शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

Kolhapur: कृष्णा नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे पाडा - विजयकुमार दिवाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 12:27 IST

समन्वय ठेवल्यास महापुराचा धोका टळणार : नृसिंहवाडी येथे तिसरी पूर परिषद

नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर) : अतिवृष्टी झाली तरी या पूर परिषदेच्या वतीने आम्ही राज्य शासनाला सतर्क ठेवत महापुरावर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. पूरग्रस्तांनी खचून जाऊ नये. १९७६ मध्ये राज्य शासनाने अध्यादेश पारित करून कृष्णा नदीतील अनधिकृत बांधकामे पाडावीत, यासाठी उच्च न्यायालयात अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची गरज नाही, असे असताना शासनाने कोणतीच पावले न उचलल्याने पूर परिषदेच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या सहकार्याने ही बांधकामे पाडली जातील, असा इशारा जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी दिला.नृसिंहवाडी येथे आंदोलन अंकुश, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती व स्पंदन प्रतिष्ठान सांगली यांच्या वतीने तिसरी पूर परिषद झाली. परिषदेवेळी विविध ठराव करण्यात आले.‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून शासनाला जागे करण्यासाठी पूर परिषदेचे आयोजन करत शासन दरबारी आवाज उठवून येथील जनतेची पुरापासून सुटका करण्याचा प्रयत्न करीत आहे. संपूर्ण पूरमुक्ती होईपर्यंत पूरग्रस्तांच्या सहकार्याने हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशाराही चुडमुंगे यांनी यावेळी दिला.पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव एम. के. कुलकर्णी यांनी केंद्रीय जल आयोगाच्या तत्त्वानुसार महाराष्ट्र-कर्नाटक राज्याने समन्वय ठेवून पावसाळ्यात धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास महापुराची तीव्रता कमी होऊ शकते, असे मत व्यक्त केले.

हिप्परगी धरणही महापुराला कारणीभूतजलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता प्रभाकर केंगार यांनी सांगली व कोल्हापूर जिल्हाला भेडसावणारा पूर अलमट्टी धरणासोबतच हिप्परगी धरण कारणीभूत आहे. मात्र, कर्नाटक शासनाकडून केवळ अलमट्टीचा बागुलबुवा करून हिप्परगी धरणाचे दरवाजे न काढता ५२४.१२ पाणी साठविले जाते. यामुळे महापुराचा धोका संभवत असून, यावर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर परिषदेतील ठराव

  • केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार धरणातील साठा नियंत्रित ठेवण्यात यावा.
  • महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांत सतत समन्वय ठेवून अलमट्टी धरणातील पाणी पातळी ३१ जुलैपर्यंत ५१३.६० ते ३१ ऑगस्टपर्यंत ५१७.०० मीटरपेक्षा जास्त ठेवू नये.
  • कृष्णा खोऱ्यातील सर्व जलाशयांचे परिचलन एकात्मिक पद्धतीने करण्यात यावे.
  • पूरकाळात सांगली जिल्ह्यातील ढेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करून दुष्काळी भागास पाणी देण्यात यावे.
  • नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्यात यावीत.
  • नदी काठावरील शहरास येऊन मिळणारे ओढे व नाले प्लास्टिकमुक्त व पूर्ण क्षमतेने रिकामे करावेत.
  • नद्यांची पाणीपातळी, पडलेला पाऊस व धरणातील पाणीपातळी, पाणीसाठा याची एकत्रित माहिती नागरिकांना देण्यात यावी.
  • प्रत्येक जिल्ह्यामध्ये जल वैज्ञानिक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरriverनदी