शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur Flood: जिल्हाधिकाऱ्यांनी पुराच्या नियोजनासाठी दिला अल्टिमेटम्, सूक्ष्म नियोजन करण्याच्या दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 12:08 IST

सर्व शासकीय विभागांंनी करायच्या कामांची जबाबदारी निश्चित केली आहे.

कोल्हापूर : मागील दोन वर्षांमध्ये आलेल्या महापुराचा अनुभव घेऊन सर्व शासकीय विभागांनी त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करा, नागरिकांच्या मदतीसाठी निर्माण कराव्या लागणाऱ्या सोयी-सुविधांची आताच तयारी करून ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही, अशी सूचना देत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी पुराच्या नियोजनासाठी सर्व शासकीय विभागांना अल्टिमेटम् दिला. बुधवारी (दि. ८) पुन्हा या विभागांचा आढावा घेतला जाणार आहे.यंदा शंभर टक्के पाऊस होणार असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू आहे. सर्व शासकीय विभागांंनी करायच्या कामांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्याबाबतचा आदेश २६ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्या आदेशानुसार व दिलेल्या जबाबदारीनुसार काम झाले आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची बैठक शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्य, बीएसएनएल, महावितरण या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांची चेकलिस्ट...पूरबाधीत होणाऱ्या भागात खासगी बोअरवेल अधिग्रहण करणे, जिथे महिला कर्मचारी आहे त्यांच्या सोबतीला आणखी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती, धरणक्षेत्रावर अखंडित वीजपुरवठा, पूरग्रस्त नागरिकांच्या स्थलांतरासाठीच्या जागा, त्यांना पिण्याचे पाणी, निवारा, जेवण, वैद्यकीय सेवा, जनावरांसाठी चारा पुरविणाऱ्या संस्था, पोकलँड, डंपर, जेसीबी पुरवणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत करार करणे यांसह पूरस्थितीत कराव्या लागणाऱ्या सगळ्या उपाययोजनांवर जिल्हाधिकाऱ्यांनी मुद्देनिहाय आढावा घेतला.

सक्त सूचनायावेळी काही विभागांनी अजूनही दिलेल्या जबाबदारीनुसार काम केलेले नसल्याचे लक्षात आले, तर काही विभागांचे काम अपूर्ण आहे, काही विभागांच्या नियोजनात त्रृटी आहेत हे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व विभागांना, तातडीने आपले काम पूर्ण करा, अशी सक्त सूचना देत अल्टिमेटम् दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूर