शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

छत्रपती शिवरायांच्या अप्रकाशित पत्रांचा शोध

By admin | Updated: April 19, 2015 01:11 IST

अनेक पैलूंवर नवा प्रकाश टाकणारी महाराजांची आठ अप्रकाशित पत्रे जनतेसमोर

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांची आग्ऱ्याहून सुटका, विशाळगड किल्ल्याच्या कारभाराची माहिती, दक्षिण दिग्विजयात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या रघुनाथ पंडित यांना वतन इनाम, शिवरायांचे काका त्र्यंबकजी भोसले यांना इनाम, जयकृष्ण व जयराम चोबे यांना वर्षासन दिल्याचे आज्ञापत्र, तृतीयपंथीयांना सनद अशा विविध विषयांवर शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या आठ अप्रकाशित पत्रांचा शोध लागल्याची माहिती शनिवारी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, गतवर्षी शिवछत्रपतींच्या दुसऱ्या मुद्रेचे संशोधन मांडल्यानंतर यंदा शिवचरित्रातील अनेक पैलूंवर नवा प्रकाश टाकणारी महाराजांची आठ अप्रकाशित पत्रे जनतेसमोर आणत आहे. या पत्रांमुळे शिवचरित्र लेखन संशोधनात महत्त्वाची भर पडणार आहे. शिवाजी महाराजांचे १४ मार्च १६७१ रोजीचे विशाळगडासंदर्भात पहिलेच पत्र मिळते. त्यात दुधोजी आहिरराऊ हे हवालदार होते, याची माहिती मिळते. १५ एप्रिल १६७१ चे विशाळगडावरील कदीम तैनातीबद्दलचे पत्र, दक्षिण दिग्विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रघुनाथ पंडित यांना १५ एप्रिल १६७१ ला इनाम दिलेले पत्र, त्र्यंबकजी भोसले या शिवरायांच्या काकांनी कुतूबशहाबरोबर झालेल्या राजकारणात बजावलेली भूमिका व त्यांना शिवरायांची वतने देण्याबाबतचे २६ सप्टेंबर १६७७ व १६७८ चे पत्र मिळाले आहे. सैन्याच्या सरंजामासाठी गावे लावून देताना त्या प्रदेशातील गडकोट मध्यवर्ती सत्तेच्या हाताखाली ठेवण्याच्या आज्ञापत्रात आलेल्या धोरणाचा खुद्द शिवाजी महाराजांच्या पत्रात आलेला उल्लेख व आज्ञापत्र आहे. तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिलेली सनद, वर्षासनाचे आज्ञापत्र तसेच मालोजी घोरपडे यांना शिवाजी महाराजांनी दिलेल्या पत्राची एक तालिका कोल्हापूरच्या दप्तरखान्यात आहे. अशाप्रकारे ही आठ पत्रे आम्हाला कोल्हापूर रेकॉर्ड आॅफिसमधील वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये व शाहू संशोधन केंद्राच्या आप्पासाहेब पवार यांनी जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये सापडली आहेत. ही पत्रे शोधण्याची प्रेरणा आम्हाला डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या १९४५ साली इंडियन हिस्ट्री कमिशनला लिहिलेल्या एका पत्रामुळे मिळाली. परिषदेस वसंतराव मुळीक, पुराभिलेखागार कार्यालयाचे गणेश खोडके, मोडी अभ्यासक अमित आडसुळे, उत्तम नलवडे, ओंकार कोळेकर, राहुल शिंदे, विक्रमसिंह पाटील, पवन निपाणीकर, दिगंबर भोसले, अवधूत पाटील, राम यादव व सुनील मुळे उपस्थित होते. २५ दिवसांचा दावा चुकीचा या आठ पत्रांमध्ये सर्वांत महत्त्वाचे पत्र आहे, ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेचे. महाराज १७ आॅगस्ट १६६६ रोजी आग्ऱ्याहून निसटले आणि २२ नोव्हेंबर रोजी ते राजगडावर पोहोचले. ३ आॅक्टोबरला त्यांनी जयकृष्ण चोबे या पुजाऱ्यांना वर्षासन दिले आहे. ५ मार्च १६६७ रोजी या कागदावर विराजितेचे मोर्तब करून दिले. या पत्रामुळे शिवाजी महाराज आग्ऱ्याहून सुटल्यानंतर ४७ दिवस मथुरेतच होते, हे सिद्ध होते. त्यामुळे शिवाजी महाराज २५ दिवसांत राजगडावर पोहोचले, हा दावा फोल ठरतो. निष्क्रिय शिवाजी विद्यापीठ ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची सध्या फक्त २५२ पत्रे उपलब्ध आहेत. खरे तर महाराजांच्या नावे चालणाऱ्या या विद्यापीठात तीन प्रमुख केंद्रे चालविली जातात. त्यांच्याकडून या पत्रांचे व इतिहासकालीन कागदपत्रांचे संकलन करणे अपेक्षित होते. आजवर आम्ही जे काही संशोधन मांडले, शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या मुद्रेची माहिती जगासमोर आणली, त्या कशाचीच दखल घ्यावी, असे या व्यवस्थेला वाटले नाही. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांची १५ पत्रे पुस्तकरूपात प्रकाशित केली, त्यांत अक्षम्य चुका आहेत. गेली दोन वर्षे आम्ही ते पुस्तक मागे घ्यावे, यासाठी पाठपुरावा करीत आहोत; पण त्यांचीही तयारी नाही.