शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

‘थेट पाईपलाईन’ काम निकृष्ट दर्जाचे, त्रयस्त यंत्रणेमार्फत तपासणी व्हावी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:44 IST

पालकमंत्री म्हणतात की, ८८७ दिवस चंद्रकांत पाटील यांनी काम रखडविले. जर पाटील यांना तसे करायचे असते तर मग केंद्र सरकारचा निधीच थांबविला असता. पण त्यांनी तसे केले नाही. योजना लवकर पूर्ण व्हावी अशीच आमची सर्वांची इच्छा आहे. फक्त ती दर्जेदार, गुणवत्तेच्या निकषावर असावी, असे सत्यजित कदम म्हणाले.

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम लवकर संपविण्याच्या प्रयत्नात अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, राज्य तसेच केंद्र सरकारने कामाची त्रयस्त यंत्रणेमार्फत तपासणी करावी, अशी मागणी भाजप व ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी बुधवारी केली. महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचे योजनेच्या कामावर नियंत्रण नसल्यामुळे ७० कोटींचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर पडल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

भाजप व ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी बुधवारी धरणक्षेत्रात जाऊन तेथे सुरू असणाऱ्या योजनेच्या कामाची पाहणी केली. यावेळी सत्यजित कदम, सुनील कदम, विजय सूर्यंवंशी, अजित ठाणेकर, विजय खाडे पाटील, आशिष ढवळे, किरण नकाते, वैभव माने, भगवान काटे, संग्रामसिंह निकम उपस्थित होते. त्यांना महापालिकेचे उपअभियंता सुरेश नागरगोजे व कन्सल्टंन्सीचे प्रतिनिधी आर. बी. पाटील यांनी माहिती दिली.पत्रकारांना माहिती देताना सत्यजित कदम यांनी सांगितले की, ४२५ कोटी ४१ लक्ष खर्चाची योजना १५.४८ टक्क्यांनी जादा दराने मंजूर केली. त्यामुळे महानगरपालिकेवर ७० कोटींचा अतिरिक्त बाेजा पडला. केंद्र सरकारच्या ६० वाट्याचे २५५.२४ कोटींचा निधी महापालिकेला मिळाला आहे. सन २०१७ पर्यंत योजना पूर्ण करायची होती; पण योजनेचे काम पूर्वनियोजित पद्धतीने न केल्यामुळे योजना पूर्ण व्हायला विलंब झाला. योजना लवकर पूर्ण होऊन शहरवासीयांना चांगले पाणी मिळावे. परंतु, कोणाच्या तरी आमदारकीसाठी योजनेचे काम घाईगडबडीने उरकले जाऊ नये.

योजनेच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. सध्या सुरू असणाऱ्या दोन जॅकवेल कामावर कोणाही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. १००० एचपीच्या चार पंप पंपाची खरेदी २०१७ मध्ये झाली. ते पंप गंजले असण्याची शक्यता आहे. योजनेचे काम रखडले असताना पंप खरेदी करण्याची का घाई करण्यात आली असा सवाल करून कदम यांनी सांगितले की, जॅकवेलचे काम अजून पन्नास टक्के पूर्ण झालेले नाही. जॅकवेल, इन्टेकवेल, इन्स्पेक्शन वेल दरम्यान अजून पाईपलाईन टाकलेली नाही. त्यामुळे ही कामे या तीन चार महिन्यात तरी होण्याची शक्यता नाही. असे असताना ३१ मे पर्यंत योजनेचे काम पूर्ण करून लोकांना पाणी देणार असे सतेज पाटील, हसन मुश्रीफ सांगत आहेत. ही जनतेची फसवणूक आहे.

भाजपकडून १९ पैकी ११ परवानगी

योजनेसाठी लागणाऱ्या परवानगी न घेताच काम सुरू केले. योजना घाईगडबडीत सुरू करण्यात आली. २०१४ ते २०१९ या काळात भाजपचे सरकार होते. या काळात चंद्रकांत पाटील यांनी १९ पैकी ११ परवानगी मिळवून दिल्या आहेत, असे विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. हेड वर्कचे काम आधी सुरू होणे आवश्यक असताना आधी जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू केले. काम करीत असताना क्वालिटी असेसमेंट रिपोर्ट घेतला नाही. त्यामुळे कामाचा दर्जा संशयास्पद वाटतो, असेही ते म्हणाले.

मग निधीच दिला नसतापालकमंत्री म्हणतात की, ८८७ दिवस चंद्रकांत पाटील यांनी काम रखडविले. जर पाटील यांना तसे करायचे असते तर मग केंद्र सरकारचा निधीच थांबविला असता. पण त्यांनी तसे केले नाही. योजना लवकर पूर्ण व्हावी अशीच आमची सर्वांची इच्छा आहे. फक्त ती दर्जेदार, गुणवत्तेच्या निकषावर असावी, असे सत्यजित कदम म्हणाले.

जनतेचे पैसे खर्च

योजनेसाठी कोणाच्या खासगी खिशातून खर्च होत नाही, तर जनतेच्या पैशातून होत आहे. त्यामुळे योजना दर्जेदार झाली पाहिजे. परंतु, सध्या योजनेवर कोणा तज्ज्ञांचे नियंत्रण नसल्यामुळे शंका येत आहे. जो दावा केला जात आहे तो कागदोपत्री दिखावा आहे. केंद्र सरकारने कामाची चौकशी करावी, तशी मागणी आम्ही करणार असल्याचे सुनील कदम यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीBJPभाजपाSatyajit Kadamसत्यजित कदम