शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘कुलगुरू हरवले’च्या पत्रकातून निषेध,‘एनएसयूआय’चे आंदोलन : देवानंद शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:34 IST

कोल्हापूर : ‘कुलगुरू हरवले आहेत’, ‘मिसिंग व्ही. सी.’ अशी पत्रके लावून नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियाच्या (एनएसयूआय) कोल्हापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा निषेध

कोल्हापूर : ‘कुलगुरू हरवले आहेत’, ‘मिसिंग व्ही. सी.’ अशी पत्रके लावून नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियाच्या (एनएसयूआय) कोल्हापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा निषेध केला. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या विरोधात घोषणाबाजी केली.केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्रालयाने ‘एनआयआरएफ’चे मानांकन (रँकिंग) जाहीर केले आहे. यामध्ये देशातील अव्वल शंभरच्या यादीत शिवाजी विद्यापीठाला स्थान मिळालेले नाही. या मानांकनाच्या क्रमवारीमध्ये दोन वर्षांपूर्वी विद्यापीठ हे २८ व्या स्थानावर होते. कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या दुर्लक्षामुळे विद्यापीठाचे मानांकन खाली गेले आहे; कारण मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्यापासून कुलगुरूंना शोधण्याची वेळ आली आहे. विद्यापीठातील अनेक प्रश्न, समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न होत नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येते. डॉ. मुळे यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. अनेक गैरप्रकार डोळ्यांसमोर घडूनही कारवाई होत नाही; म्हणून ‘एनएसयूआय’ने ‘विद्यापीठ परिसरात कुलगुरूंना शोधा’ अशी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत विद्यापीठ परिसरात शुक्रवारी कुलगुरूंचा निषेध करण्यात आला. त्यासह त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली असल्याची माहिती ‘एनएसयूआय’चे शहराध्यक्ष पार्थ मुंडे यांनी पत्रकाद्वारे दिली. यावेळी दीपक थोरात, नीलेश यादव, किशोर आयरे, अजिंक्य पाटील, सौरभ नाईक, मकरंद कवठेकर, सुशांत चव्हाण, विनायक पाटोळे, पंकज मगर, दस्तगीर शेख, आदित्य डोंगळे, अभय शेळके, आशुतोष मगर, सौरभ घाटगे, सुरेश साबळे, हृषिकेश चव्हाण, आदी उपस्थित होते.कोल्हापुरात शुक्रवारी नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियाच्या (एनएसयूआय) कोल्हापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘कुलगुरू हरवले आहेत’ ची पत्रके लावून कुलगुरूंचा निषेध केला. तसेच त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली.

टॅग्स :Studentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर