शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 15:00 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. 

सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकत नोंदवण्याचे ठरवण्यात असल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जाणार हे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. काल प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाला नाराज करून चालत नाही, असं अजित पवार यांनी सांगितले. तसेच मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसून छगन भुजबळ यांच्याशी बोलू. कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केले. अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

दरम्यान, राज्य सरकारच्या अध्यादेशामुळे मराठा समाजाचे हक्क त्यांना सहज उपलब्ध झाले आहेत. नोंदणीकृत मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळणे कायदेशीर होते. काही नेत्यांची वैयक्तिक भूमिका यावर वेगळी असू शकते. प्रत्यक्षात काय केले ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. सरकारने मराठा समाजाला फायदा होणारा निर्णय घेतला आहे. पण कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. यात कोणाचीही काळजी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले. 

कोणीही मुंबईवर मोठे मोर्चे घेऊन आले तर...

ओबीसींच्या बाबतीत जो निर्णय झाला तसाच निर्णय दलित आणि आदिवासींच्या बाबतीतदेखील घडू शकतो. कोणीही मुंबईवर मोठे मोर्चे घेऊन आले तर त्यांना आदिवासी आणि दलित समाजात आरक्षण मिळू शकेल, त्यामुळे मूळ जाती-जमातींनादेखील नव्याने मागणी करणाऱ्यांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ओबीसी समाज समाधानी, आमच्यावर अन्याय नाही-

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करताना ओबीसींच्या अस्तित्वाला कुठेही धक्का लावलेला नाही. त्यामुळे ओबीसी समाज समाधानी आहे. आमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही. सरकार आमच्याशी धोका करतोय असे वाटेल त्या दिवशी ओबीसी समाज घराघरांतून निघेल. - बबन तायवाडे, अध्यक्ष, ओबीसी महासंघ

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे