शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
4
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
5
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
6
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
7
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
8
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
9
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
10
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
11
भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
12
"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
13
New Rules 1 December 2025: आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
14
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
15
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
16
'गुरुजन' इतके क्रूर होऊच कसे शकतात? आपण फार मोठी जोखीम स्वीकारतो आहोत
17
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
18
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
19
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
20
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात भात ओतल

By admin | Updated: December 5, 2014 23:31 IST

‘स्वाभिमानी’चे आंदोलन : भात खरेदी केंद्रप्रश्नी प्रशासनाचा निषेध; जोरदार निदर्शने, ठोस आश्वासनानंतरच माघारे

कोल्हापूर : शासनातर्फे भात खरेदी केंद्रे सुरू करण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोलिसी बळाला झुगारून जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात भाताची पोती ओतून जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत भात खरेदी केंद्र सुरू होत नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका घेऊन ओतलेल्या भातावरच कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. उद्या, शनिवारपासून शाहूवाडी तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी चार वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, आदी तालुक्यांत भात पीक अधिक आहे. सध्या शेतकरी भाताची विक्री करत आहेत. परंतु, व्यापारी भाताची आधारभूत किंमत १३६० असताना ८०० ते १००० रुपये प्रती क्विंटलने खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्यामुळे यापूर्वी वेळोवेळी संघटनेने बैठका घेऊन भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. जिल्हा प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत राहिला. त्यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शाहूवाडी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी दुपारी एक वाजता भाताचे दोन टेम्पो ट्रॅक्स घेऊन दाखल झाले. याचा सुगावा लागताच पोलिसांनी कडे करून जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, टेम्पो ट्रॅक्समधील चार ते पाच पोती खांद्यावर घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोर घुसले. मात्र, विरोधाला न जुमानता कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कक्षाच्या दारातच भात ओतले. ‘जिल्हा प्रशासनाचा निषेध असो’, ‘खासदार राजू शेट्टींचा विजय असो’, ‘भात खरेदी केंद्र सुरू झालेच पाहिजे’ अशा घोषणा देऊन लक्ष वेधले. कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोरील दरवाजा बंद केले. दरवाजासमोर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. तडजोड करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या कक्षात येथील महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे मार्केटिंग अधिकारी एम. एम. पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे राज्य संचालक संदीप नरके यांच्या उपस्थितीत ‘स्वभिमानी’च्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. चर्चेवेळी ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी व शेतकरी यांनी भात खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब झाल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. गेल्यावर्षी शाहूवाडी तालुक्यातील केंद्रात खरेदी केलेले भात ठेवण्यासाठी घेतलेल्या गोडावूनचे भाडे अद्याप मिळाले नसल्याचे भगवान काटे यांनी निदर्शनास आणले. भात खरेदी केंद्र सुरू केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे ठणकावून सांगितले. प्रा. जालंदर पाटील यांनी प्रशासनाची चांगली कानउघाडणी केली. उद्यापासून भात खरेदी केंद्र सुरू करण्याच्या ठोस आश्वासनानंतरच कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात अनिल मादनाईक, सागर शंभूशेट्टी, अमर पाटील, प्रमोद कदम, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)भात भरून दिले..ओतलेल्या भातासह घेऊन आलेले भाताचे दोन टेम्पो घ्यावेत, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे धरला. तडतोड झाल्यामुळे प्रशासनातर्फेच ओतलेले भात भरून देण्यात आले.आत्महत्या करायला लावू नका... एकीकडे पिकत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे. आम्ही अनेक अडचणीवर मात करत भात पिकवला आहे. मात्र, आधारभूत किमतीनेही खरेदी करण्यास दिरंगाई होत असल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, असे वसंत पाटील यांनी प्रशासनाला सांगितले.