शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेच्या साखर मूल्यांकनात घट

By admin | Updated: December 9, 2014 23:22 IST

प्रतिक्विंटल २५३० रुपये मूल्यांकन : ८५ टक्के प्रमाणे २१५० रुपयेच उचल कारखान्यांना मिळणार

प्रकाश पाटील - कोपार्डे -एफआरपी न देणाऱ्या २० साखर कारखान्यांना साखर सहसंचालकांनी नोटिसी बजावल्यामुळे साखर कारखानदारांत खळबळ उडाली आहे. त्यातच राज्य सहकारी बँकेने साखरेचे दर कोसळल्याने मूल्यांकनात १०० रुपयांची घट केल्याने कारखानदारांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे. किमान एफआरपी देण्यासाठी कोठून पैसा उभा करावयाचा हा यक्षप्रश्न कारखानदारांसमोर उभा ठाकला आहे.राज्यात सर्वच कारखान्यांना राज्य बँक मोठ्या प्रमाणावर पूर्वहंगामी कर्जपुरवठा करते. ज्या साखर कारखान्यांना राज्य बँकेचा पतपुरवठा नाही, असे कारखाने जिल्हा बँकेकडून कर्ज घेतात. पतपुरवठा करताना राज्य बँकेने पत धोरण राबविले आहे. प्रत्येक तिमाहीत बाजारात असणाऱ्या साखरेच्या दरावर साखर कारखान्यांना पतपुरवठा करताना प्रतिक्विंटल मूल्यांकन ठरविले जाते. त्याप्रमाणे कर्ज घेणाऱ्या कारखान्यांना उत्पादित होणाऱ्या प्रतिक्विंटल साखर पोत्यावर मूल्यांकनाच्या ८५ टक्के रक्कम बँका उचल देतात. मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी साखरेचे दर २८०० ते २८५० रुपये प्रतिक्विंटल साखरेचा बाजारात दर होता. यावेळी राज्य बँकेने प्रतिक्विंटल २६३० रुपये साखरेचे मूल्यांकन ठरविले होते. याच्या ८५ टक्के म्हणजे प्रतिक्विंटल २२३५ रुपये साखर कारखान्यांच्या हातात पैसे मिळायचे. आता राज्य बँकेने यात १०० रुपये घट केली आहे. त्यामुळे आता प्रतिक्विंटल २१३५ रुपयेच कारखान्यांना मिळणार असून यातील १४०५ रुपयेच फक्त ऊस दरासाठी पैसे उपलब्ध होणार असून ७४० रुपये प्रक्रिया खर्च, टॅगिंगसाठी बँकच ठेवून घेणार असल्याने कारखानदारांपुढे आर्थिक संकट उभारले आहे. नेमक्या याच आर्थिक समस्येत असणाऱ्या कारखानदारांना एफआरपी न दिल्यामुळे कारणे दाखवा नोटिसी दिल्याने आर्थिक अडचणीत असणारे कारखानदार कायद्याच्या कचाट्यात आहेत. कारखानदारांचे शासन मदतीकडे, तर शेतकऱ्यांचे जिल्ह्यातील कारखानदारांच्या पहिल्या उचलीकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदार संभ्रमातजिल्ह्यातील २३ पैकी १९ कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहेत. आणखी दोन कारखान्यांचे गाळप हंगाम लवकरच सुरू होणार आहेत. या सर्वच कारखान्यांची एफआरपी २४५० ते २६५० पर्यंत आहेत.तर शाहू-कागल व गुरुदत्त टाकळी यांनी अनुक्रमे २५३० व २५५० जाहीर करूनही दिलेली नाही, तर बाकीच्या सर्वच कारखान्यांनी पहिल्या उचलीबद्दल शब्दही काढलेला नाही.या संभ्रमावस्थेत असणाऱ्या कारखानदारांपैकी दत्त दालमियाने २५३० रुपये एफआरपी बसत असताना २५०३ रुपये पहिली उचल २२ नोव्हेंबरपर्यंत गाळप केलेल्या उसाला दिली आहे.राज्य बँकेकडून मिळणारी रक्कम पहाता १४०५च उपलब्ध झाल्यानंतर उरलेले १२०० ते १२५० रुपये कुठून उभा करायचे याच संभ्रमात कारखानदार आहेत.