शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

कर्जदारांचा ‘विकास’; महामंडळे भकास- थकबाकी साडेअठरा कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:05 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींच्या हाताला काम देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने सुरू झालेल्या विकास महामंडळांची कोल्हापुरातील स्थिती विदारक आहे. टोलेजंग इमारतीत कार्यालये नावालाच उरली असून, बीजभांडवल योजनेंतर्गत दिलेली कर्जेच वसूल होत नसल्याने थकबाकीचा आकडा साडेअठरा कोेटींवर जाऊन

ठळक मुद्देकर्जमाफीच्या आमिषाने बीजभांडवल योजनेंतर्गत वसुलीच नाही

- नसिम सनदी ।कोल्हापूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींच्या हाताला काम देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने सुरू झालेल्या विकास महामंडळांची कोल्हापुरातील स्थिती विदारक आहे. टोलेजंग इमारतीत कार्यालये नावालाच उरली असून, बीजभांडवल योजनेंतर्गत दिलेली कर्जेच वसूल होत नसल्याने थकबाकीचा आकडा साडेअठरा कोेटींवर जाऊन पोहोचला आहे. कर्जमाफीच्या आशेने लाभार्थ्यांकडून कर्जे भरण्यास टाळाटाळ होत असल्याने थकबाकी वाढतच आहे.

विचारेमाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये इतर मागासवर्ग, संत रोहिदास चर्मोद्योग, अण्णा भाऊ साठे, जोतिबा फुले या महामंडळाचे कामकाज चालते. तिसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागेत या कार्यालयांचा संसार सुरू आहे; पण सध्या वसुलीच नसल्याने महामंडळातील योजनांचे नव्याने अर्ज घेणेही थांबले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा राबता कमी झाला असून, भल्यामोठ्या इमारतीतील कार्यालयात शुकशुकाट असतो.

या चार महामंडळाकडून बीजभांडवल योजना राबवली जाते. यात बँकेचे ४ ते ६ टक्के दराने ७५ टक्के कर्ज, महामंडळाकडून २0 टक्के अनुदान आणि लाभार्थ्यांचा ५ टक्के हिस्सा असे वर्गीकरण होते. यातून वंचित घटकाने उद्योग उभारून प्रगती साधायची आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया वर्षभर सुरू असते, तथापि अलीकडे उद्दिष्टाच्या तुलनेत लाभार्थ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे, शिवाय कर्जांची वसुलीच होत नसल्याने नव्याने कर्ज देण्याबाबत बँकांनी हात वर केले आहेत. २00८ साली शासनाने शेतकºयाबरोबरच महामंडळानाही कर्जमाफी दिली होती. आताही कर्जमाफी व्हावी, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे. माफी होईल या अपेक्षेने कोण कर्जेच भरत नसल्याने व्याजही वाढत चालले आहे.महामंडळाची सद्य:स्थितीइतर मागासवर्ग महामंडळ : १९९९ साली स्थापन झालेल्या या महामंडळाने आजअखेर ६६0 लोकांना ६ कोटी ७0 लाखांचे कर्जवाटप केले. त्यापैकी ३३0 जणांनी कर्ज भरले असून, ४३३ जणांकडे ४ कोटी थकीत आहेत. चालू वर्षी ५0 प्रकरणांचे उद्दिष्ट होते. फक्त ९ अर्ज आले, त्यापैकी एकच मंजूर झाला आहे.

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ : १९७४ साली स्थापन झालेल्या या महामंडळाची ५२७ कर्जप्रकरणे प्रलंबित आहेत. ९ कोटींची थकबाकी असल्याने नवे अर्ज स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यातही अशीच परिस्थिती आहे.अण्णा भाऊ साठे महामंडळ : १९८५ साली स्थापन झालेल्या या महामंडळाचे १00 प्रकरणांचे उद्दिष्ट्य होते त्यापैकी २४ जणांना तर बीजभांडवल योेजनेतून ६0 उद्दिष्टांपैकी ११ जणांना लाभ दिला आहे. आतापर्यंत वाटप केलेल्या ६९८ प्रकरणांची १ कोटी २७ लाख ५८ हजारांची थकबाकी आहे. २0१३ पासून व्यवस्थापक पदही रिक्त असून, कर्मचारी भरतीही लटकली आहे. तिघांना प्रत्येकी हजाराची शिष्यवृत्ती दिली आहे.

जोतिबा फुले महामंडळ : १९७८ साली स्थापलेल्या या महामंडळाकडे आॅगस्टपासून थेट अनुदानाची नवी योजना आली आहे; पण त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. ९९0 प्रकरणांची चार कोटी २१ लाखांची रक्कम थकीत आहे. यात बीजभांडवलची ९५ प्रकरणे प्रलंबित आहेत. चालू महिनाअखेर ८ लाख ९७ हजारांची वसुली झाली.इतर मागासवर्ग विकास महामंडळ : ४ कोटीसंत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ : ९ कोटीअण्णा भाऊ साठे विकास महामंडळ : १ कोटी २७ लाखजोतिबा फुले विकास महामंडळ : ४ कोटी २१ लाख 

वारंवार आवाहन करून योजनांचा लाभ घेण्यात आणि कर्ज भरण्यास लाभार्थी टाळाटाळ करतात. राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ही प्रकरणे मंजूर करावयाची असतात, याबद्दल वारंवार आवाहन केले गेले आहे.- एच. पी. बिरासदार,जिल्हा व्यवस्थापक, इतर मागासवर्ग महामंडळलाभार्थ्यांची पैसे भरण्याची मानसिकताच दिसत नाही. वसुलीचा ओघ कमी झाल्याने प्रलंबित प्रकरणांचाही ढीग वाढत चालला असून, त्यांना लाभ देणे अवघड बनले आहे.-डी. एन. रोकडे, जिल्हा व्यवस्थापक, जोतिबा फुले महामंडळवसुली होत नसल्याने प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. शासनाकडून निधीही मिळत नाही. अर्ज स्वीकारणेही बंद केले आहे. वसुलीसाठी जोर लावला तरी उपयोग होत नाही. - एन.एम.पवारजिल्हा व्यवस्थापक,संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ 

टॅग्स :MONEYपैसाfraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूर