शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 'मनसे'चे इंजिन झाले ब्लॉक

By admin | Updated: October 20, 2014 00:44 IST

माजी आमदारांनादीड हजार मते

 

नाशिक : प्रचंड चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशी काडीमोड घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या शिवसेनेला ही विधानसभा निवडणूक संमिश्र ठरली असून, त्या तुलनेत भाजपाचे कमळ एकावरून चारवर गेल्याचे दिसून आले. मात्र सेनेची संख्या चारवरून चारच राहिल्याने ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वाने ही निवडणूक गेल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांचे राज्यात शिवसेनाच नंबर एकला राहण्याच्या अभिवचनाला जिल्ह्यातील शिवसैनिकांबरोबरच मतदारही जागल्याचेच यानिमित्ताने पुढे आले आहे. राज्यभरात सभांची हाफ सेंच्युरी पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात एक- दोन नव्हे, तर चक्क तीन-तीन सभा घेतल्या. त्यात मनमाड, येवला व नाशिकच्या सभेचा चांगलाच परिणाम देवळाली, सिन्नर, मालेगाव बाह्य आणि निफाड मतदारसंघाला झाल्याचे निकालावरून दिसून येते.येवल्यात तर पालकमंत्र्यांसारखा मातब्बर आणि कसलेला राजकारणी असूनही तुलनेने नवख्या असलेल्या संभाजी पवार यांनी बऱ्यापैकी लढत दिली. इगतपुरी मतदारसंघात शिवसेनेचे तसे पाहिले तर प्राबल्य नसले, तरी राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमधीलच काही बंडखोर आणि एकवटलेला निष्ठावान शिवसैनिक यांच्यामुळे इगतपुरीतून शिवराम झोले निवडून येण्याची शक्यता होती; मात्र आदिवासी मतदारांनी पुन्हा पंजालाच हात दिला. त्यामानाने सिन्नर विधानसभेची निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याने डोंगराएवढी विकासकामे करूनही माणिकराव कोकाटेंनी आमदारकी तोंडाळ वाणीने घालविली अन् त्याला काही अंशी वंजारी समाजाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जोड लाभल्यानेच शिवसेनेचे राजाभाऊ वाजे हे माणिकरावांना हरवू शकले, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. नाशिक शहरात अक्षरश: गुंडगिरी आणि तडीपारीची प्रतिमा तयार झालेल्या सुहास कांदेना विधानसभेत पाठविण्याची तयारी केल्याचे बोलले जात होते; मात्र मतदारांनी पुन्हा एकदा विकासालाच पसंती दिल्याने येथील सेनेची जागा येण्याची शक्यताही मावळली, असेच म्हणावे लागेल. शिवसेनेची सर्वात खात्रीशीर जागा असलेल्या मालेगाव बाह्यमधून अपेक्षेप्रमाणे आणि काहीशी अपेक्षित आघाडी घेऊन दादा भुसे तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले असून, कदाचित त्यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. तीच बाब काठावर पास झालेल्या अनिल कदम यांच्या बाबतीतही होऊ शकते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पराभूत मनोवृत्ती बाळगणाऱ्या अनिल कदम यांना शिवसैनिकांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्याच सभेचे टॉनिक आणि राष्ट्रवादीची छुपी मदत मिळाल्याची चर्चा आहे. सेनेने मागील वेळेप्रमाणेच चार जागा राखण्यात यश मिळविले असले, तरी त्यांना दिंडोरीची जागा गमवावी लागली. मात्र दिंडोरीच्या बदल्यात त्यांना सिन्नरच्या जागेचा लाभ झाला. सेनेला जिल्ह्यातून किमान सहा ते सात जागांची अपेक्षा होती; मात्र त्यांची निराशाच झाली. शहरात तर बबनराव घोलपांचा करिश्माच योगेश घोलप यांना तारू शकला असला, तरी बोरस्ते आणि बडगुजर कंपनी सपेशल अपयशी ठरली. शहरात काही मावळ्यांनीच फंदफितुरी केल्याची चर्चा आहे.