शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाघाच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:57 IST

शिवसैनिक हा वाघ आहे. त्यामुळे वाघांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये; असा विरोधकांना इशारा देतानाच पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्गात गोव्यापेक्षा सरस काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित मेळाव्यात केले.

ठळक मुद्देपहिल्याच दौऱ्यात इरादे केले स्पष्ट गोव्यापेक्षा सिंधुदुर्ग सरस बनविण्याची ग्वाही; वैभववाडीत जंगी स्वागत

वैभववाडी : शिवसैनिक हा वाघ आहे. त्यामुळे वाघांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये; असा विरोधकांना इशारा देतानाच पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्गात गोव्यापेक्षा सरस काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित मेळाव्यात केले.पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पहिला जिल्हा दौरा केला. या दौºयाची सुरुवात वैभववाडी तालुक्यापासून झाली. त्यानिमित्त येथील शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, महिला आघाडीप्रमुख निलम सावंत, बँकेचे संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी झिमाळ, तालुकाप्रमुख मंगेश लोके, नंदू शिंदे, दीपक पांचाळ, संभाजी रावराणे, प्रदीप रावराणे, अंबाजी हुंबे आदी उपस्थित होते.पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले, राज्यात सर्वात चांगला विकास करण्याची संधी सिंधुदुर्गात आहे. पर्यटन विकासाला येथे मोठी संधी आहे. त्यादृष्टीने येत्या काळात अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. ह्यसिंधुदुर्गसारखा गोव्याचा विकास कराह्ण अशी म्हणण्याची वेळ गोव्यातील जनतेवर यावी, असा विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विकास प्रक्रियेत सर्वांना विश्वासात घेतले जाईल.जिल्ह्यातील शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा कॅबिनेटमंत्री आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता हा वाघ आहे. त्यामुळे हे कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.यावेळी अरुण दुधवडकर म्हणाले, संघटनेला प्राधान्य देणारा पालकमंत्री जिल्ह्याला मिळाला आहे.

संघटना वाढीसाठी पालकमंत्री सामंत अधिक वेळ देतील, असा विश्वास व्यक्त करीत दीपक केसरकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर निधी आणला. त्याचप्रमाणे नूतन पालकमंत्री सामंतसुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आणतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अतुल रावराणे म्हणाले, पालकमंत्री उदय सांमत यांची विकासकामे करण्याची शैली सर्वश्रुत आहे. ते रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गातही त्याच शैलीने विकास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.संकल्प : पुढचा आमदार शिवसेनेचा कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचा पुढचा आमदार हा शिवसेना, महाविकास आघाडीचाच होईल असा संकल्प निश्चित करूनच आजच्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भगवा फडकविणारच, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.सत्कार फुकट जाणार नाहीपालकमंत्री म्हणून वैभववाडीत आल्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांनी माझा मनापासून सत्कार केला. हा सत्कार फुकट जाऊ देणार नाही. तसेच सत्कार कशाला केला म्हणून कार्यकर्त्यांना पश्चात्तापही होणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिली. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग