युले २४ (१ लिटर)    ३२०         ४२०मेट्रीबिझोन (१०० ग्रॅम)    १२०          १८०ॲट्रॉझिऑन (५०० ग्रॅम)   १५०         २२०

खते                   पूर्वीचा दर    आताचा दर प्रति पोते

सुफला -             ११७५         १५००१०:२६:२६         ११८०         १४७०१८:१८:१०         १०२५         ११९०पाेटॅश                १०६०         १७००अमोनियम सल्फेट   ८००           ११००डीएपी               १२००          १३५०एस. एस. पी.        ३००           ४५०

शेतीला इतके वाईट दिवस कधीच आले नव्हते. खते, बियाणे, वीज सगळ्यांची दरवाढ झाली. मात्र, आमच्या पिकांना हमीभाव नाही. आतबट्ट्यातील शेतीकडे नवीन पिढी येणार नाही. - सर्जेराव पाटील (शेतकरी, गडमुडशिंगी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीInflationमहागाई