शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दादा, कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत कठोर भूमिका घ्यायची तरी कोणी?, समर्थन करताय तर निर्णयही घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:09 IST

कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न बरीच वर्षे चर्चेत

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी हद्दवाढीचे समर्थन केले. प्रत्येक वेळी राज्यकर्त्यांनी कोल्हापूरकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. आता पवारसुद्धा तेच करतील अशी शंका असल्याने दादा... तुम्ही हद्दवाढीचे समर्थन केलेच आहे तर मग एकदाची कठोर भूमिका स्वीकारा आणि हा विषय संपवा, अशी अपेक्षा त्यानंतर लगेचच व्यक्त झाली.

मंगळवारी उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हापूरकरांच्या साक्षीने शहराच्या हद्दवाढीचे समर्थन केले. पवार यांनी हद्दवाढीबाबत सांगितले की, काही गोष्टीत थोडेसे कठोर निर्णय घ्यावे लागतात. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न बरीच वर्षे चर्चेत आहे. जरी काही जणांनी वेगळी मते मांडली असली तरी शहराच्या विकासाच्या दृष्टीने पुढील पन्नास वर्षांचा विचार करून आपणाला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. मी गेल्या तीस-बत्तीस वर्षे राजकीय जीवनात आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमएआरडीचा भाग याचा विकास करताना अनेक प्रसंगांना मलाही सामोरे जावे लागले. त्यामुळे येथील राजकीय नेत्यांना, स्थानिक स्वराज्य संस्थांनी थोडेसे अधिक गतीने जावे लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक बोलतात आणि जे बोलतात ते करूनही दाखवितात, अशी त्यांची ख्याती आहे. पवार यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचे जाहीर समारंभात समर्थन करून कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे सांगितले. म्हणूनच हद्दवाढीबद्दल पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे. राज्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा प्रमुख पक्षांची कधी युती म्हणून, तर कधी महाविकास आघाडी म्हणून सत्ता काबीज केली; परंतु प्रत्येकांनी हद्दवाढीच्या विषयाला बगल दिली. भाजप-शिवसेना यांची सत्ता असताता २०१६ मध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीला पर्याय म्हणून कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण लादले.

आता उपमुख्यमंत्री पवार यांनी हद्दवाढीबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज बोलून दाखविली आहे; पण ती कोणी घ्यायची हा प्रश्न त्यांनीच अनुत्तरीत ठेवला. ज्या धडाडीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांची अनेकवेळा हद्दवाढ केली, तसाच प्रयत्न पवार यांनी कोल्हापूरच्या बाबतीत केला तरच काही तरी पदरात पडण्याची शक्यता आहे. अन्यथा, ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ अशी परिस्थिती होणार आहे. म्हणूनच पवार यांनी बोलल्याप्रमाणे शासकीय स्तरावरच हद्दवाढीचा निर्णय घेऊन हा विषय संपवावा आणि कोल्हापूरच्या विकासाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार