शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 05:56 IST

दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक वर्गाला खाली दाबायचा हा तर भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडाच आहे. संविधानाचे रक्षण हेच त्यावरील उत्तर आहे. ते कसे करायचे, याचे माझ्याकडे दोन-तीन सोपे उपाय आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पंतप्रधान मोदी काहीही करू देत, ते कितीही डान्स-गाणी करू देत. भाजपवाले कितीही नाचू देत ५० टक्के आरक्षण मर्यादेची भिंत आम्ही तोडणारच. जातनिहाय जनगणनेचा कायदा आम्ही लोकसभा व राज्यसभेत करणार आहे. जगातील कोणतीही शक्ती त्यापासून आम्हाला रोखू शकत नाही. हा आमचा शब्द आहे आणि हवे तर तो मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी  शनिवारी कोल्हापूर येथे संविधान सन्मान संमेलनात इंडिया आघाडीचा पुढील कृती कार्यक्रम जाहीर केला. 

या दोन गोष्टी केल्यानंतरच देशातील ९० टक्के समाज असलेल्या दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन समाजाच्या विकासाचे राजकारण सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  राहुल गांधी यांनी संविधानाच्या प्रतिमेला अभिवादन करूनच भाषणाला सुरुवात केली.  देशाचे अर्थकारण, समाजकारण, प्रशासकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था १० टक्के समाजाच्या हातात एकवटली असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

मोदींचे बेगडी संविधान प्रेम...

पंतप्रधान मोदी यांना संविधानबद्दल अजिबात ममत्व नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर संविधान मस्तकी लावले. देशातील जनतेने त्यांना निकालाद्वारे हे करायला लावले, अशी टिप्पणीही राहुल गांधी यांनी केली.

संविधानाचे रक्षण करण्यासाठी सांगितले दोन सोपे उपाय...

दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक वर्गाला खाली दाबायचा हा तर भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडाच आहे. त्याच्याविरोधात आपल्याला रणनीती निश्चित करायची आहे. संविधानाचे रक्षण हेच त्यावरील उत्तर आहे. ते रक्षण कसे करायचे, याचे माझ्याकडे दोन-तीन सोपे उपाय आहेत. पहिला उपाय ५० टक्के आरक्षण मर्यादेची भिंत तोडली पाहिजे. दुसरा उपाय हा जात जणगणनेचा आहे. देशातील मागासलेल्या जातसमूहाची लोकसंख्या किती आहे, हे कुणालाच अधिकृत माहीत नाही. त्यामुळे जात समूहांची सामाजिक-आर्थिक पाहणी करणारच.

आंबेडकर यांची दूरदृष्टी

राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवातच ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असे म्हणत केली. शिका म्हणजे नुसते कॉलेजचे शिक्षण नव्हे, तर परिस्थितीची आकलन करण्याची क्षमता तुमच्यात तयार व्हायला हवी. संघटित झाला नाही तर तुमची ताकद एकवटणार नाही आणि व्यवस्था बदलासाठी  दिशा सापडणार नाही. माझे पदवीपर्यंतचे शिक्षण भारतातच झाले. त्यावेळी शालेय शिक्षणात अस्पृश्यतेबद्दल काही वाचायला मिळाले नाही. दलितांच्या हक्कांबद्दलचे एकही पुस्तक तेव्हा शिक्षणात नव्हते, असेही ते म्हणाले.  

हे संमेलन कोल्हापुरातच का घेतले...?

देशातील धर्मवाद्यांचा, जातीयवाद्यांचा रथ रोखण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. कोल्हापूरही जगाच्या पाठीवर सर्वात प्रथम आरक्षण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची भूमी असल्यानेच दक्षिण भारतातून उत्तरेकडे जाताना येणारे पहिले समतेचे गाव म्हणून कोल्हापुरात आम्ही संमेलन घेतल्याचे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस