शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कोल्हापूरच्या हद्दवाढप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही प्रशासनाकडून प्रस्ताव नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:21 IST

मनपा-जि.प.मध्ये ताळमेळ नाही

कोल्हापूर : कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या अनुषंगाने लगतच्या आठ गावचा नवीन प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिली, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी तसा प्रस्ताव तत्काळ राज्य सरकारला पाठवावा म्हणून पत्र दिले, तरीही गेल्या दहा- बारा दिवसांत महानगरपालिका असो की जिल्हा परिषद प्रशासन असो त्यांच्याकडून काहीच हालचाली सुरू नसल्याचे समोर येत आहे.कोल्हापूर शहराची हद्दवाढ केली जावी यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती, तसेच हद्दवाढ होणे का आवश्यक आहे याचे महत्त्व पटवून दिले होते. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या दोन्ही प्रधान सचिवांना हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, तसेच राज्य निवडणूक आयोगाशीही चर्चा करावी, अशा सूचना दिल्या होत्या.महापालिका प्रशासकांना तसे पत्र देण्याचीही सूचनाही आमदार क्षीरसागर यांना केली होती. त्यानुसार क्षीरसागर यांनी दि. २२ जूनला प्रशासकांना आठ गावांचा उल्लेख करून नवीन प्रस्ताव पाठवावा, अशी पत्राद्वारे विनंती केली होती. या पत्रावर अद्याप महापालिका व जिल्हा परिषद यांच्याकडून कसलीच कार्यवाही पूर्ण झालेली नाही. महापालिका नगररचना कार्यालयातील अधिकारी सांगतात की, आम्ही जिल्हा परिषदेला पत्र पाठवून त्यांचा अहवाल मागितलेला आहे. मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी असे काेणतेही पत्र मिळाले नसल्याचे सांगत आहेत.जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचयतींचा जो काही अहवाल येईल, त्यास जोडून महापालिका आपला प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेने प्रस्तावात समाविष्ट करायची माहिती संकलित केली आहे. जिल्हा परिषदेचा अहवाल आल्यानंतर ही सर्व माहिती प्रस्तावाच्या स्वरूपात राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्रानुसार महापालिकेने हद्दवाढीविषयी जिल्हा परिषदेकडे अहवाल मागितलेला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविणार आहोत. - एन. एस. पाटील, उपशहर रचनाकारमहापालिकेकडून आमच्यापर्यंत पत्र आलेले नाही, पत्र आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. - अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद