शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

corona virus- रुग्ण दाखल होताच आरटीपीसीआर करा, पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:13 IST

CoronaVirus Kolhapur : कोरोना लक्षणे असलेला रुग्णांवर स्थानिक डॉक्टरांकडून जुजबी उपचार केले जातात, खासगी दवाखान्यात आठ दिवस ठेवून रुग्ण गंभीर झाला की त्याला सरकारी दवाखान्यात पाठवले जाते, असे न करता डॉक्टरांनी रुग्णांची तातडीने आरटीपीसीआर चाचणी करून मगच उपचार सुरू करावेत अन्यथा त्यांना तहसीलदारांमार्फत नोटीस पाठवली जाईल, अशा सक्त सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देरुग्ण दाखल होताच आरटीपीसीआर करा, पालकमंत्र्यांचे आदेश खासगी डॉक्टरांना नोटीस काढणार

कोल्हापूर : कोरोना लक्षणे असलेला रुग्णांवर स्थानिक डॉक्टरांकडून जुजबी उपचार केले जातात, खासगी दवाखान्यात आठ दिवस ठेवून रुग्ण गंभीर झाला की त्याला सरकारी दवाखान्यात पाठवले जाते, असे न करता डॉक्टरांनी रुग्णांची तातडीने आरटीपीसीआर चाचणी करून मगच उपचार सुरू करावेत अन्यथा त्यांना तहसीलदारांमार्फत नोटीस पाठवली जाईल, अशा सक्त सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली.कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनेक रुग्ण जवळच्या जनरल प्रॅक्टिशनर्सकडून जुजबी उपचार करून घेतात. लक्षणे दिसत असली तरी डॉक्टर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करायला लावत नाहीत. नंतर आजार बळावला की रुग्ण सरकारी दवाखान्यात दाखल केला जातो.

तसे अनेक खासगी दवाखान्यांमध्ये आठ दिवस रुग्णांवर उपचार सुरू असतात, रुग्णाची स्थिती अतिगंभीर झाली की त्यांना सरकारी दवाखान्यात हलवले जाते यामुळे सरकारी रुग्णालयात मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यातील सर्वाधिक मृत्यू हे दाखल झाल्यानंतर शेवटच्या ७२, ४८ किंवा २४ तासांतील आहेत.

याचा अर्थ त्यांना योग्य पद्धतीने उपचार मिळाले नाहीत असाच होतो. त्यामुळे डॉक्टरांनी लक्षणे दिसताच रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या डेथ ऑडिटमध्ये संबंधित डॉक्टरने ही चाचणी केली नसल्याचे आढळून आल्यास त्यांना तहसीलदारांमार्फत नोटीस पाठवली जाईल.तपासण्यांमुळे पॉझिटिव्ह रेट जास्तमंत्री पाटील म्हणाले, प्रशासनाने तपासण्या वाढवल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट जास्त दिसत आहे. तरीदेखील पूर्वीपेक्षा कमी होऊन २१ टक्क्यांवर आला आहे. तपासण्या वाढल्याने फायदाच होणार आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती रस्त्यावर फिरली की संसर्ग वाढेल, त्यापेक्षा तपासणीमुळे कोरोनाचे लवकर निदान होऊन तातडीने उपचार सुरू करता येईल. संसर्गदेखील कमी होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर