शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

शेती करायची की, सोडून द्यायची..?, तणनाशक, खतांच्या दरात दुपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 13:42 IST

महागाई वाढली की सांगायचे कुणाला, राज्यकर्त्यांना सांगायचे तर ते रशिया-युक्रेनमधील युद्धाकडे बाेट दाखवून रिकामे होतात.

देशात महागाईने कहर केला आहे, त्यातून शेतीही सुटलेली नाही. खते, औषधांच्या किमतीत शेतकरी होरपळून गेला असून, शेती कसायची तर हातात पैसा नाही, साेडायची तर पोराबाळांच्या पाेटात काय घालायचे, असा यक्ष प्रश्न घेऊन शेतकरी शेतीचा गाडा ओढत आहेत. महागाई वाढली की सांगायचे कुणाला, राज्यकर्त्यांना सांगायचे तर ते रशिया-युक्रेनमधील युद्धाकडे बाेट दाखवून रिकामे होतात.युद्ध दाेन परकीय देशांचे, त्याची झळ आपल्या देशातील जनतेला बसू नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखाची; पण तेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडत आहेत, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला शेतकऱ्यांना बांधत आहेत. याचा परिणाम शेतीच्या अर्थकारणावर झाला असून, युद्ध जरी रशिया-युक्रेनमध्ये असले तरी भारतीय शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कृषिप्रधान देशात स्वातंत्र्यानंतर शेती एवढी आर्थिक आरिष्टात कधीच सापडली नव्हती. सरकार एकीकडे उत्पादनवाढीचा आग्रह धरत असताना दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणाऱ्या आनुषंगिक गोष्टीबाबत कमालीची उदासीनता दाखवली जात आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत कीटकनाशक, तणनाशक व खतांच्या दरात झालेल्या वाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेती करायची की सोडून द्यायची, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

आधुनिक शेतीकडे वळत असताना शेतीचा खर्चातही मोठी वाढ झाली आहे. शेतात राबणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने यांत्रिकीकरण आले असले तरी त्यासाठी लागणारा खर्च काही कमी नाही. भांगलण करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने तणनाशकांचा वापर करावा लागत आहे. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत तणनाशकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर खतांनी मोठी झेप घेतली असून, बहुतांशी खतांचे दर १५०० रुपयांच्या पुढे आहेत. याचा एकत्रित परिणाम शेतीच्या अर्थगणितावर झाला आहे.महागडी खते घालून उत्पादन किती घ्यायचे, असा प्रश्न आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीचे खते व तणनाशकांचा वापर करून पिकवलेले पीक काढणीपर्यंत टिकेल का, टिकले तर बाजारात योग्य भावात विकेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्यांकडे नाहीत. या सगळ्या कारणांमुळे शेती आतबट्ट्यात आली आहे.

तणनाशकांच्या दरात झालेली वाढ -

तणनाशक               पूर्वीचे दर    आताचे दरग्लॅफोसेल (१०० ग्रॅम)     ७०            १४०२-४ डी ५८ (१ लिटर)   ३२०          ४२०पॅराप्युले २४ (१ लिटर)    ३२०         ४२०मेट्रीबिझोन (१०० ग्रॅम)    १२०          १८०ॲट्रॉझिऑन (५०० ग्रॅम)   १५०         २२०

खते                   पूर्वीचा दर    आताचा दर प्रति पोते

सुफला -             ११७५         १५००१०:२६:२६         ११८०         १४७०१८:१८:१०         १०२५         ११९०पाेटॅश                १०६०         १७००अमोनियम सल्फेट   ८००           ११००डीएपी               १२००          १३५०एस. एस. पी.        ३००           ४५०

शेतीला इतके वाईट दिवस कधीच आले नव्हते. खते, बियाणे, वीज सगळ्यांची दरवाढ झाली. मात्र, आमच्या पिकांना हमीभाव नाही. आतबट्ट्यातील शेतीकडे नवीन पिढी येणार नाही. - सर्जेराव पाटील (शेतकरी, गडमुडशिंगी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीInflationमहागाई