शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

जिल्हास्तरीय आरोग्य अधिकारी सुट्टीदिवशी ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:23 AM

कोल्हापूर : एखादा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गतवर्षीसारखी कार्यपद्धती अवलंबण्यात ...

कोल्हापूर : एखादा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गतवर्षीसारखी कार्यपद्धती अवलंबण्यात येत नसल्याबद्दल ‘लोकमत’ने मंगळवारी वस्तुस्थिती मांडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सुट्टीदिवशीही ग्रामीण भागात धाव घेतली. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना नेमकी काय प्रक्रिया करावी याबाबतही तातडीने सूचना करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी नागरिक पॉझिटिव्ह आल्यानंतर सॅनिटायझेशन करणे, दारावर स्टीकर लावणे, तातडीने कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करणे ही प्रक्रिया राबवण्यात येत होती. मात्र, आता या प्रक्रियेमध्ये शैथिल्य आल्याचे या वृत्तामध्ये मांडण्यात आले होते.

यानंतर सकाळीच जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. याेगेश साळे यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून नेमके काय केले पाहिजे या सूचना दिल्या. तसेच त्यांनी मोरेवाडी, पाचगाव, आर. के. नगर, कळंबा, गोकुळ शिरगाव आदी गावांना भेटी दिल्या. या ठिकाणी गृह अलगीकरणामध्ये राहात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी भेट देऊन तेथे रुग्णाची कशा पद्धतीने काळजी घेतली जाते याची चौकशी केली. तसेच सोबतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि ग्रामपंचायतीशी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

माता, बालआरोग्य संगेापन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनीही शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव, बांबवडे, सरूड गावांना भेटी दिल्या. या परिसरातील बहुतांशी कोविड पॉझिटिव्ह रुग्ण हे माण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचीही माहिती घेतली.

चौकट

‘लोकमत’च्या बातमीनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिलेल्या सूचना

१ आपल्याकडील गृह अलगीकरणाच्या नागरिकांची काळजी घेतली का?

२ त्यांची दररोज दोनवेळा फोनद्वारे विचारणा करावी.

३ रुग्णांचा ताप आणि ऑक्सिजन पातळीची नोंद ठेवावी.

४ दरवाजावर स्टीकर लावावे.

५ रुग्णाची काळजी घेणाऱ्यास मार्गदर्शन करावे.

६ रुग्णाकडे आवश्यक असा किट द्यावा.

७ अशा रुग्णाचे घर दोनवेळा निर्जंतुकीकरण करण्यास सांगावे.

८ रुग्णास स्वतंत्र खोली आणि अटॅच टॉयलेट असल्याची खात्री करावी.

९ प्रत्येक रुग्णाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतः निरीक्षण करावे आणि त्याची नोंद ठेवावी.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय योग्यच...

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. मात्र, २४ तासांत त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला; परंतु मुंबई, पुण्याहून पुन्हा नागरिक गावकडे येऊ लागले आहेत. ग्रामसमित्या अजूनही म्हणाव्या तितक्या सक्रिय झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी हा धोका लक्षात घेऊनच कोरोना चाचणीचा निर्णय सक्तीचा केला होता व तो योग्यच होता, असे म्हणण्याची पाळी आता येणार आहे.

१३०४२०२१ कोल महापालिका

कोल्हापूर महापालिका गृह अलगीकरणमध्ये रुग्ण असलेल्या घरावर अशा पद्धतीने स्टीकर लावत असल्याची माहिती आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.